शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

पानगावात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:31 IST

शहरी भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्गामुळे महामारीचे स्वरूप आले आहे. आता याचा शिरकाव तीव्र गतीने ग्रामीण भागातसुद्धा होत असताना ...

शहरी भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्गामुळे महामारीचे स्वरूप आले आहे. आता याचा शिरकाव तीव्र गतीने ग्रामीण भागातसुद्धा होत असताना दिसत आहे. पानगावव्यतिरिक्त इतर गावांमध्येसुद्धा काही लोकांनी मृत्यूला कवटाळले आहे. अशात ग्रामीण भागातील जनतेलासुद्धा सावधतेने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. पानगाव येथे एकाच कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला. त्यामध्ये प्रौढ वयातील दोन सख्खे भाऊ आणि त्यांची म्हातारी आई यांचा समावेश असून, कुटुंबातील इतर सदस्यांची प्रकृतीसुद्धा खालावलेली आहे. तसेच गावात इतर लोकांनासुद्धा ताप व इतर आजारांचा त्रास वाढला आहे. आरोग्य विभागातर्फे ग्रामपंचायतीला औषधे देऊन गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. दरम्यान, सालेकसाचे तहसीलदार कांबळे, ठाणेदार प्रमोद बघेले व अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली व गावकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले.

बॉक्स

मृतदेहासाठी आवश्यक साहित्याचा अभाव

कोरोना काळात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाला प्लास्टिक पिशवीत गुंडाळून अंत्यसंस्कारासाठी नेले जाते. परंतु, आरोग्य विभागाने प्लास्टिक पिशवीचा पुरवठा केला नाही. त्यामुळे पिशवीत न गुंडाळता दफनविधी करण्यात आला. अशात कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.