शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील रुग्णांसाठी ते ठरत आहेत देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST

केशोरी : परिसरातील जनता कोरोनाच्या संकटामुळे पूर्णत: भयभीत झालेली होती. केशोरी येथे जवळपास शंभर ते दीडशे कोरोनाबाधित रुग्ण होते. ...

केशोरी : परिसरातील जनता कोरोनाच्या संकटामुळे पूर्णत: भयभीत झालेली होती. केशोरी येथे जवळपास शंभर ते दीडशे कोरोनाबाधित रुग्ण होते. परिणामी या परिसराला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. अशा स्थितीत कोरोनाबाधित रुग्णांना धीर देण्याचे व रुग्ण बरे करण्याचे काम डॉ. पिंकू मंडल यांनी केले. ज्या कोरोनाबाधित रुग्णांचा सिटी स्कॅन स्कोअर सात, आठ, नऊ, दहा, बारापर्यंत होता, अशा रुग्णांना या ठिकाणी औषध उपचार करून पूर्णत: तंदुरुस्त करण्याचे काम केले. त्यामुळे कोरोना काळात परिसरातील रुग्णांसाठी ते देवदूतच ठरले.

कोरोना बाबतीत जी समस्‍या निर्माण झाली होती, त्या समस्येतून बाहेर काढण्याचे काम वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी केले. जे रुग्ण क्रिटिकल होते, त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर केले. एकंदरीत या परिसरात जे भयभीत वातावरण तयार झालेले होते, त्या वातावरणातून निवारण करण्याचे काम डॉ. मंडल यांनी केले. कोरोनाबाधित असलेल्या सामान्य रुग्णांना आर्थिक फटका बसणार होता, त्या आर्थिक विवंचनेतून सोडविण्याचे कामसुद्धा त्यांनी केले. आदिवासी बहुल भागामध्ये जवळपास पंधरा वर्षे ते अविरतपणे सेवा करीत आहेत. केशोरी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर आरोग्य केंद्रातील ज्या समस्या होत्या, त्या त्यांनी त्वरित सोडविल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राला एक स्वच्छ परिसर, पारदर्शक करून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आरोग्य केंद्रास भेट दिली तर आरोग्य केंद्राचा एक सुंदर परिसर आपल्याला बघायला मिळतो. आरोग्य केंद्रामध्ये रुजू झाल्यानंतर कुटुंब नियोजन या मोहिमेला सुद्धा त्यांनी महत्त्व दिले. शंभर टक्के कुटुंब नियोजनाचे कामसुद्धा त्यांनी केले. या परिसरातील ज्या व्यक्तीने विष प्राशन केलेले असते, त्या व्यक्तींना कुठे न पाठविता त्यांच्यावर या ठिकाणी उपचार करून त्या रुग्णांना बरे करण्याचे काम त्यांनी केले आहे. आपली वैद्यकीय सेवा करून इतर वेळेत ते रुग्णांची सेवा करतात.

.....

शिस्त पाळली तर हा संसर्ग टाळता येतो

नागरिकांनी शिस्त पाळली तर प्रशासनावरील ताण कमी होईल. काही लक्षणे आढळली तर डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या. स्वतःच्या मनाने औषध उपचार केला तर खरा आजार लपेल आणि नंतर भयानक रूप घेऊन पुढे येईल. स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका. स्वयंशिस्त औषधापेक्षाही प्रभावी असून, तीच आपल्या संकटाला सावरेल, असे मतसुद्धा त्यांनी व्यक्त केले.