शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोहमारा ते सिरपूर रस्त्यावर हजारो खड्डे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:26 IST

देवरी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पावसाळ्यात देवरीवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, गिट्टी व डांबर वाहून ...

देवरी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पावसाळ्यात देवरीवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, गिट्टी व डांबर वाहून गेल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे याला राष्ट्रीय महामार्ग म्हणायचे काय, असा प्रश्न नागरिक करत आहे. या मार्गावरील टोलवसुली बंद करण्याची मागणी केली आहे.

तालुक्यातील सिरपूर ते भिलेवाडा (भंडारा) पर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग अशोक हायवे प्रा. लि. कंपनीव्दारा बीओटी तत्त्वावर तयार करण्यात आला आहे. बांधा, वापरा व हस्तांतरीत करा या तत्त्वावर बांधण्यात आलेल्या या रस्त्याची देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी असूनही कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे. शहरातून हा राष्ट्रीय महामार्ग गेला असून शहरातसुद्धा जागोजागी खड्डे पडले आहेत. सिरपूरपर्यंत रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे. भर्रेगाव व रूप रिसोर्टजवळ रस्ता पूर्णपणे उखडला असून, यावरून प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्याचप्रमाणे वाहनसुद्धा बऱ्याच प्रमाणात खराब होत आहेत.

चौपदरीकरण असलेल्या या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज १० हजार लहान-मोठे वाहन ये-जा करतात. या वाहनांकडून शेंदूरवाफा येथे ७० ते ४०० रुपये पर्यंत टोलवसुली घेतली जाते. परंतु रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अगोदर रस्ता दुरुस्त करा व नंतरच टोल घ्या अन्यथा टोलवसुली बंद करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

----------------------

टोल कंपनी व महामार्ग प्राधिकरणावर गुन्हे दाखल करा.

विशेष म्हणजे, दरवर्षी या महामार्गाच्या खड्ड्यांत पडून शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यात दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. परंतु कुणीही त्यांना मदत केली नाही. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन कोणी जखमी अथवा मयत झाल्यास त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासन व संबंधित टोल कंपनीला जबाबदार धरून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.