शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

दुर्गम भागातील रुग्णांसाठी ते ठरत आहेत देवदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:27 IST

केशोरी : परिसरातील जनता कोरोनाच्या संकटामुळे पूर्णत: भयभीत झालेली होती. केशोरी येथे जवळपास शंभर ते दीडशे कोरोनाबाधित रुग्ण होते. ...

केशोरी : परिसरातील जनता कोरोनाच्या संकटामुळे पूर्णत: भयभीत झालेली होती. केशोरी येथे जवळपास शंभर ते दीडशे कोरोनाबाधित रुग्ण होते. परिणामी या परिसराला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले. अशा स्थितीत कोरोनाबाधित रुग्णांना धीर देण्याचे व रुग्ण बरे करण्याचे काम डॉ. पिंकू मंडल यांनी केले. ज्या कोरोनाबाधित रुग्णांचा सिटी स्कॅन स्कोअर सात, आठ, नऊ, दहा, बारापर्यंत होता, अशा रुग्णांना या ठिकाणी औषध उपचार करून पूर्णत: तंदुरुस्त करण्याचे काम केले. त्यामुळे कोरोना काळात परिसरातील रुग्णांसाठी ते देवदूतच ठरले.

कोरोना बाबतीत जी समस्‍या निर्माण झाली होती, त्या समस्येतून बाहेर काढण्याचे काम वैद्यकीय अधिकारी डॉ. पिंकू मंडल यांनी केले. जे रुग्ण क्रिटिकल होते, त्यांना जिल्हा रुग्णालयात रेफर केले. एकंदरीत या परिसरात जे भयभीत वातावरण तयार झालेले होते, त्या वातावरणातून निवारण करण्याचे काम डॉ. मंडल यांनी केले. कोरोनाबाधित असलेल्या सामान्य रुग्णांना आर्थिक फटका बसणार होता, त्या आर्थिक विवंचनेतून सोडविण्याचे कामसुद्धा त्यांनी केले. आदिवासी बहुल भागामध्ये जवळपास पंधरा वर्षे ते अविरतपणे सेवा करीत आहेत. केशोरी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर आरोग्य केंद्रातील ज्या समस्या होत्या, त्या त्यांनी त्वरित सोडविल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राला एक स्वच्छ परिसर, पारदर्शक करून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आरोग्य केंद्रास भेट दिली तर आरोग्य केंद्राचा एक सुंदर परिसर आपल्याला बघायला मिळतो. आरोग्य केंद्रामध्ये रुजू झाल्यानंतर कुटुंब नियोजन या मोहिमेला सुद्धा त्यांनी महत्त्व दिले. शंभर टक्के कुटुंब नियोजनाचे कामसुद्धा त्यांनी केले. या परिसरातील ज्या व्यक्तीने विष प्राशन केलेले असते, त्या व्यक्तींना कुठे न पाठविता त्यांच्यावर या ठिकाणी उपचार करून त्या रुग्णांना बरे करण्याचे काम त्यांनी केले आहे. आपली वैद्यकीय सेवा करून इतर वेळेत ते रुग्णांची सेवा करतात.

.....

शिस्त पाळली तर हा संसर्ग टाळता येतो

नागरिकांनी शिस्त पाळली तर प्रशासनावरील ताण कमी होईल. काही लक्षणे आढळली तर डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या. स्वतःच्या मनाने औषध उपचार केला तर खरा आजार लपेल आणि नंतर भयानक रूप घेऊन पुढे येईल. स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका. स्वयंशिस्त औषधापेक्षाही प्रभावी असून, तीच आपल्या संकटाला सावरेल, असे मतसुद्धा त्यांनी व्यक्त केले.