शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

अशोकाच्या वेळी जाती नव्हत्या

By admin | Updated: April 1, 2015 00:54 IST

२ हजार २३४ वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या काळात जैन, बौध्द, आजीवक, ब्राह्मण यांच्यामुळे संप्रदाय होते, परंतु जाती नव्हत्या.

बाराभाटी : २ हजार २३४ वर्षापूर्वी सम्राट अशोकाच्या काळात जैन, बौध्द, आजीवक, ब्राह्मण यांच्यामुळे संप्रदाय होते, परंतु जाती नव्हत्या. याचे कारण म्हणजे सम्राट अशोक हे एक कल्याणकारी राजा होते, असे प्रतिपादन सत्यजीत मौर्य यांनी केले.येथे शनिवारी फुले, शाहू, आंबेडकर युवा साहित्य संमेलन उत्साहार पार पडले. उद्घाटन दिलवरभाई रामटेके यांच्या हस्ते सत्यजीत मौर्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या वेळी जेष्ठ आंबेडकरी विचारवंत व साहित्यिक डॉ.युवराज मेश्राम, अ‍ॅड.संदेश भालेकर, डॉ. प्रदीप भानसे, संजय मगर, वैशाली रामटेके, भागवत लांडगे, हरिचंद्र लाडे, टी.एस. माटे, एम.एम. राखडे, एम.जी. मेश्राम, तलाठी रंगारी, कावळे, बागडे, ओमप्रकाश नशिने, हेमलता खोब्रागडे, करूणा नंदेश्वर, राजाराम बेलखोडे, मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.मौर्य पुढे म्हणाले की, वैचारिक क्रांतीचा युवा घडवा. त्यांना मंच द्या. कार्यक्रमाला अधिकारी आले नाही, ही त्यांची कमजोरी आहे. ज्यांच्या कमाईने आज आपण जीवन जगतो, त्यांनाच विसरणे चुकीचे आहे. बुध्दांचे अनुयायी सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य, मानसाला माणुसकीचे हक्क मिळवून देणारे बहुजनांचे नायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर प्रकाश टाकण्यात आला. उद्घाटनपर भाषणात रामटेके म्हणाले, सामाजिक संवेदना बोथड झाल्या आहेत. डॉ. आंबेडकर यांना मानणाऱ्या अनुयानांनी परिवर्तनवादी विचार संमेलनात सहभागी व्हावे. विचारवंतांमध्ये माणसे जोडण्याची शक्ती आहे, असे ते म्हणाले.खेड्यापाड्यातून स्वत:च्या बुद्धीसामर्थ्यावर ज्यांनी नोकरी मिळविली, अशांचा भारतीय संविधान व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. सायंकाळी सिद्धार्थ गौतमा हा चित्रपट व विजय भारती यांच्या प्रबोधनात्मक कव्वालीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. प्रियदर्शी बौध्द सम्राट अशोक यांच्या जयंती निमित्ताने सदर कार्यक्रम घेण्यात आल्याचे स्वागताध्यक्ष विनोद माने यांनी आपल्या भाषणात सांगितले.संचालन प्रा. अनिल कानेकर (लाखांदूर), प्रास्ताविक महेंद्र बंसोड तर आभार भागवत लांडगे यांनी मानले. (वार्ताहर)