शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

अस्वल शिकारप्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

By admin | Updated: February 17, 2017 01:43 IST

गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तिल्ली-मोहगाव येथे १० फेब्रुवारीला झालेल्या अस्वल शिकार प्रकरणात आरोपींची संख्या आता तीन झाली आहे.

आज संपणार वनकोठडी : तिन्ही आरोपींकडे वेगवेगळे अवयव गोंदिया : गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तिल्ली-मोहगाव येथे १० फेब्रुवारीला झालेल्या अस्वल शिकार प्रकरणात आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. या तिन्ही आरोपींकडे अस्वलाच्या शरीराचे वेगवेगळे अवयव मिळाल्याचे वन विभागातील सूत्रांनी सांगितले. मात्र अस्वलाचे हे अवयव ते कोणाला विकणार होते? त्याचा उपयोग कशासाठी केला जाणार होता? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यात वनविभागाला अद्याप यश आलेले नाही.अटकेत असलेल्या आरोपींपैकी सुखदेव रामचंद्र भांडारकर (५९), यादोराव गजानन रहांगडाले (५१) यांची वनकोठडी दि.१७ ला संपणार आहे. दरम्यान या प्रकरणात भास्कर चिंदाकूर (३०) रा.तिल्ली यालाही अटक करण्यात आली. या आरोपींच्या वनकोठडीत वाढ होण्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. शिवाय या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.गोरेगाव वनपरिक्षेत्रातांतर्गत तिल्ली-मोहगाव येथील शेतात विद्युत करंट लावून अस्वलाची शिकार करण्यात आली. यानंतर अस्वलाच्या शरीराचे अनेक अवयव काढून पुरावा नष्ट करण्यासाठी मृत अस्वलाला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आरएफओ एस.एन. जाधव सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अस्वलाचे लिंग, नख, काळीज, दात व इतर काही आंतरित अवयव काढून घेण्यात आल्याचे आढळले. पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सरगर यांनी उत्तरीय तपासणी केली व अवयव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. यानंतर चार दिवसातच श्वानाच्या मदतीने तीन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळील अस्वलाचे अवयव जप्त करण्यात आले. अस्वलाची शिकार अंधश्रद्धेतून करण्यात आली नसल्याचे सांगितले.अधिकाऱ्यांच्या तपासावर प्रश्नचिन्हया प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांच्याकडून भ्रमणध्वनीवरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ते कॉल स्वीकारण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले. त्या अस्वलाची शिकारच झाली यावरही वनविभागाचे अधिकारी अद्याप ठाम नाहीत. अस्वलाचा नैसर्गिक मृत्यू झाला असण्याची शक्यताही अधिकारी वर्तवित आहे. त्यामुळे आरोपींना वाचविण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे. विशेष म्हणजे अस्वलाच्या अवयवांची विक्री कोणाला होणार होती, त्याचा वापर कोण आणि कशासाठी करणार होते, याचा सखोल तपास करून प्रकरणाच्या शेवटपर्यंत जावे अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.