शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

ना हातात बसतात ना खिशात मावतात; असे मोबाईल चोरट्यांना सोयीचे ठरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:34 IST

गोंदिया : आजघडीला मोबाईल ही अत्यावश्यक बाब झाली आहे. परंतु मोबाईल हरविण्याचे किंवा चोरीचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यासंदर्भात ...

गोंदिया : आजघडीला मोबाईल ही अत्यावश्यक बाब झाली आहे. परंतु मोबाईल हरविण्याचे किंवा चोरीचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यासंदर्भात पोलिसांकडून कागदपत्राच्या होत असलेल्या कटकटीमुळे अनेक लोक तर तक्रार करायलाच पुढे येत नाहीत. मोठे मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण सर्वाधीक आहे. मोठे मोबाईल हातात ठेवता येत नाही व खिशातही मावत नाहीत. अशा मोबाईलला बसण्याच्या ठिकाणी बाजूला मांडल्यावर तो मोबाईल विसरतो परिणामी चोरीला जातो. जिल्ह्यात ८ तालुके असून १६ पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांचा आढावा घेतल्यास मोबाईल चोरी किंवा मोबाईल हरविण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. परंतु दररोज कमीत कमी ८ मोबाईल गायब होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. यापेक्षाही मोठ्या प्रमाणात मोबाईल हरवितात किंवा चोरीला जात आहेत. परंतु अनेक जण तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. मोबाईल खरेदी केल्यावर महिने-दोन महिने मोबाईलचे बिल सांभाळून ठेवले जाते. परंतु अधिक काळ झाल्यावर बिलही सांभाळले जात नाही. अशा स्थितीत मोबाईल चोरीला गेला किंवा हरविला तर मोबाईलचे बिल आणल्याशिवाय पोलीस तक्रारच घेत नाही. त्यामुळे अनेक लोक मोबाईल चोरीला गेले तरी तक्रार करायला पुढे येत नाहीत.

...............................

मोबाईल चोरीच्या घटना

२०१९- १०२

२०२०-९९

२०२१- ४४

..........................

चोरी नव्हे, गहाळ म्हणा

- एखाद्याचा मोबाईल चोरीला गेला आणि तो व्यक्ती तक्रार करायला गेला तर चोरी झाली म्हटल्यावर पोलीस तक्रार घेतच नाहीत.

- मोबाईल हरविला किंवा गहाळ झाला म्हटल्यावर पोलीस त्याची नाेंद घेतात. परंतु मोबाईल चोरीला गेल्यावर म्हणताच पोलीस तक्रारकर्त्यालाच प्रश्न विचारून हैरान करून साेडतात.

- मोबाईल चोरीला गेला तर चोरणाऱ्याचे नाव सांगा, तुम्हीच हरविला असेल आणि चोरी झाल्याची खोटी तक्रार देता असे म्हटले जाते.

- आपला वेळ पोलीस ठाण्यातच जाऊ नये यासाठी चोरी झालेला मोबाईल गहाळ झाला असे सांगून अनेकजण मोकळे होतात.

........................

या भागात मोबाईल सांभाळा

- गोंदिया शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते यासाठी येथे मोबाईल सांभाळणे आवश्यक आहे.

- मरारटोली बसस्थानक परिसरातून मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.या ठिकाणी मोबाईल सांभाळण्याची गरज आहे.

- केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील गर्दीचा फायदा घेऊन चोरटे मोबाईल पळवून नेत असतात.