शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

ना हातात बसतात ना खिशात मावतात; असे मोबाईल चोरट्यांना सोयीचे ठरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:34 IST

गोंदिया : आजघडीला मोबाईल ही अत्यावश्यक बाब झाली आहे. परंतु मोबाईल हरविण्याचे किंवा चोरीचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यासंदर्भात ...

गोंदिया : आजघडीला मोबाईल ही अत्यावश्यक बाब झाली आहे. परंतु मोबाईल हरविण्याचे किंवा चोरीचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. यासंदर्भात पोलिसांकडून कागदपत्राच्या होत असलेल्या कटकटीमुळे अनेक लोक तर तक्रार करायलाच पुढे येत नाहीत. मोठे मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण सर्वाधीक आहे. मोठे मोबाईल हातात ठेवता येत नाही व खिशातही मावत नाहीत. अशा मोबाईलला बसण्याच्या ठिकाणी बाजूला मांडल्यावर तो मोबाईल विसरतो परिणामी चोरीला जातो. जिल्ह्यात ८ तालुके असून १६ पोलीस ठाणी आहेत. या पोलीस ठाण्यांचा आढावा घेतल्यास मोबाईल चोरी किंवा मोबाईल हरविण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. परंतु दररोज कमीत कमी ८ मोबाईल गायब होत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. यापेक्षाही मोठ्या प्रमाणात मोबाईल हरवितात किंवा चोरीला जात आहेत. परंतु अनेक जण तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. मोबाईल खरेदी केल्यावर महिने-दोन महिने मोबाईलचे बिल सांभाळून ठेवले जाते. परंतु अधिक काळ झाल्यावर बिलही सांभाळले जात नाही. अशा स्थितीत मोबाईल चोरीला गेला किंवा हरविला तर मोबाईलचे बिल आणल्याशिवाय पोलीस तक्रारच घेत नाही. त्यामुळे अनेक लोक मोबाईल चोरीला गेले तरी तक्रार करायला पुढे येत नाहीत.

...............................

मोबाईल चोरीच्या घटना

२०१९- १०२

२०२०-९९

२०२१- ४४

..........................

चोरी नव्हे, गहाळ म्हणा

- एखाद्याचा मोबाईल चोरीला गेला आणि तो व्यक्ती तक्रार करायला गेला तर चोरी झाली म्हटल्यावर पोलीस तक्रार घेतच नाहीत.

- मोबाईल हरविला किंवा गहाळ झाला म्हटल्यावर पोलीस त्याची नाेंद घेतात. परंतु मोबाईल चोरीला गेल्यावर म्हणताच पोलीस तक्रारकर्त्यालाच प्रश्न विचारून हैरान करून साेडतात.

- मोबाईल चोरीला गेला तर चोरणाऱ्याचे नाव सांगा, तुम्हीच हरविला असेल आणि चोरी झाल्याची खोटी तक्रार देता असे म्हटले जाते.

- आपला वेळ पोलीस ठाण्यातच जाऊ नये यासाठी चोरी झालेला मोबाईल गहाळ झाला असे सांगून अनेकजण मोकळे होतात.

........................

या भागात मोबाईल सांभाळा

- गोंदिया शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते यासाठी येथे मोबाईल सांभाळणे आवश्यक आहे.

- मरारटोली बसस्थानक परिसरातून मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत.या ठिकाणी मोबाईल सांभाळण्याची गरज आहे.

- केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील गर्दीचा फायदा घेऊन चोरटे मोबाईल पळवून नेत असतात.