शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

योजनांच्या लाभासाठी हे अभियान

By admin | Updated: November 7, 2015 01:49 IST

महसूल प्रशासन लोकाभिमुख गतिमान व सुलभ होण्याबरोबर नागरिकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या व अडचणी थेट समजून गावातच सोडविणे महत्वाचे आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : कोका येथे महाराजस्व अभियानकरडी (पालोरा) : महसूल प्रशासन लोकाभिमुख गतिमान व सुलभ होण्याबरोबर नागरिकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न समस्या व अडचणी थेट समजून गावातच सोडविणे महत्वाचे आहे. नागरिकांचे प्रश्न त्वरित निकाली निघण्याच्या दृष्टीने आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मध्यस्थाशिवाय देण्याच्या दृष्टीने महाराजस्व अभियान सन २०१५-१६ अंतर्गत विस्तारित स्वरूपातील समाधान शिबिर असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले.कोका येथील महाराजस्व अभियानाचे शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. समाधान शिबिर यशस्वी होवून थेट लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने कोका येथे जय्यत तयारी केली.ग्रामपंचायत व स्टेट बँक कार्यालयाचे परिसरात आयोजित शिबिरात विविध विभागांनी सहभाग नोंदविली. जिल्हाधिकाऱ्यांनी शिबिरानंतर थेट नागरिकांशी कोणत्याही अडथळ्याविना संवाद साधला. कोका येथील वनविभागाच्या विश्रामगृहातही सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत नागरिकांचे प्रश्न, समस्या अडचणी व मागण्या समजून घेतल्या. त्वरित कार्यवाहीचे आश्वासनही देण्यात आले. अधिकाऱ्यांना समस्या, प्रश्न सोडवणुकीचे निर्देशही दिले.नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यां समोर मांडलेल्या समस्यांमध्ये सुरेवाडा उपसा सिंचन योजनेचे काम धीम्या गतीने आहे. विभाग मात्र कामे प्रगतिपथावर असल्याचे सांगत आहे. मात्र कामे प्रलंबित आहेत. करचखेडा उपसा सिंचन योजना अजुनही रखडलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील रेतीची ओव्हरलोड वाहतुक करडी, खडकी, ढिवरवाडामार्गे भंडारा, नागपूरला होत आहे. ती बंद करून खापा, मोहाडी मार्गे करण्यात यावी.आदी मागण्यांचा समावेश आहे.यावेळी उपवनसंरक्षक प्रविणकुमार, उपविभागीय अधिकारी संपत खिल्लारी, तहसीलदार सुशांत बंन्सोडे, खंडविकास अधिकारी मंजुषा ठवकर, अभयारण्याचे वनक्षेत्राधिकारी देवेंद्र कुंभारे, जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपते, सरपंच नरवीर टेकाम, उपसरपंच शिवशंकर शहारे, पंचायत समिती सदस्य नीतू सेलोकर, रवीन्द्र तिडके, रवीन्द्र रामटेके, कुंडलीक हातझाडे, सहायक वनक्षेत्राधिकारी खान, मारबते, सुधाकर तिडके, ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील सरपंच, उपसरपंच व सदस्य, आरोग्य, कृषी, पशु संवर्धन, राजस्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी हजर होते. अभियानादरम्यान महसूल विभागाशी संबंधित समस्यांचा निपटारा करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.(वार्ताहर)