शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

‘स्वाईन फ्लू’ने तीन जण दगावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 22:12 IST

संसर्गजन्य असलेल्या स्वाईन फ्लूने आतापर्यंत तिरोडा तालुक्यातील तीन जण दगावले.

ठळक मुद्देगावकºयांमध्ये भीतीचे वातावरण : प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी

हितेश रहांगडाले। लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : संसर्गजन्य असलेल्या स्वाईन फ्लूने आतापर्यंत तिरोडा तालुक्यातील तीन जण दगावले. तर एक संशयित रुग्ण आढळला. यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तिरोडा तालुक्यातील केसलवाडा, बिर्सी व चांदोरी येथे स्वाईन फ्लू ने तीन जण २४ सप्टेंबर रोजी दगावल्याची माहिती आहे. यामध्ये सरस्वता बाजीराव रार्घोते (५३) बिर्सी, दिलीप बाबूराव आदमने (४०) रा. चांदोरी व सुनिता अभिमन कुकडे (५५) रा.केसलवाडा यांचा समावेश आहे. स्वाईन फ्लूमुळे एकाच तालुक्यातील तीन जण दगावल्याची गोंदिया जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.प्राप्त माहितीनुसार तिरोडा तालुक्यातील बिर्सी येथील स्वाईन फ्लूचा पहिला बळी ठरलेली महिला सरस्वता बाजीराव रार्घोते (५५) हिला २० सप्टेंबर साधा ताप आला होता. त्यावेळी आरोग्य उपकेंद्र लखेगाव येथून तिला औषधी देण्यात आले होते. परंतु दुसºया दिवशी श्वास घेण्याचा त्रास वाढल्यामुळे प्रथम तिरोडानंतर भंडारा व नागपूर येथील रुग्णालायात दाखल करण्यात आले.नागपूर येथे ताप कमी न झाल्यामुळे २३ सप्टेंबरला सरस्वता हिला शासकीय रुग्णालय नागपूर येथे दाखल करण्यात आले. तेथे सदर रुग्ण स्वाईन फ्लूने ग्रस्त असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर औषधोपचार करण्यात आला. परंतु २४ सप्टेंबर रोजी सरस्वता रार्घोते यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. चांदोरी येथील दिलीप बाबूराव आदमने (४०) याला सुद्धा सामान्य ताप होता. त्याला १९ सप्टेंबर रोजी भंडारा व नंतर नागपूर दाखल करण्यात आले. परंतु २३ सप्टेंबर रोजी त्यांचा सुद्धा शासकीय रुग्णालय नागपूर येथे स्वाईन फ्लूने मृत्यू झाला.तिसरा बळी केसलवाडा येथील सुनीता अभिमन कुकडे (५५) असून तिला १० सप्टेंबरपासून ताप होता. २४ सप्टेंबर रोजी भंडारा येथील खासगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. स्वाईन फ्लूने दगावलेली सरस्वता रार्घोते हिचा नातू नयन नंदकिशोर रार्घोते (२) बिर्सी हा संशयीत रुग्ण म्हणून आढळला असून त्याला डॉ. अग्रवाल यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.आरोग्य कर्मचाºयांना सहकार्याचे आवाहनतिरोडा तालुक्यात एकाचवेळी स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण दगावल्याच्या घटनेने जनतेत भीतीचे वातावरण आहे. यामुळे जनतेने घाबरुन न जाता आरोग्य विभागास सहकार्य करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय पाटील यांनी केले आहे. बिर्सी, गुलाबटोला, लाखेगाव येथील सर्वेक्षण करण्यात आले असून जनतेत जनजागृती करण्यात असल्याचे सांगितले.स्वाईन फ्लूची लक्षणेकुणालाही ताप, सर्दी, खोकला असणे, ताप तीव्र होणे, सर्दीमुळे घसा दुखणे, दम लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही स्वाईन फ्लू या रोगाची प्राथमिक लक्षणे आहे. याकडे कानाडोळा न करता काळजीपूर्वक औषधोपचार करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.तिरोडा तालुक्यात दगावलेले तिन्ही रुग्ण हे स्वाईन फ्लूमुळे दगावल्याचे रक्त तपासणी अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. स्वाईन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग असून यावर ठराविक उपचार नसून प्रतिबंध हाच उपाय असल्याचे सांगितले. यासाठी जनतेने गर्दीच्या ठिकाणी वावरणे टाळावे, तापाची लक्षणे आढळल्यास तात्काळ औषधोपचार करावे.-डॉ.सी.आर.टेंभुर्णेतालुका वैद्यकीय अधिकारी