शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

गोंदियातील नवेगाव प्रकल्पात हजारो पर्यटक वन पर्यटनाला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 12:59 IST

Gondia News Navegaon project मागील वर्षातील आकडेवारी बघता सुमारे २० हजार पर्यटक वन पर्यटनाला कोरोनामुळे मुकले आहेत. तर यामुळे वन विभागाचे सुमारे १८ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचेही दिसत आहे.

ठळक मुद्देमागील आकडेवारीवरून अंदाज सुमारे १८.५५ लाख रूपयांचे नुकसान

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सिमेंट कॉँक्रीटच्या जंगलातून निघून काही काळ निसर्गाच्या सानिध्यात निवांत घालविण्यासाठी आज सर्वांचीच धडपड सुरू असल्याचे दिसते. यासाठीच नागरिकांचा कल आता मोठ्या शहरांमध्ये न जाता वन पर्यटनाला जास्त पसंती देत आहेत. जिल्हावासीयांना यासाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वरदान ठरत आहे. मात्र कोरोनामुळे वन पर्यटनाच्या मार्च ते जून या मुख्य हंंगामात प्रकल्प बंद होते. परिणामी मागील वर्षातील आकडेवारी बघता सुमारे २० हजार पर्यटक वन पर्यटनाला मुकले आहेत. तर यामुळे वन विभागाचे सुमारे १८ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचेही दिसत आहे.

माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट कॉंक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या माणसालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सानिध्याची गरज भासत असून यासाठी वन विभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहे. हेच कारण आहे की, शहरी नागरिकांचा कल आता वन पर्यटनाकडे दिसत आहे. विशेष म्हणजे, जिल्हावासीयांसाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वरदान ठरत असून येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.

यासाठी जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सन २०१९ मधील मार्च ते जून महिन्यातील पर्यटकांची आकडेवारी बधितल्यास मार्च महिन्यात महिन्यात ३७८५ पर्यटकांनी प्रकल्पाला भेट दिली असून यातून वनविभागाला तीन लाख ५४ हजार १७ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. एप्रिल महिन्यात ४६२० पर्यटकांनी भेट दिली असून चार लाख ६९ हजार ३८० रुपए, मे महिन्यात ६५४० पर्यटकांनी भेट दिली असून पाच लाख ७३ हजार ६०५ रुपए तर जून महिन्यात ५५६७ पर्यटकांनी प्रकल्पाला भेट दिली असून यातून व विभागाला चार लाख ५८ हजार ५५ रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. म्हणजेच, एकूण ४ महिन्यांत व्याघ्र प्रकल्पाला २० हजार ५१२ पर्यटकांनी भेट दिली असून वन विभागाच्या तिजोरीत १८ लाख ५५ हजार ५७ रुपए आले आहेत.

यंदा मात्र कोरोनामुळे मार्च महिन्यातच लॉकडाऊन करण्यात आले व त्यामुळे ऐन हंगामातच व्याघ्र प्रकल्प बंद झाले व ते आतापर्यंत बंदच आहे. अशात मागील वषार्तील पर्यटक त्यांच्यापासून प्राप्त उत्पन्नाला बघता यावर्षी सुमारे २० हजार पर्यटक वन पर्यटनाला मुकले असून त्यापासून सुमारे १८ लाख रूपयांच्या उत्पन्नाला वन विभाग मुकला असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य