शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
3
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...

जिल्हा प्रशासनाच्या रुपात त्या बालकांना मिळाले विठ्ठल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव : माय-बाप गमावल्यानंतर त्या निरागस बालकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन धावून आले. २० कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी पाचशे ...

संतोष बुकावन

अर्जुनी मोरगाव : माय-बाप गमावल्यानंतर त्या निरागस बालकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन धावून आले. २० कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांप्रमाणे त्या बालकांना एक वर्षांपर्यंत दरमहा दहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या रुपात त्यांना विठ्ठलच मिळाले. या मदतीमुळे पुन्हा एकदा जिल्हावासीयांना सहृदयतेचा प्रत्यय आला.

अर्जुनी मोरगाव येथील कोलते दाम्पत्याचा पाच महिन्यांत मृत्यू झाला. ‘लोकमत’ने ‘‘आई गेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला’’ या शीर्षकाखाली शनिवारच्या (दि.३) अंकात वृत्त प्रकाशित केले. वृत्त वाचून गोंदियाचे जिल्हाधिकारी राजेश खवले यांचे मन हेलावले. त्यांनी त्या निरागस बालकांच्या मदतीसाठी आवाहन केले अन्‌ मदतीचा ओघ सुरू झाला. मदतीच्या या ओघामुळे जिल्ह्यात सकारात्मकतेचे वारे वाहत असल्याची प्रचिती येत आहे. अर्जुनी मोरगाव येथे अनाथ झालेल्या मुलांच्या मदतीसाठी सरकारी अधिकारी नाथ बनून धावून आले होते. सालेकसा तालुक्यातील मोहोरे कुटुंबाच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी त्या लहान मुलींचे भाऊ बनून धावून आले होते. गोरेगाव तालुक्यातील खडीपार गावामध्ये जेव्हा दोन चिमुकल्या बालिकांनी त्यांचे आईवडील गमावले आणि ८० वर्षाच्या वृद्ध आजीवर त्या दोन निरागस बालिकांचा सांभाळ करण्याची पाळी आली. तेव्हा जिल्हा प्रशासनातील अधिकारी त्या आजीचे मुले बनले आणि त्यांनी मदत केली. रक्ताचा मुलगा गमावलेल्या त्या आईला तब्बल २१ क्लास वन अधिकारी मुले म्हणून मिळालीत.

..........

हे कर्मचारी आले धावून

‘ लोकमत’ने ही व्यथा प्रकाशित केल्यानंतर गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी मदतीकरिता पुढे यावे, असे आवाहन केले आणि या आवाहनाला प्रतिसाद देत किशोर राठोड, राजेश मेनन, आकाश चव्हाण, धोंडिराम कातकडे, पुरवठा विभागाचे हांडे, तलाठी रवीकुमार नरेंद्रकुमार गुप्ता, नरेश तागडे, एन. ए. शेख, रवींद्र तितरे, पुंडलिक कुंभरे, शैलेस नंदेश्वर, व्याखाता प्रवीण गेडाम, राज्य उत्पादन शुल्क विभाग देवरीचे दुय्यम निरीक्षक सुहास झांजुर्णे, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे स्वीय सहायक मोहन साठे, मंडळ अधिकारी एन. बी. वर्मा, महसूल सहायक मधू दोनोडे, तलाठी श्रीमती ठाकरेले, तलाठी अमित बडोले, नायब तहसीलदार आर. एन. पालांदूरकर व कोतवाल कपिल हारोडे हे कर्मचारी कोलते कुटुंबाच्या मदतीसाठी धावून आले.

..........

प्रशासनात माणुसकी जिवंत

प्रशासनामध्ये काम करताना संवेदनशीलता जोपासणे, आपले हृदय कोमल असणे, इतरांचे दुःख पाहून डोळ्यात पाणी येणे या बाबी अतिशय महत्त्वाच्या म्हटल्या पाहिजेत ! गोंदिया जिल्हा प्रशासनामध्ये या बाबींची कुठेही उणीव नाही. गोंदिया जिल्हा प्रशासनामध्ये व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये माणुसकी अजूनही जिवंत आहे हे या प्रसंगातून ठळकपणे दिसून येत आहे.