शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

अस्वल शिकारप्रकरणी तिसऱ्या आरोपीला अटक

By admin | Updated: February 17, 2017 01:43 IST

गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तिल्ली-मोहगाव येथे १० फेब्रुवारीला झालेल्या अस्वल शिकार प्रकरणात आरोपींची संख्या आता तीन झाली आहे.

आज संपणार वनकोठडी : तिन्ही आरोपींकडे वेगवेगळे अवयव गोंदिया : गोरेगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तिल्ली-मोहगाव येथे १० फेब्रुवारीला झालेल्या अस्वल शिकार प्रकरणात आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. या तिन्ही आरोपींकडे अस्वलाच्या शरीराचे वेगवेगळे अवयव मिळाल्याचे वन विभागातील सूत्रांनी सांगितले. मात्र अस्वलाचे हे अवयव ते कोणाला विकणार होते? त्याचा उपयोग कशासाठी केला जाणार होता? या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यात वनविभागाला अद्याप यश आलेले नाही.अटकेत असलेल्या आरोपींपैकी सुखदेव रामचंद्र भांडारकर (५९), यादोराव गजानन रहांगडाले (५१) यांची वनकोठडी दि.१७ ला संपणार आहे. दरम्यान या प्रकरणात भास्कर चिंदाकूर (३०) रा.तिल्ली यालाही अटक करण्यात आली. या आरोपींच्या वनकोठडीत वाढ होण्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. शिवाय या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे.गोरेगाव वनपरिक्षेत्रातांतर्गत तिल्ली-मोहगाव येथील शेतात विद्युत करंट लावून अस्वलाची शिकार करण्यात आली. यानंतर अस्वलाच्या शरीराचे अनेक अवयव काढून पुरावा नष्ट करण्यासाठी मृत अस्वलाला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आरएफओ एस.एन. जाधव सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अस्वलाचे लिंग, नख, काळीज, दात व इतर काही आंतरित अवयव काढून घेण्यात आल्याचे आढळले. पशूवैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सरगर यांनी उत्तरीय तपासणी केली व अवयव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. यानंतर चार दिवसातच श्वानाच्या मदतीने तीन आरोपींना अटक करून त्यांच्याजवळील अस्वलाचे अवयव जप्त करण्यात आले. अस्वलाची शिकार अंधश्रद्धेतून करण्यात आली नसल्याचे सांगितले.अधिकाऱ्यांच्या तपासावर प्रश्नचिन्हया प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांच्याकडून भ्रमणध्वनीवरून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ते कॉल स्वीकारण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून आले. त्या अस्वलाची शिकारच झाली यावरही वनविभागाचे अधिकारी अद्याप ठाम नाहीत. अस्वलाचा नैसर्गिक मृत्यू झाला असण्याची शक्यताही अधिकारी वर्तवित आहे. त्यामुळे आरोपींना वाचविण्याचा तर प्रयत्न केला जात नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे. विशेष म्हणजे अस्वलाच्या अवयवांची विक्री कोणाला होणार होती, त्याचा वापर कोण आणि कशासाठी करणार होते, याचा सखोल तपास करून प्रकरणाच्या शेवटपर्यंत जावे अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.