शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:12 IST

यंदा जून ते सप्टेबर दरम्यान पावसाची तुट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांमुळे ...

ठळक मुद्देराज्य शासनाचा निर्णय : उपाययोजना राबविण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा जून ते सप्टेबर दरम्यान पावसाची तुट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांमुळे सन २०१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव हे तालुके प्रभावित झाले. त्यामुळे या तालुक्यात आपत्तीची शक्यता विचारात घेत राज्य शासनाने या तीन तालुक्यात मध्यम स्वरु पाचा दुष्काळ जाहीर केला आहे.जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यामुळे या तालुक्यांना आठ प्रकारच्या सवलती लागू करण्यासाठी शासनाने मंजूरी दिली आहे. यामध्ये जमीन महसूलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सुट शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकºयांना शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या सवलतींचा समावेश आहे. मात्र यातून उर्वरित पाच तालुक्यांना वगळण्यात आल्याने शेतकºयांमध्ये रोष व्याप्त आहे.उर्वरित पाच तालुक्यांचे कायराज्य सरकारने गोंदिया, तिरोडा, गोरेगाव तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. यासंबंधीचे आदेश गुरूवारी (दि.२) काढण्यात आले. मात्र यंदा जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असताना केवळ तीन तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे. उर्वरित पाच तालुक्यांचे काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.शेतकºयांनी उपस्थित राहावेजिल्ह्यात धान पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या पिकाकरीता १२०० मि.मी. पावसाची आवश्यकता असते. खरीप हंगाम २०१७ मध्ये सरासरीच्या केवळ ५३ टक्के पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरीप हंगाम २०१७ मध्ये जिल्ह्यातील एकूण ५७ हजार १७५ शेतकºयांनी पीक विमा काढला आहे. पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी महसूल मंडळ हा घटक ग्राह्य धरला जातो. प्रत्येक महसूल मंडळनिहाय उत्पादकतेची आकडेवारी निश्चित करण्याकरीता जिल्ह्यात ३०० पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार आहे.पीक कापणी प्रयोगाकरिता समितीपीक कापणी प्रयोगाकरीता गावस्तरीय सर्व सदस्य, कृषी विस्तार अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील व कृषी सहायक यांचा समावेश आहे. पीक कापणी व मळणीच्यावेळी शेतकºयांनी उपस्थित राहून पीक कापणी प्रयोगामध्ये प्राप्त उत्पन्नाची नोंद घ्यावी. तसेच पीक कापणीचे मोबाईल अ‍ॅप्सवर क्षेत्रीय कर्मचारी माहिती भरतील याची दक्षता घ्यावी.