शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

अस्वल शिकारप्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

By admin | Updated: February 17, 2017 01:43 IST

गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तिल्ली-मोहगाव येथे १० फेब्रुवारीला झालेल्या अस्वल शिकार प्रकरणात आरोपींची संख्या आता तीन झाली आहे.

आज संपणार वनकोठडी : तिन्ही आरोपींकडे वेगवेगळे अवयव गोंदिया : गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तिल्ली-मोहगाव येथे १० फेब्रुवारीला झालेल्या अस्वल शिकार प्रकरणात आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. या तिन्ही आरोपींकडे अस्वलाच्या शरीराचे वेगवेगळे अवयव मिळाल्याचे वन विभागातील सूत्रांनी सांगितले. मात्र अस्वलाचे हे अवयव ते कोणाला विकणार होते? त्याचा उपयोग कशासाठी केला जाणार होता? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यात वनविभागाला अद्याप यश आलेले नाही.अटकेत असलेल्या आरोपींपैकी सुखदेव रामचंद्र भांडारकर (५९), यादोराव गजानन रहांगडाले (५१) यांची वनकोठडी दि.१७ ला संपणार आहे. दरम्यान या प्रकरणात भास्कर चिंदाकूर (३०) रा.तिल्ली यालाही अटक करण्यात आली. या आरोपींच्या वनकोठडीत वाढ होण्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. शिवाय या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.गोरेगाव वनपरिक्षेत्रातांतर्गत तिल्ली-मोहगाव येथील शेतात विद्युत करंट लावून अस्वलाची शिकार करण्यात आली. यानंतर अस्वलाच्या शरीराचे अनेक अवयव काढून पुरावा नष्ट करण्यासाठी मृत अस्वलाला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आरएफओ एस.एन. जाधव सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अस्वलाचे लिंग, नख, काळीज, दात व इतर काही आंतरित अवयव काढून घेण्यात आल्याचे आढळले. पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सरगर यांनी उत्तरीय तपासणी केली व अवयव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. यानंतर चार दिवसातच श्वानाच्या मदतीने तीन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळील अस्वलाचे अवयव जप्त करण्यात आले. अस्वलाची शिकार अंधश्रद्धेतून करण्यात आली नसल्याचे सांगितले.अधिकाऱ्यांच्या तपासावर प्रश्नचिन्हया प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांच्याकडून भ्रमणध्वनीवरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ते कॉल स्वीकारण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले. त्या अस्वलाची शिकारच झाली यावरही वनविभागाचे अधिकारी अद्याप ठाम नाहीत. अस्वलाचा नैसर्गिक मृत्यू झाला असण्याची शक्यताही अधिकारी वर्तवित आहे. त्यामुळे आरोपींना वाचविण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे. विशेष म्हणजे अस्वलाच्या अवयवांची विक्री कोणाला होणार होती, त्याचा वापर कोण आणि कशासाठी करणार होते, याचा सखोल तपास करून प्रकरणाच्या शेवटपर्यंत जावे अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.