शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

जाळण्यासाठी लाकडं नाहीत म्हणून मृतदेहच वन कार्यालयात आणला; गोंदिया जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:40 IST

विद्युत शवदाहिनी नाही. प्रेताचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. हा प्रकार मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाव येथे घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृतदेह जाळण्यासाठी वन विभागाच्या आगारात लाकूड उपलब्ध नाही.शहरात पर्यायी सुविधा नाही.विद्युत शवदाहिनी नाही. प्रेताचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. हा प्रकार मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाव येथे घडला.अर्जुनी मोरगाव येथील नरेश तरजुले या युवकाचे निधन झाले. त्याचेवर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार होते. स्थानिक स्मशानभूमीत विद्युत शव दाहिनीची सुविधा नाही. वन आगारातून लाकडे विकत घेऊनच प्रेत जाळली जातात. आप्तेष्टांनी वन कार्यालय गाठले. मात्र तिथे कित्येक महिन्यांपासून लाकडेच नाहीत. गावात लाकूड मिळण्याची दुसरी व्यवस्था नाही. आता प्रेताचे करायचे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चार चाकी वाहनांतून चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे यांचेशी चर्चा केली. त्यांनी आपल्या आगारात साठा नसल्याचे सांगितले.नवेगावबांधच्या आगारातून आणण्याचा सल्ला दिला. १५ कि.मी.अंतरावर एखादे वाहन घेऊन जाणे सामान्यांना आर्थिकदृष्टया परवडण्यासारखे नाही. मृतक हा अगदी सामान्य कुटुंबातला होता. दबाव वाढतच होता. ही बाब आ.मनोहर चंद्रिकापुरे यांचे निदर्शनास आणून दिली. त्यांनी सुद्धा उपवनसंरक्षक युवराज यांना भ्रमणध्वनीवर कळविली. अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे, क्षेत्र सहाय्यक गोटेफोडे यांनी मृतकाच्या नातेवाईकांना वन आगारात येण्यास सांगितले. इकडून-तिकडून प्रेत जाळण्यापूरते लाकूड उपलब्ध करून देण्यात आले. मृतकाच्या कुटुंबियांना लाकूड उपलब्ध करून देण्यासाठी आर.के.जांभुळकर, त्रिशरण शहारे यांनी प्रयत्न केले. या वेळी मृतकाचे वडील पुरुषोत्तम तरजुले, विनोद शहारे, विक्की लांडे, अजय बडोले, रुपलाल बनकर, खुमदेव शहारे उपस्थित होते. अर्जुनी मोरगावच्या वन आगारात प्रेत जाळण्यासाठी लाकूड नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.मागणी नोंदविली आहेप्रेताच्या अंत्यविधीसाठी लाकूड ठेवले जाते. हा साठा संपलेला आहे. वन आगारात अजिबात लाकूड नाही. आगामी काळात ही समस्या उग्र रूप धारण करू नये यासाठी आपल्या विभागाकडे मागणी नोंदविली आहे. मात्र अजूनही लाकडे उपलब्ध झाली नाहीत अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे यांनी दिली.

महामारीत लाकडांचा दुष्काळदेशात सर्वत्र कोरोना विषाणूंचा संसर्ग सुरू आहे. महामारी घोषित करण्यात आली. महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढतच आहे. तालुक्यात ३२ जण बाधित आढळून आले. या पार्श्वभूमीवर प्रेत जाळण्यासाठी वन आगारात लाकूड उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब आहे. वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी हे गांभीर्याने घेत नाही. नवेगावबांधच्या आगारातून लाकूड आणणे सर्वसामान्यांना शक्य होत नाही.तातडीने वन विभागाने उपाययोजना करावी अन्यथा यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आर.के.जांभुळकर यांनी दिला आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग