शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

नऊ देशातील पाहुण्यांचा तीन महिने गोंदियात मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:26 IST

जिकडे-तिकडे तलावांची संख्या कमी होत चालल्याने पक्ष्यांचे खाद्य कमी होत आहे. परिणामी तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नऊ देशातील विदेशी पाहुणे (पक्ष्यांचा) तब्बल तीन महिने मुक्काम असतो. यंदाही या पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी दरवर्षी या पक्ष्यांची संख्या रोडावत चालली असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.

ठळक मुद्देआवडत्या अन्नाचा शोध : तलावांचा जिल्हा आवडतोय स्थलांतरीत पक्ष्यांना

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिकडे-तिकडे तलावांची संख्या कमी होत चालल्याने पक्ष्यांचे खाद्य कमी होत आहे. परिणामी तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यात नऊ देशातील विदेशी पाहुणे (पक्ष्यांचा) तब्बल तीन महिने मुक्काम असतो. यंदाही या पक्ष्यांचे आगमन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी दरवर्षी या पक्ष्यांची संख्या रोडावत चालली असल्याचे पक्षीप्रेमींनी सांगितले.गोंदिया जिल्ह्यात सायबेरीया, मंगोलीया, पाकीस्तान, लद्दाख, श्रीलंका, नेपाळ, बलुचिस्तान, स्कॉटलँड, बांग्लादेश आदी देशातून बारहेडेड गुल, ग्रेलेगगुज, ब्राम्हणी सेलडक, कॉमन सेलडक, कोंबडॅक, कॉटनटेल, गडवाल, मालार्ड, स्पॉटबिलडक, नॉर्दन शॉव्हलर, नॉर्दन पिंटेल, गार्गेनी, कॉमन टेल, रेडक्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, ग्रेहेडेड लॅपविन इत्यादी पक्षी येतात. जिल्हा पक्ष्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्ह्यात तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या तलावांमध्ये पक्ष्यांना आवडते खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत असा तीन महिने मुक्काम विदेशी पक्ष्यांचा गोंदिया जिल्ह्यात असतो. बऱ्याच तलावांमध्ये अतिक्रमण झाले आहे. तसेच त्या तलावातील गाळ काढण्याच्या नावावर पक्ष्यांचे खाद्य संपविण्यात येत आहे. त्यामुळे विदेशी पक्ष्यांची संख्या दरवर्षी कमी होत आहे. मात्र यानंतरही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यातील मोजक्या तलावांची स्थिती बरी असल्यामुळे त्या तलावांकडे स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन नेहमीच होत असते. जिल्ह्यात हजारो तलाव आहेत. परंतु फक्त पाचच तलावांवर पक्ष्यांचा महाकुंभ दिसून येतो. उर्वरीत तलावांवर पक्षी भटकत नाहीत. याचाच अर्थ जिल्ह्यातील इतर तलावांची स्थिती पक्ष्यांसाठी अनुकूल नाही.पक्ष्यांची संख्या वाढविण्यासाठी हे करापक्ष्यांचे आवडते खाद्य तलावाच्या काठावर पावसाळ्यात लावावे, ज्या ठिकाणी पक्ष्यांचा अधिवास आहे त्या ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे, त्या पक्ष्यांचे निरीक्षणासाठी जातांनाही दूरूनच निरीक्षण करावे, पक्षी विचलीत होणार नाही याची काळजी घ्यावी,शेकºयांनी पावसाळा संपतांना तलावातील पाणी शेतात नेण्यासाठी पाळ फोडतात ते फोडू नये, तलावातील सदासावली, काटेकोळसा हे पक्ष्यांना त्रास देणाºया वनस्पती नष्ट करावेत.शिकाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी गस्त वाढवातलावांवर येणाऱ्या देशी, विदेशी पक्ष्यांची फासे लावून, विष टाकून शिकार केली जाते. ती शिकार होऊ नये यासाठी वनविभाग व वन्यप्रेमींनी गस्त घालण्याचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे तलावांवर होणारी शिकार थांबेल. ही शिकार थांबविण्यासाठी स्थानिकांची मदत घ्यावी.दिवसेंदिवस पक्ष्यांची संख्या कमी-कमी होणे ही धोक्याची घंटा आहे. यासाठी फक्त वन्यजीव व वनविभागावर अवलंबून न राहता गावातील पक्षीप्रेमींनी आपले कर्तव्य समजून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करावा. पक्ष्यांचे अन्न व अधिवास टिकविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे.- मुकूंद धुर्वे, मानद वन्यजीवरक्षक तथासंवर्धन अधिकारी सातपुडा फांऊडेशन गोंदिया.