शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

‘त्या’ ३४१ गावात चावडी वाचनाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 22:29 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने चावडी वाचन कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला होता.

ठळक मुद्देग्रा.पं. निवडणुकीमुळे निर्माण झाली होती अडचण : कर्जमाफी प्रक्रियेला विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने चावडी वाचन कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबरला पार पडल्यानंतर सोमवार (दि.२३) पासून चावडी वाचनाला सुरूवात करण्यात आली आहे. यानंतर किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले, हे निश्चित होणार आहे.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर या अर्जांची छाननी आणि चावडी वाचनानंतर कर्जमाफीची रक्कम संबंधीत पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केली जाणार होती. चावडी वाचनादरम्यान ज्या शेतकºयांच्या नावावर आक्षेप घेण्यात येईल, ती नावे वगळून चौकशीनंतर लाभ दिला जाणार होता. ही संपूर्ण प्रक्रिया १५ ते २० दिवसांपूर्वीच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र जिल्ह्यात १६ आॅक्टोबरला ३४१ ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने त्यासाठी आचार संहिता लागू होती. परिणामी या काळात चावडी वाचन घेता येत नव्हते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका असलेल्या ३४१ गावांमध्ये निवडणुकीनंतर चावडी वाचन घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यानुसार सोमवार (दि.२३) या गावांमध्ये चावडी वाचनास सुरूवात झाली आहे. सहकार निबंधक कार्यालयाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार चावडी वाचनादरम्यान जे शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. त्यांच्या नावांची यादी वाचली जात आहे. त्यानंतर ही यादी राज्य शासनाकडे पाठविली जाणार आहे. आत्तापर्यंत १०२ कर्जमाफीस पात्र शेतकºयांची अंतीम यादी सरकारकडे पाठविली असून यापैकी २३ शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. ३४१ गावांमध्ये चावडी वाचनाची प्रक्रिया किमान पंधरा दिवस चालणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी दोन महिने प्रतिक्षा करावी लागणार असल्याची माहिती आहे.तीन याद्या तयार होणारशेतकरी कर्जमाफीकरिता आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांच्या तीन याद्या तयार केल्या जाणार आहेत. यासाठी हिरव्या रंगाच्या यादीत पात्र लाभार्थी, लाल रंगाच्या यादीत अपात्र लाभार्थी, आणि पिवळ्या रंगाच्या यादीत अर्जांमध्ये त्रृटी असलेल्या शेतकºयांचा समावेश आहे. यासर्व याद्या तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालय आणि नंतर शासनाला पाठविण्यात येणार आहे.