शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

‘स्वाईन फ्लू’ने तीन जण दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:12 IST

संसर्गजन्य असलेल्या स्वाईन फ्लूने आतापर्यंत तिरोडा तालुक्यातील तीन जण दगावले.

ठळक मुद्देगावकºयांमध्ये भीतीचे वातावरण : प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी

हितेश रहांगडाले। लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : संसर्गजन्य असलेल्या स्वाईन फ्लूने आतापर्यंत तिरोडा तालुक्यातील तीन जण दगावले. तर एक संशयित रुग्ण आढळला. यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तिरोडा तालुक्यातील केसलवाडा, बिर्सी व चांदोरी येथे स्वाईन फ्लू ने तीन जण २४ सप्टेंबर रोजी दगावल्याची माहिती आहे. यामध्ये सरस्वता बाजीराव रार्घोते (५३) बिर्सी, दिलीप बाबूराव आदमने (४०) रा. चांदोरी व सुनिता अभिमन कुकडे (५५) रा.केसलवाडा यांचा समावेश आहे. स्वाईन फ्लूमुळे एकाच तालुक्यातील तीन जण दगावल्याची गोंदिया जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील बिर्सी येथील स्वाईन फ्लूचा पहिला बळी ठरलेली महिला सरस्वता बाजीराव रार्घोते (५५) हिला २० सप्टेंबर साधा ताप आला होता. त्यावेळी आरोग्य उपकेंद्र लखेगाव येथून तिला औषधी देण्यात आले होते. परंतु दुसºया दिवशी श्वास घेण्याचा त्रास वाढल्यामुळे प्रथम तिरोडानंतर भंडारा व नागपूर येथील रुग्णालायात दाखल करण्यात आले.नागपूर येथे ताप कमी न झाल्यामुळे २३ सप्टेंबरला सरस्वता हिला शासकीय रुग्णालय नागपूर येथे दाखल करण्यात आले. तेथे सदर रुग्ण स्वाईन फ्लूने ग्रस्त असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर औषधोपचार करण्यात आला. परंतु २४ सप्टेंबर रोजी सरस्वता रार्घोते यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. चांदोरी येथील दिलीप बाबूराव आदमने (४०) याला सुद्धा सामान्य ताप होता. त्याला १९ सप्टेंबर रोजी भंडारा व नंतर नागपूर दाखल करण्यात आले. परंतु २३ सप्टेंबर रोजी त्यांचा सुद्धा शासकीय रुग्णालय नागपूर येथे स्वाईन फ्लूने मृत्यू झाला.तिसरा बळी केसलवाडा येथील सुनीता अभिमन कुकडे (५५) असून तिला १० सप्टेंबरपासून ताप होता. २४ सप्टेंबर रोजी भंडारा येथील खासगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. स्वाईन फ्लूने दगावलेली सरस्वता रार्घोते हिचा नातू नयन नंदकिशोर रार्घोते (२) बिर्सी हा संशयीत रुग्ण म्हणून आढळला असून त्याला डॉ. अग्रवाल यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.आरोग्य कर्मचाºयांना सहकार्याचे आवाहनतिरोडा तालुक्यात एकाचवेळी स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण दगावल्याच्या घटनेने जनतेत भीतीचे वातावरण आहे. यामुळे जनतेने घाबरुन न जाता आरोग्य विभागास सहकार्य करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय पाटील यांनी केले आहे. बिर्सी, गुलाबटोला, लाखेगाव येथील सर्वेक्षण करण्यात आले असून जनतेत जनजागृती करण्यात असल्याचे सांगितले.स्वाईन फ्लूची लक्षणेकुणालाही ताप, सर्दी, खोकला असणे, ताप तीव्र होणे, सर्दीमुळे घसा दुखणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही स्वाईन फ्लू या रोगाची प्राथमिक लक्षणे आहे. याकडे कानाडोळा न करता काळजीपूर्वक औषधोपचार करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.तिरोडा तालुक्यात दगावलेले तिन्ही रुग्ण हे स्वाईन फ्लूमुळे दगावल्याचे रक्त तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. स्वाईन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग असून यावर ठराविक उपचार नसून प्रतिबंध हाच उपाय असल्याचे सांगितले. यासाठी जनतेने गर्दीच्या ठिकाणी वावरणे टाळावे, तापाची लक्षणे आढळल्यास तात्काळ औषधोपचार करावे.-डॉ.सी.आर.टेंभुर्णेतालुका वैद्यकीय अधिकारी