शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
3
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
4
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
5
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
6
लाडक्या बहिणींना मिळणार १ लाखापर्यंत विशेष कर्ज; दीड हजारांच्या मानधनातून हप्ते वळते होणार
7
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
8
Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
9
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
10
नवरात्री २०२५: अष्टमीला देवीसमोर घागरी फुंकण्याने अंगात संचार होतो? काय आहे ही प्रथा?
11
नवीन ट्रेंड्स फॉलो करणाऱ्यांनो सावधान! तुम्हीही ‘तो’ फोटो शेअर केला का ?; समोर आलं मोठं संकट
12
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
13
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
14
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
15
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
16
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
17
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
18
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
19
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
20
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'

‘त्या’ ३४१ गावात चावडी वाचनाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 22:29 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने चावडी वाचन कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला होता.

ठळक मुद्देग्रा.पं. निवडणुकीमुळे निर्माण झाली होती अडचण : कर्जमाफी प्रक्रियेला विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने चावडी वाचन कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबरला पार पडल्यानंतर सोमवार (दि.२३) पासून चावडी वाचनाला सुरूवात करण्यात आली आहे. यानंतर किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले, हे निश्चित होणार आहे.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर या अर्जांची छाननी आणि चावडी वाचनानंतर कर्जमाफीची रक्कम संबंधीत पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केली जाणार होती. चावडी वाचनादरम्यान ज्या शेतकºयांच्या नावावर आक्षेप घेण्यात येईल, ती नावे वगळून चौकशीनंतर लाभ दिला जाणार होता. ही संपूर्ण प्रक्रिया १५ ते २० दिवसांपूर्वीच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र जिल्ह्यात १६ आॅक्टोबरला ३४१ ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने त्यासाठी आचार संहिता लागू होती. परिणामी या काळात चावडी वाचन घेता येत नव्हते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका असलेल्या ३४१ गावांमध्ये निवडणुकीनंतर चावडी वाचन घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यानुसार सोमवार (दि.२३) या गावांमध्ये चावडी वाचनास सुरूवात झाली आहे. सहकार निबंधक कार्यालयाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार चावडी वाचनादरम्यान जे शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. त्यांच्या नावांची यादी वाचली जात आहे. त्यानंतर ही यादी राज्य शासनाकडे पाठविली जाणार आहे. आत्तापर्यंत १०२ कर्जमाफीस पात्र शेतकºयांची अंतीम यादी सरकारकडे पाठविली असून यापैकी २३ शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. ३४१ गावांमध्ये चावडी वाचनाची प्रक्रिया किमान पंधरा दिवस चालणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी दोन महिने प्रतिक्षा करावी लागणार असल्याची माहिती आहे.तीन याद्या तयार होणारशेतकरी कर्जमाफीकरिता आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांच्या तीन याद्या तयार केल्या जाणार आहेत. यासाठी हिरव्या रंगाच्या यादीत पात्र लाभार्थी, लाल रंगाच्या यादीत अपात्र लाभार्थी, आणि पिवळ्या रंगाच्या यादीत अर्जांमध्ये त्रृटी असलेल्या शेतकºयांचा समावेश आहे. यासर्व याद्या तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालय आणि नंतर शासनाला पाठविण्यात येणार आहे.