शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागाचे ५० बंधारे भग्नावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

अवघ्या दोन वर्षातच या बंधाऱ्यांची हालत खस्ता झाली. ठिकठिकाणातून हे बंधारे फुटले. बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे बंधारे तयार करण्यात आल्यामुळे पावसाच्या पाण्याने ते बंधारे वाहून गेले. त्यामुळे जंगलातून वाहून जाणारे पाणी नाले व ओढ्यांतून वाहतांना या बंधाऱ्यांच्या माध्यमातून अडकविले जाऊ शकते.

ठळक मुद्देआमगाव तालुक्यातील प्रकार। जलयुक्त शिवार नावापुरतेच

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : तालुक्यातील कृषी विभागामार्फत असलेले ५० पेक्षा अधिक बंधारे भग्नावस्थेत असल्यामुळे ओढे, नदी व नाले यांचा फायदा शेतकऱ्यांना मिळत नाही. फक्त पैसे कमविण्याच्या नादात कृषी विभाग बोगस बंधाऱ्यांचे बांधकाम करते.गरज आहे त्या ठिकाणी बंधाºयांचे बांधकाम केले जात नाही. शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाला कृषी विभागच तिलांजली देत असल्याचे दिसत आहे.महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, यासाठी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. पाणी अडवा, पाणी जिरवा या मोहिमेतून जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल या हेतूने वनराई बंधारे बांधावे, नदी, ओढे व नाले यावर बंधाऱ्याची निर्मिती करण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत.परंतु आमगाव तालुक्यात कृषी विभाग जलयुक्त शिवार अभियानाला डावलत आहे. तालुक्यात कृषी विभागांतर्गत नदी, ओढे व नाले या ठिकाणी सन १९९९ ते २००० मध्ये तयार करण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यांची आजघडीला दुरवस्था आहे. ज्यावेळी हे बंधारे तयार करण्यात आलेत्यानंतर अवघ्या दोन वर्षातच या बंधाऱ्यांची हालत खस्ता झाली. ठिकठिकाणातून हे बंधारे फुटले. बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचे बंधारे तयार करण्यात आल्यामुळे पावसाच्या पाण्याने ते बंधारे वाहून गेले. त्यामुळे जंगलातून वाहून जाणारे पाणी नाले व ओढ्यांतून वाहतांना या बंधाºयांच्या माध्यमातून अडकविले जाऊ शकते.परंतु १९ वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या बंधाऱ्यांची साधी दुरूस्तीही न झाल्यामुळे हे बंधारे वाहून गेले. परिणामी आता पावसाचे पाणी अडून राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी अपुरे पडते. कधी पूर तर कधी अवर्षण यामुळे शेतकऱ्यांची स्थिती बिकट होत आहे. परंतु अवर्षणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सुरू करण्यात आलेल्या जलयुक्त शिवारचाही लाभ गरजू शेतकऱ्यांना मिळत नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. नदी, ओढे व नाले या ठिकाणी सिमेंट बंधारे बांधण्यात यावे किंवा जुन्या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.या सिमेंट बंधाऱ्यांच्या दुरूस्तीसाठी कृषी विभाग व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग यांच्या अनेकदा चकरा मारल्या परंतु येथील अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी झटकली. शेतकऱ्यांसाठी वरदान म्हणून शासन जलयुक्त शिवार अभियानाचा गवगवा करते. परंतु शेतकऱ्यांना गरज असलेल्या ठिकाणी बंधाऱ्यांची निर्मिती किंवा दुरूस्ती होत नसल्याने या अभियानाचा काय उपयोग.-जियालाल पंधरेजि.प.सदस्य, अंजोरा क्षेत्र

टॅग्स :agricultureशेती