शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ३४१ गावात चावडी वाचनाला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 22:29 IST

जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने चावडी वाचन कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला होता.

ठळक मुद्देग्रा.पं. निवडणुकीमुळे निर्माण झाली होती अडचण : कर्जमाफी प्रक्रियेला विलंब

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने चावडी वाचन कार्यक्रम लांबणीवर टाकण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबरला पार पडल्यानंतर सोमवार (दि.२३) पासून चावडी वाचनाला सुरूवात करण्यात आली आहे. यानंतर किती शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले, हे निश्चित होणार आहे.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर या अर्जांची छाननी आणि चावडी वाचनानंतर कर्जमाफीची रक्कम संबंधीत पात्र शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केली जाणार होती. चावडी वाचनादरम्यान ज्या शेतकºयांच्या नावावर आक्षेप घेण्यात येईल, ती नावे वगळून चौकशीनंतर लाभ दिला जाणार होता. ही संपूर्ण प्रक्रिया १५ ते २० दिवसांपूर्वीच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र जिल्ह्यात १६ आॅक्टोबरला ३४१ ग्रामपंचायतींची निवडणूक असल्याने त्यासाठी आचार संहिता लागू होती. परिणामी या काळात चावडी वाचन घेता येत नव्हते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुका असलेल्या ३४१ गावांमध्ये निवडणुकीनंतर चावडी वाचन घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. त्यानुसार सोमवार (दि.२३) या गावांमध्ये चावडी वाचनास सुरूवात झाली आहे. सहकार निबंधक कार्यालयाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार चावडी वाचनादरम्यान जे शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले आहेत. त्यांच्या नावांची यादी वाचली जात आहे. त्यानंतर ही यादी राज्य शासनाकडे पाठविली जाणार आहे. आत्तापर्यंत १०२ कर्जमाफीस पात्र शेतकºयांची अंतीम यादी सरकारकडे पाठविली असून यापैकी २३ शेतकºयांना कर्जमाफी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले आहे. ३४१ गावांमध्ये चावडी वाचनाची प्रक्रिया किमान पंधरा दिवस चालणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कर्जमाफीस पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी दोन महिने प्रतिक्षा करावी लागणार असल्याची माहिती आहे.तीन याद्या तयार होणारशेतकरी कर्जमाफीकरिता आॅनलाईन अर्ज केलेल्या शेतकºयांच्या तीन याद्या तयार केल्या जाणार आहेत. यासाठी हिरव्या रंगाच्या यादीत पात्र लाभार्थी, लाल रंगाच्या यादीत अपात्र लाभार्थी, आणि पिवळ्या रंगाच्या यादीत अर्जांमध्ये त्रृटी असलेल्या शेतकºयांचा समावेश आहे. यासर्व याद्या तयार करुन जिल्हाधिकारी कार्यालय आणि नंतर शासनाला पाठविण्यात येणार आहे.