शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

तलावातील हजारो माशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:24 IST

नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्राम रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर परिसरातील जोडाबोडी तलावात हजारो मासे मरण पावल्याचे शुक्रवारी (दि.२८) सकाळी आढळून आले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणारे दुर्गाप्रसाद रहेकावार, भाऊलाल भविरया व संस्थेचे दिड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमत्स्य व्यवसायी अडचणीत : दोन ते अडीच लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्राम रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर परिसरातील जोडाबोडी तलावात हजारो मासे मरण पावल्याचे शुक्रवारी (दि.२८) सकाळी आढळून आले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणारे दुर्गाप्रसाद रहेकावार, भाऊलाल भविरया व संस्थेचे दिड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. अचानक हजारो मासे मरण पावल्याने कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले किंवा उष्णतेमुळे मासे मरण पावले असण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे.गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेकांनी या तलावात मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाºया रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर परीसरातील जोडाबोडी तलाव मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून भाडे तत्त्वावर घेण्यात येत आहे. तलावात मत्स्य व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गुजारण करतात. अनेक अडचणींवर मात करून ते हा मत्स्य व्यवसाय करतात. आजूबाजूला राहणाऱ्यांना मासे मरण पावल्याचे दिसले.परंतू रात्रभरात संपुर्ण तलावातील हजारो मासे मरण पावल्याचे शुक्रवारी (दि.२८) पहाटे माहीती झाले. सकाळी ५ वाजतापासून मेलेले मासे काढण्याचे काम केले असता सुमारे १० ते १५ क्विंटल मासे मरण पावल्याचे दिसून आले. त्यामुळे संस्थेचे दिड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच तलावातील पाणी सुद्धा दुषीत झाले आहे. तलावातील पाणी साठवन क्षमतेच्या १५ ते २० टक्के पाणी साठा असून सुद्धा मासे अचानक मरण पावल्यामुळे कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले असावे किंवा उष्णतेमुळे मासे मृत्यू पावले असावे याबाबत चर्चा सुरू आहेत. घटनेची चौकशी करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष भाऊलाल भविरया, सचिव दुर्गाप्रसाद रहेकवार व संचालक मंडळांनी मत्स्य विभागाकडे मागणी केली आहे.