शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : भयावह! दिल्ली कार स्फोटाचा नवीन Video आला समोर; तब्बल ४० फूट खाली हादरली जमीन
2
भीषण अपघात! ग्वाल्हेरमध्ये फॉर्च्युनरची ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक, ५ तरुणांचा जागीच मृत्यू
3
“डॉक्टर नसलो, तरी मोठी ऑपरेशन करतो!”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार फटकेबाजी
4
आरबीआयने दर घटवले तरी पोस्ट ऑफिस देतंय मोठा फायदा; ५ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याजदर कायम
5
IND vs SA : द.आफ्रिकेचा कर्णधार बावुमाचं नाबाद अर्धशतक! टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट
6
बिहार: उत्तर तरी काय देणार.. प्रशांत किशोर यांनी बोलवलेली पत्रकार परिषद शेवटच्या क्षणी रद्द
7
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
8
कोचीन शिपयार्डपासून ते एचयूडीसीओपर्यंत; पुढच्या आठवड्यात कोणती कंपनी किती लाभांश देणार?
9
“काँग्रेस कधीच संपत नसते, जनतेचा विश्वास, पक्ष पुन्हा ताकदीने उभी राहतो”: रमेश चेन्नीथला
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
11
धक्कादायक! अमरावतीत धारणी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यूचे तांडव; तीन बालकांसह मातेचा मृत्यू
12
Delhi Blast : दिल्ली स्फोटात खळबळजनक खुलासा; घटनास्थळी सापडली 9mm ची ३ काडतुसं, पण...
13
Nashik: मालेगावी आणखी साडेपाच लाखांच्या बनावट नोटा जप्त, वर्ध्यातून आलेल्या दोघांना अटक
14
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
15
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
17
Bombay HC: सेबीशी तडजोड हा कारवाई रद्द करण्याचा आधार नाही, आयपीओ फेरफारसंबंधी याचिका फेटाळली
18
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
19
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
20
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ देशातील पाहुण्यांचा तीन महिने गोंदियात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:26 IST

जिकडे-तिकडे तलावांची संख्या कमी होत चालल्याने पक्ष्यांचे खाद्य कमी होत आहे. परिणामी तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नऊ देशातील विदेशी पाहुणे (पक्ष्यांचा) तब्बल तीन महिने मुक्काम असतो. यंदाही या पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी दरवर्षी या पक्ष्यांची संख्या रोडावत चालली असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.

ठळक मुद्देआवडत्या अन्नाचा शोध : तलावांचा जिल्हा आवडतोय स्थलांतरीत पक्ष्यांना

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिकडे-तिकडे तलावांची संख्या कमी होत चालल्याने पक्ष्यांचे खाद्य कमी होत आहे. परिणामी तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नऊ देशातील विदेशी पाहुणे (पक्ष्यांचा) तब्बल तीन महिने मुक्काम असतो. यंदाही या पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी दरवर्षी या पक्ष्यांची संख्या रोडावत चालली असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.गोंदिया जिल्ह्यात सायबेरीया, मंगोलीया, पाकीस्तान, लद्दाख, श्रीलंका, नेपाळ, बलुचिस्तान, स्कॉटलँड, बांग्लादेश आदी देशातून बारहेडेड गुल, ग्रेलेगगुज, ब्राम्हणी सेलडक, कॉमन सेलडक, कोंबडॅक, कॉटनटेल, गडवाल, मालार्ड, स्पॉटबिलडक, नॉर्दन शॉव्हलर, नॉर्दन पिंटेल, गार्गेनी, कॉमन टेल, रेडक्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, ग्रेहेडेड लॅपविन इत्यादी पक्षी येतात. जिल्हा पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्ह्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या तलावांमध्ये पक्ष्यांना आवडते खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत असा तीन महिने मुक्काम विदेशी पक्ष्यांचा गोंदिया जिल्ह्यात असतो. बऱ्याच तलावांमध्ये अतिक्रमण झाले आहे. तसेच त्या तलावातील गाळ काढण्याच्या नावावर पक्ष्यांचे खाद्य संपविण्यात येत आहे. त्यामुळे विदेशी पक्ष्यांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. मात्र यानंतरही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यातील मोजक्या तलावांची स्थिती बरी असल्यामुळे त्या तलावांकडे स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन नेहमीच होत असते. जिल्ह्यात हजारो तलाव आहेत. परंतु फक्त पाचच तलावांवर पक्ष्यांचा महाकुंभ दिसून येतो. उर्वरीत तलावांवर पक्षी भटकत नाहीत. याचाच अर्थ जिल्ह्यातील इतर तलावांची स्थिती पक्ष्यांसाठी अनुकूल नाही.पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी हे करापक्ष्यांचे आवडते खाद्य तलावाच्या काठावर पावसाळ्यात लावावे, ज्या ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास आहे त्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे, त्या पक्ष्यांचे निरीक्षणासाठी जातांनाही दूरूनच निरीक्षण करावे, पक्षी विचलीत होणार नाही याची काळजी घ्यावी,शेकºयांनी पावसाळा संपतांना तलावातील पाणी शेतात नेण्यासाठी पाळ फोडतात ते फोडू नये, तलावातील सदासावली, काटेकोळसा हे पक्ष्यांना त्रास देणाºया वनस्पती नष्ट करावेत.शिकाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी गस्त वाढवातलावांवर येणाऱ्या देशी, विदेशी पक्ष्यांची फासे लावून, विष टाकून शिकार केली जाते. ती शिकार होऊ नये यासाठी वनविभाग व वन्यप्रेमींनी गस्त घालण्याचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे तलावांवर होणारी शिकार थांबेल. ही शिकार थांबविण्यासाठी स्थानिकांची मदत घ्यावी.दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी-कमी होणे ही धोक्याची घंटा आहे. यासाठी फक्त वन्यजीव व वनविभागावर अवलंबून न राहता गावातील पक्षीप्रेमींनी आपले कर्तव्य समजून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करावा. पक्ष्यांचे अन्न व अधिवास टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे.- मुकूंद धुर्वे, मानद वन्यजीवरक्षक तथासंवर्धन अधिकारी सातपुडा फांऊडेशन गोंदिया.