शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
3
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
4
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
5
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
6
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
7
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
8
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
9
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
10
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
11
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
12
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
13
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
14
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
15
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
16
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
17
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
18
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
19
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
20
अंगारक संकष्ट चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status शेअर करा; गणेशभक्तांना द्या शुभेच्छा!

नऊ देशातील पाहुण्यांचा तीन महिने गोंदियात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:26 IST

जिकडे-तिकडे तलावांची संख्या कमी होत चालल्याने पक्ष्यांचे खाद्य कमी होत आहे. परिणामी तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नऊ देशातील विदेशी पाहुणे (पक्ष्यांचा) तब्बल तीन महिने मुक्काम असतो. यंदाही या पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी दरवर्षी या पक्ष्यांची संख्या रोडावत चालली असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.

ठळक मुद्देआवडत्या अन्नाचा शोध : तलावांचा जिल्हा आवडतोय स्थलांतरीत पक्ष्यांना

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिकडे-तिकडे तलावांची संख्या कमी होत चालल्याने पक्ष्यांचे खाद्य कमी होत आहे. परिणामी तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नऊ देशातील विदेशी पाहुणे (पक्ष्यांचा) तब्बल तीन महिने मुक्काम असतो. यंदाही या पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी दरवर्षी या पक्ष्यांची संख्या रोडावत चालली असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.गोंदिया जिल्ह्यात सायबेरीया, मंगोलीया, पाकीस्तान, लद्दाख, श्रीलंका, नेपाळ, बलुचिस्तान, स्कॉटलँड, बांग्लादेश आदी देशातून बारहेडेड गुल, ग्रेलेगगुज, ब्राम्हणी सेलडक, कॉमन सेलडक, कोंबडॅक, कॉटनटेल, गडवाल, मालार्ड, स्पॉटबिलडक, नॉर्दन शॉव्हलर, नॉर्दन पिंटेल, गार्गेनी, कॉमन टेल, रेडक्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, ग्रेहेडेड लॅपविन इत्यादी पक्षी येतात. जिल्हा पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्ह्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या तलावांमध्ये पक्ष्यांना आवडते खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत असा तीन महिने मुक्काम विदेशी पक्ष्यांचा गोंदिया जिल्ह्यात असतो. बऱ्याच तलावांमध्ये अतिक्रमण झाले आहे. तसेच त्या तलावातील गाळ काढण्याच्या नावावर पक्ष्यांचे खाद्य संपविण्यात येत आहे. त्यामुळे विदेशी पक्ष्यांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. मात्र यानंतरही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यातील मोजक्या तलावांची स्थिती बरी असल्यामुळे त्या तलावांकडे स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन नेहमीच होत असते. जिल्ह्यात हजारो तलाव आहेत. परंतु फक्त पाचच तलावांवर पक्ष्यांचा महाकुंभ दिसून येतो. उर्वरीत तलावांवर पक्षी भटकत नाहीत. याचाच अर्थ जिल्ह्यातील इतर तलावांची स्थिती पक्ष्यांसाठी अनुकूल नाही.पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी हे करापक्ष्यांचे आवडते खाद्य तलावाच्या काठावर पावसाळ्यात लावावे, ज्या ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास आहे त्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे, त्या पक्ष्यांचे निरीक्षणासाठी जातांनाही दूरूनच निरीक्षण करावे, पक्षी विचलीत होणार नाही याची काळजी घ्यावी,शेकºयांनी पावसाळा संपतांना तलावातील पाणी शेतात नेण्यासाठी पाळ फोडतात ते फोडू नये, तलावातील सदासावली, काटेकोळसा हे पक्ष्यांना त्रास देणाºया वनस्पती नष्ट करावेत.शिकाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी गस्त वाढवातलावांवर येणाऱ्या देशी, विदेशी पक्ष्यांची फासे लावून, विष टाकून शिकार केली जाते. ती शिकार होऊ नये यासाठी वनविभाग व वन्यप्रेमींनी गस्त घालण्याचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे तलावांवर होणारी शिकार थांबेल. ही शिकार थांबविण्यासाठी स्थानिकांची मदत घ्यावी.दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी-कमी होणे ही धोक्याची घंटा आहे. यासाठी फक्त वन्यजीव व वनविभागावर अवलंबून न राहता गावातील पक्षीप्रेमींनी आपले कर्तव्य समजून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करावा. पक्ष्यांचे अन्न व अधिवास टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे.- मुकूंद धुर्वे, मानद वन्यजीवरक्षक तथासंवर्धन अधिकारी सातपुडा फांऊडेशन गोंदिया.