शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

वनहक्क समित्यांअभावी हजारो दावे प्रलंबित

By admin | Updated: August 13, 2016 00:14 IST

उपविभागीय कार्यालयाची स्थापना होऊन सात महिन्यांचा कालावधी लोटला मात्र अद्यापही उपविभागीय वनहक्क समिती गठीत झाली नाही.

वन प्रशासनाचे दुर्लक्ष : दावे दाखल करणाऱ्यांत रोष अर्जुनी-मोरगाव : उपविभागीय कार्यालयाची स्थापना होऊन सात महिन्यांचा कालावधी लोटला मात्र अद्यापही उपविभागीय वनहक्क समिती गठीत झाली नाही. यामुळे तब्बल दोन हजारांवर वनहक्के दावे प्रलंबित असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. या प्रकारामुळे वन जमिनीवर अतिक्रमण करुन पट्टे मिळण्यासाठी दावे दाखल करणाऱ्यांमधून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. येथे उपविभागीय कार्यालयाची स्थापना होऊन सात महिने लोटले. प्रभारी उपविभागीय अधिकाऱ्यांची पदस्थापना झाली. मात्र अद्यापही वनहक्क समितीच गठीत झाली नाही. एकीकडे महाराजस्व अभियानाच्या नावावर समाधान शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना घरोघरी पोहोचविण्याच्या नावावर लाखो रुपयांची उधळण केली जात आहे. तर दुसरीकडे समितीचे गठन न करता आदिवासी जनतेच्या डोळ्यात धूळ झोकल्या जात आहे. सध्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ‘आपले शासन-आपल्या दारी’ योजनेचा उदोउदो केला जात आहे. यासाठी सारी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. मात्र प्रशासनाच्या अशा या धोरणामुळे ग्रामीण जनतेची गळचेपी होत आहे. उपविभागीय वन हक्क समिती स्थापनेसाठी सदस्य पाठविण्याचे पत्र स्थानिक उपविभागीय कार्यालयाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले. त्यांनी अद्यापही सदस्यांची नावे पाठविली नाहीत. अशी माहिती स्थानिक कार्यालयाने दिली. या समितीमध्ये उपविभागीय अधिकारी हे अध्यक्ष असतात. प्रकल्प अधिकारी आदिवासी प्रकल्प हे सचिव तर सदस्य म्हणून उपवनसंरक्षक, तहसीलदार, खंडविकास अधिकारी व पं.स.मधील नामनिर्देशित व्यक्ती यांचा समावेश असतो. प्रशासनाकडून अद्यापपर्यंत ठोेस अशी कुठलीही कार्यवाही न झाल्यामुळे अद्यापही ही समिती गठीत होऊ शकली नाही. येथील कार्यालयात सुमारे दोन हजार प्रकरणे तयार आहेत. मात्र समितीच्या स्वाक्षरीसाठी घोडे अडले आहे. त्यामुळे हे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे जाऊ शकले नाही. ग्रामपातळी व तालुकास्तरीय वन हक्क समित्यांचे पूर्नगठन करण्यासंबंधाने जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिलेल्या आहेत. तालुका प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींना समिती पुर्नगठीत करण्यासाठी पत्र दिले आहे. मात्र या समित्यांचे सुद्धा केव्हा पुर्नगठन होते हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करुन त्यासाठी मुख्यमंत्र्यांना बोलविण्याचा कार्यक्रम आखला आहे. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाने समाधान अर्ज भरुन द्यावयाचा आहे. यात शासनाच्या ४८ योजनांचा लाभ मिळतो किंवा नाही अशी माहिती मागविली आहे. यात वन हक्क समितीच्या पट्टे वाटपाचा मुद्दा आहे. मात्र गेल्या सात महिन्यांपासून समिती गठीत नसल्याने आदिवासी बांधवांची थट्टा केली जात आहे. वन हक्क समिती स्थापन न करता जनतेवर जखम आपणच करायची व नंतर प्रलंबित दोन हजार प्रकरणे निकाली काढून मलम लावल्याचा भास करायचा अशा हा प्रकार असल्याच्या चर्चा येथे आहेत. (तालुका प्रतिनिधी)