शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

सडक-अर्जुनी तालुक्यात चोरांचा सुळसुळाट

By admin | Updated: June 2, 2017 01:31 IST

सडक-अर्जुनी तालुक्यात मागील पंधरवाड्यापासून चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. बाहेर राज्यातील चोरांनी गोंदिया जिल्हा निवडला

दहशत कायम : डुग्गीपार पोलिसांच्या सतर्कतेवर प्रश्नचिन्हलोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : सडक-अर्जुनी तालुक्यात मागील पंधरवाड्यापासून चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. बाहेर राज्यातील चोरांनी गोंदिया जिल्हा निवडला असून त्यातही सडक-अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक चोरीच्या घटना घडत आहेत. चोरांच्या सुळसुळाटाने नागरिक भयभीत झाले आहेत.विशेष म्हणजे हे चोर सर्वसाधारण असून वेड्यासारखे दिसतात. सौंदड येथे बुधवारी बाजारात एका अनोळखी तरूणाने बाजार करणाऱ्या इसमाचा मोबाईल चोरला. एवढ्यात लोकांनी त्याला पकडले व सामूहिक पिटाई केली. तेव्हा त्या चोराने आम्ही १५० लोक आहोत, असे सांगितले. त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार होते, मात्र बेशुद्ध झाल्याचे सोंग घेवून तो चोर हिसका देवून पळून गेला. तर दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी चार चोर शास्त्री वार्डात बोलेरो गाडीने आले. वार्डातील एका व्यक्तीला रात्री १.३० वाजताच्या सुमारास ते आढळले. चोरांनी त्याला धमकी दिल्याने आरडाओरड झाली व लोक जागे झाले. त्यामुळे चोरांनी पळ काढला. तर चिखली बाजारामध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या एका इसमाला बेदम मारहाण करण्यात आली. पिपरी गावामध्ये एका अनोळखी वृद्ध महिला चोरी करताना आढळली. तिला गावकऱ्यांनी पोलिसांच्या हवाली केले. तर पांढरी येथे तीन ते चार इसम चोरी करताना आढळले. तालुक्यातील गावांमध्ये वेडसर वृत्तीचे लोक आले तरी कुठून, असा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक दहशतीत आले असून त्यांना रात्रीची झोप घेणे कठिण झाले आहे. नागरिक स्वत: गस्त घालून गाव संरक्षणाचे काम करीत आहेत. रात्रीच्या वेळी अनोळखी माणसे आढळल्यास ‘चोर आलारे-आलारे’ असे आवाज देवून नागरिकांना जागे केले जात आहे. मात्र पोलिसांची कारवाई शून्यच दिसून येत आहे. अधिकाऱ्यांनी काहीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे डुग्गीपार पोलिसांच्या सतर्कतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.