शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आठ गावांतील उन्हाळी पीक धोक्यात

By admin | Updated: March 12, 2016 01:56 IST

ज्या धापेवाडा सिंचन योजनेच्या माध्यमातून तिरोडा परिसरातील आठ गावातील उन्हाळी धान पिकांसाठी पाणी पुरवठा केला जातो, ...

लाखोचे वीज बिल थकीत : धापेवाडा उपसा सिंचन योजनेची वीज कापलीतिरोडा : ज्या धापेवाडा सिंचन योजनेच्या माध्यमातून तिरोडा परिसरातील आठ गावातील उन्हाळी धान पिकांसाठी पाणी पुरवठा केला जातो, त्या धापेवाडा प्रकल्पाचा वीज पुरवठा मागील सात दिवसांपूर्वी वीज कंपनीने खंडित केला. वीज बिल भरले नसल्यामुळे वीज कंपनीने हे पाऊल उचलले. मात्र या कारवाईमुळे पिकांना होणारा पाणी पुरवठा बंद होऊन धानपीक वाळण्याच्या मार्गावर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांबद्दल कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे.सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी भरडले जात आहेत. खरीप हंगामात फारसे उत्पन्न न झाल्याने त्यांची संपूर्ण आशा रबी व उन्हाळी धानपिकांवर होती. मात्र तिरोडा परिसरातील धापेवाडा सिंचन योजनेचे वीज कनेक्शन कापण्यात आल्याने शेतातील पीक वाळण्याच्या मार्गावर आले असून शेतकऱ्यांना पुन्हा नुकसानच सहन करावे लागेल, अशी चिन्हे दिसून येत आहेत. तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा, चिरेखनी, बेलाटी खुर्द, मांडवी, मुंडीपार, बेलाटी बु., मरारटोला, पुजारीटोला या आठ गावांतील उन्हाळी धानपिके पाणी पुरवठा बंद पडल्याने वाळण्याच्या मार्गावर आली आहेत. सदर आठ गावांतील एक हजार ५०० हेक्टर शेतजमीन पाण्याअभावी कोरडी पडली आहे. मात्र विद्युत विभाग काहीही ऐकायला तयार नाही, अशी स्थिती आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धापेवाडा उपसा सिंचन योजनेवर डिसेंबर महिन्यात ३० लाखांचे वीज बिल होते. यापैकी २५ लाख रूपये भरण्यात आले. जानेवारी महिन्यात नऊ लाखांच्या जवळपास वीज बिल बाकी आहे. दरवर्षी शेतकऱ्यांकडून १०० टक्के वसुली केली जाते. मात्र वीज बिल भरण्यात न आल्याने कनेक्शन कापण्यात आले व शेतकऱ्यांच्या पिकांना होणारा पाणी पुरवठा बंद पडला. जर दोन दिवसांत पिकांना पाणी मिळाले नाही तर ते नष्ट होईल. (तालुका प्रतिनिधी)अन् शेतकऱ्याचा हृदयघाताने मृत्यूवीज कंपनीने धापेवाडा सिंचन योजनेचे कनेक्शन कापल्याने मागील सात दिवसांपासून उन्हाळी धानपिकांना पाणी मिळाले नाही. त्यामुळे धानपीक वाळले. आपल्या शेतातील पिकांचे निरीक्षण करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला पीक वाळल्याचे पाहून मोठाच ‘शॉक’ बसला व त्यातच तो गतप्राण झाला. ही घटना शुक्रवारी (दि.११) सायंकाळी ४.३० वाजता घडली. काशिराम तिमाजी उके रा.चिरेखनी असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. विद्युत विभागाने वीज कनेक्शन कापले नसते तर सदर शेतकऱ्याचा जीव वाचला असता, असे बोलले जात आहे. यासाठी वीज कंपनीसह धापेवाडा सिंचन योजनेच्या कार्यप्रणालीवरही मोठाच रोष व्यक्त केला जात आहे. धापेवाडा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता व त्यांचे अधिनस्त कर्मचारी दरवर्षी प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांकडून पाणीपट्टीची रक्कम पूर्णपणे वसूल करतात. मात्र ती रक्कम जमा न करता आपल्या वैयक्तिक कामात खर्च करतात व शेतकऱ्यांकडून वसुली न झाल्याच्या बोंबा ठोकतात, असा आरोप चिरेखनी येथील ग्रामस्थांसी केला आहे. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून दोषी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीसुद्धा ग्रामस्थांनी केली आहे.अधिकाऱ्यांचे कानावर हात आठ गावांतील धानपीक धोक्यात आल्याचे पाहून डॉ.सुशील रहांगडाले यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. उन्हाळी धानपिकांचे उत्पन्न निघताच शेतकऱ्यांकडून पाणी बिल वसुली करून वीज बिलाचा भरणा केला जाईल, असेही सांगितले. मात्र वीज विभागाचे अधिकारी काहीही ऐकण्यास तयार नाही. या प्रकाराकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून शेतकऱ्यांचे पीक वाचविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.शेतकऱ्यांचे कार्यालयात ठाणधापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या नदीकाठावरील कार्यालयात चिरेखानी व लगतच्या गावातील शेतकरी शुक्रवारी सकाळी ८ वाजतापासून जमा झाले आहेत. जोपर्यंत उन्हाळी पिकांसाठी पाणी सोडण्यात येत नाही तोपर्यंत तिथेच ठाण मांडण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. रात्रभर शेतकरी तिथेच राहणार असल्याचे चिरेखानीचे माजी सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी घनश्याम पारधी यांनी सांगितले. सिंचन कार्यालयात जाऊन शेतकऱ्यांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून जमा केलेली पाणीपट्टीची रक्कम कार्यालयातच असल्याचे सांगण्यात आले. मात्र शेतकरी पाणीपट्टी कर भरत नसल्याच्या उलट्या बोंबा सिंचन प्रकल्प कार्यालयाकडून मारल्या जात आहे.शेतकऱ्यांकडून वसुली होत नाही?या प्रकाराबाबत धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता यासटवार यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, शेतकऱ्यांकडून वसुलीची रक्कम बरोबर प्राप्त होत नाही. आतापर्यंत वीज कंपनीचे १७ लाख रूपयांचे बिल थकीत आहे. पाण्याचा उपयोग शेतकरी करतील व बिलाचा भरणा शासन कसा करेल, असे शासनाचे म्हणणे आहे. काही प्रमाणात रक्कम भरून वीज जोडणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.