शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

हजारो क्विंटल धान उघड्यावर

By admin | Updated: June 25, 2015 00:51 IST

शेतकऱ्यांसाठी आस्मानी संकट नवीन नाही, ते तर त्यांच्या पाचवीलाच पुजले आहे.

लोकप्रतिनिधी मूग गिळून : शेतकऱ्यांवर आसमानी व सुलतानी अवकृपा संतोष बुकावन अर्जुनी मोरगावशेतकऱ्यांसाठी आस्मानी संकट नवीन नाही, ते तर त्यांच्या पाचवीलाच पुजले आहे. परंतु यात सुलतानी संकटाची भर पडल्याचे चित्र दिसून येते. तालुक्यातील काही धान खरेदी केंद्रावर वजनकाटा करण्यासाठी हजारों क्विंटल धान उघड्यावर पडले आहे तर काही केंद्रावर अजिबात गर्दी नाही. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने ठरवून दिलेल्या खरेदी केंद्राच्या सक्तीमुळे शेतकरी त्रासले आहेत. मताच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांच्या हिताची मुक्ताफळे उधळणारे लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत.खरीप हंगाम गेला, धानाला भाव नाही, उन्हाळी पीक निघाले, आता धान खरेदी करणाऱ्या संस्था पिळवणूक करीत आहेत. २०, २१ व २२ जून रोजी संततधार पाऊस सुरू होता. शेतकऱ्यांनी पूर्वीच धान विक्रीसाठी केंद्रावर आणून ठेवले होते. मात्र या धानाचा वजनकाटा झालाच नाही. ज्या वाहनाने धान आणले तसेच त्यात पडून होते. त्यावर कशीबशी ताडपत्री अथवा पॉलिथीन झाकून पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. तरीसुद्धा काही धानांना कोंब फुटले. सुरक्षिततेच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या एका खुल्या शेडमध्ये पाणी शिरले. त्यात धान दिसून आले. हा सर्व घोळ मार्केटिंग फेडरेशन गोंदियाच्या चुकीच्या नियोजनामुळे झाला, अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. कुठलेही शासकीय परिपत्रक अथवा जिल्हा प्रशासनाचे पत्र नसतानाही जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने तालुक्यातील गावांच्या सात खरेदी केंद्रांवर विभागणी केली. ज्या खरेदी केंद्रामध्ये गवाचे नाव नमूद आहे त्या गावातील शेतकऱ्यांनी त्याच खरेदी केंद्रावर धान विक्री करणे बंधनकारक आहे, असे पत्रक काढले व त्याच पद्धतीने धान खरेदी केले. यापूर्वी असा नियम नव्हता. तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही केंद्रावर धान विक्रीची मुभा होती. या सक्तीमुळे ठराविक केंद्रावर रांगा दिसून येत होत्या. तर काही खरेदी केंद्रावर अगदी शुकशुकाट होता. रविवारला (दि.२१) दिवसभर पाऊस सुरू होता. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका खरेदी केंद्रावर सायंकाळी ६ वाजता धान मोजणी सुरू होती व अनेक ट्रॅक्टरमध्ये ताडपत्री लावून धान मोजणीसाठी शेतकरी प्रतीक्षा करीत होते. तर लगतच्याच दुसऱ्या धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी धान नसल्याने ते कुलूपबंद होते. फेडरेशनने केलेल्या सक्तीचा हा दुष्परिणाम होता.सतत तीन दिवस आलेल्या पावसामुळे धानात ओलावा आला. फेडरेशनच्या नियोजनशून्य अशा कारभारामुळे संस्था अधिकचा ओलावा असल्याचे नाटक रचून शेतकऱ्यांकडून ओलाव्यापोटी अधिकचे धान घेणार. एकदा विक्रीसाठी आलेले धान शेतकरी परत नेणार नाही या संधीचा संस्था पुरेपूर फायदा घेणार आहेत. यात शेतकऱ्यांचा कुठलाही दोष नाही. मार्केटिंग फेडरेशनच्या नियोजनशून्य कारभाराचा हा दोष आहे. मात्र यात शेतकरी बळीचा बकरा बनत आहे. यावर्षी अगदी धान खरेदी सुरू झाली तेव्हापासूनच कडक उन्ह असतानासुद्धा ओलावा व तूट म्हणून संस्थांनी ४० किलो धानामागे ४१ किलो प्रमाणे वजन घेतले. या अधिकच्या एक किलो फरकाची रक्कम लाखों रुपयांच्या घरात जाते. यावर मार्केटिंग फेडरेशनचे वरदहस्त आहे. सदर प्रतिनिधीने जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा हा प्रकार बंद करण्याचे सांगितले होते. या ठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाचे तीन कर्मचारी देखरेखीसाठी पाठविण्यात आले. त्यांच्या डोळ्यादेखत धान खरेदी करणाऱ्या संस्था ४० ऐवजी ४१ किलोचे वजन घेत आहेत. यात सर्व श्रृंखला जुळलेली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. पावसात धान भिजण्याच्या भीतीपोटी त्वरित आपला नंबर लावण्यासाठी ५०० रुपये मागणी असल्याचीही शेतकऱ्यांची तक्रार आहे.