शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

तीन पटीने वाढले अपहरण

By admin | Updated: December 28, 2015 01:54 IST

कधी शांततेचे शहर म्हणून ओळख असलेल्या गोंदियात आता महिलांसंबंधी हिंसक घटना घडत असल्याने महिला व मुलींना असुरक्षित वाटत आहे.

वर्षभरात ७० गुन्हे दाखल : अतिप्रसंगाच्या ५१ घटना, अल्पवयीन मुला-मुलींचा समावेशगोंदिया : कधी शांततेचे शहर म्हणून ओळख असलेल्या गोंदियात आता महिलांसंबंधी हिंसक घटना घडत असल्याने महिला व मुलींना असुरक्षित वाटत आहे. जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अपरणाच्या घटनांत तीन पटीने वाढ झाली आहे. अतिप्रसंगाचे ५१ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. तर छेडछाडच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या काळात अपहरणाची ७० प्रकरणे दाखल झाली. मागच्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत अपहरणाचे २२ प्रकरण दाखल करण्यात आले. मागील वर्षभरात २६ प्रकरण दाखल करण्यात आले होते. अतिप्रसंगाच्या घटनांचे थोडे कमी प्रमाण आहे. परंतु छेडखानीच्या घटनांत वाढ झाली आहे. या वर्षात जानेवारी ते नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत अतिप्रसंगाचे ५१ प्रकरण दाखल करण्यात आले. मागील वर्षी हा आकडा ५३ होता. मागील वर्षी डिसेंबर अखेर ५८ प्रकरण दाखल करण्यात आले होते.महिला व तरूणींच्या सोबत छेडछाडीची १११ प्रकरणे दाखल करण्यात आली. मागील वर्षीच्या अकरा महिन्यात १०६ प्रकरण दाखल केले होते. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ११३ प्रकरण दाखल करण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत महिला व तरूणींचे अतिप्रसंग व छेडछाडीच्या १८ घटना नमूद आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या सदस्यांनी महिलांवरील होणाऱ्या अत्याचारावर आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.(तालुका प्रतिनिधी)