शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जे जे आपणासी ठावे ते ते लोकांशी सांगावे

By admin | Updated: April 24, 2016 01:51 IST

३५ वर्षापूर्वी एखाद्या बाईने कीर्तन, प्रवचन करावे ही नवलाईची गोष्ट होती. मला या भक्तीमार्गाची गोडी होती म्हणून मी याकडे वळले.

उर्मिलाताई : ३५ वर्षांपासून जनजागृतीगोंदिया : ३५ वर्षापूर्वी एखाद्या बाईने कीर्तन, प्रवचन करावे ही नवलाईची गोष्ट होती. मला या भक्तीमार्गाची गोडी होती म्हणून मी याकडे वळले. आज अनेक महिला या क्षेत्रात आहेत. कीर्तनकार माणसंही भरपूर आहेत. पण खऱ्या अर्थाने यातून प्रबोधन करायचे असेल तर स्वत:चे आचरण आधी चांगले ठेवावे गरजेचे आहे. पण दुर्दैवाने सर्वजण याची काळजी घेत नाहीत, अशी खंत उर्मिलाताई कारेमोरे यांनी व्यक्त केली.गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील पहिल्या महिला कीर्तनकार ठरलेल्या उर्मिलाईंनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक पैलू उलगडले. वयाच्या अठराव्या वर्षापासून कीर्तन-प्रवचनाकडे त्या वगळ्या. महिलांनी कीर्तन वगैरे करण्याची परंपरा नसलेल्या काळात संसार थाटण्याकडे पाठ फिरवून कीर्तनकार कशा झाल्या, याबाबतचा सांगताना उर्मिलाताई म्हणाल्या, खरे म्हणजे माझे लग्न झाले पण मी सासरी नांदायलाच गेले नाही. लहानपणापासून साधूसंतांचे सानिध्य लाभले आणि त्यातच मी रमू लागले. घराजवळच्या हिराबाई यांच्याकडे साधू-संत येत असे. त्यांचे सानिध्य लाभले. पुढे गुरू लक्ष्मण महाराज आळंदीकर यांच्यासोबत अनेक दिवस फिरले. चव्हाण गुरूजी, संत बकाराम महाराज चारगाववाले यांनी कीर्तन करण्यासाठी प्रोत्साहित केले.सुरूवातीला आपल्या घरातच देव्हाऱ्यासमोर उभे राहून कीर्तन करीत असे. नंतर लोक कीर्तनासाठी बोलवू लागले. वारकरी संप्रदायावरील ज्ञानोबा-तुकोबांवर आधारित कीर्तनात अभंगावर आधारित निरूपण मी करते. त्यात आध्यात्मिक ज्ञानासोबत दारूबंदी, व्यसनमुक्तीवर विशेष जोर देते. त्यामुळे चंद्रपूरपासून तर पंढरपूरपर्यंत माझी कीर्तने झाली आहेत.अजूनही आपल्या म्हाताऱ्या आईसोबत राहात असलेल्या उर्मिलाताई वेळप्रसंगी उदरनिर्वाहासाठी फर्निचरचे परंपरागत काम करतात. भक्तीमार्गात मी रमत असले तरी कोणत्या आश्रमात राहून देव मिळत नाही. तो इथेच राहून मिळतो, असे उर्मिलाताई सांगतात. आता शासनाच्या समाजकल्याण विभागाने कीर्तनकारांना दीड हजार रुपये महिना देण्याची घोषणा केली आहे. त्याचा नक्कीच उदरनिर्वाहासाठी हातभार लागेल, असे त्या सांगतात. आज समाजात कीर्तनकार बरेच असले तरी स्वत: दारूला हात न लावणारे, तंबाखू, गुटखा न खाणारे किंवा कोणतेही व्यसन न करणारे किती आहेत? कीर्तनकारांनी आधी स्वत: आपले आचरण सुधारून नंतरच लोकांना सांगावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)