शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

जाळण्यासाठी लाकडं नाहीत म्हणून मृतदेहच वन कार्यालयात आणला; गोंदिया जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:40 IST

विद्युत शवदाहिनी नाही. प्रेताचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. हा प्रकार मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाव येथे घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृतदेह जाळण्यासाठी वन विभागाच्या आगारात लाकूड उपलब्ध नाही.शहरात पर्यायी सुविधा नाही.विद्युत शवदाहिनी नाही. प्रेताचे करावे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. हा प्रकार मंगळवारी दुपारी अर्जुनी मोरगाव येथे घडला.अर्जुनी मोरगाव येथील नरेश तरजुले या युवकाचे निधन झाले. त्याचेवर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार होते. स्थानिक स्मशानभूमीत विद्युत शव दाहिनीची सुविधा नाही. वन आगारातून लाकडे विकत घेऊनच प्रेत जाळली जातात. आप्तेष्टांनी वन कार्यालय गाठले. मात्र तिथे कित्येक महिन्यांपासून लाकडेच नाहीत. गावात लाकूड मिळण्याची दुसरी व्यवस्था नाही. आता प्रेताचे करायचे काय? या विवंचनेत आप्तेष्टांनी चार चाकी वाहनांतून चक्क प्रेतच वन विभागाच्या कार्यालयात आणले. वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे यांचेशी चर्चा केली. त्यांनी आपल्या आगारात साठा नसल्याचे सांगितले.नवेगावबांधच्या आगारातून आणण्याचा सल्ला दिला. १५ कि.मी.अंतरावर एखादे वाहन घेऊन जाणे सामान्यांना आर्थिकदृष्टया परवडण्यासारखे नाही. मृतक हा अगदी सामान्य कुटुंबातला होता. दबाव वाढतच होता. ही बाब आ.मनोहर चंद्रिकापुरे यांचे निदर्शनास आणून दिली. त्यांनी सुद्धा उपवनसंरक्षक युवराज यांना भ्रमणध्वनीवर कळविली. अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे, क्षेत्र सहाय्यक गोटेफोडे यांनी मृतकाच्या नातेवाईकांना वन आगारात येण्यास सांगितले. इकडून-तिकडून प्रेत जाळण्यापूरते लाकूड उपलब्ध करून देण्यात आले. मृतकाच्या कुटुंबियांना लाकूड उपलब्ध करून देण्यासाठी आर.के.जांभुळकर, त्रिशरण शहारे यांनी प्रयत्न केले. या वेळी मृतकाचे वडील पुरुषोत्तम तरजुले, विनोद शहारे, विक्की लांडे, अजय बडोले, रुपलाल बनकर, खुमदेव शहारे उपस्थित होते. अर्जुनी मोरगावच्या वन आगारात प्रेत जाळण्यासाठी लाकूड नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.मागणी नोंदविली आहेप्रेताच्या अंत्यविधीसाठी लाकूड ठेवले जाते. हा साठा संपलेला आहे. वन आगारात अजिबात लाकूड नाही. आगामी काळात ही समस्या उग्र रूप धारण करू नये यासाठी आपल्या विभागाकडे मागणी नोंदविली आहे. मात्र अजूनही लाकडे उपलब्ध झाली नाहीत अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दुर्गे यांनी दिली.

महामारीत लाकडांचा दुष्काळदेशात सर्वत्र कोरोना विषाणूंचा संसर्ग सुरू आहे. महामारी घोषित करण्यात आली. महाराष्ट्रात प्रादुर्भाव वाढतच आहे. तालुक्यात ३२ जण बाधित आढळून आले. या पार्श्वभूमीवर प्रेत जाळण्यासाठी वन आगारात लाकूड उपलब्ध नसणे ही चिंतेची बाब आहे. वन विभागाचे वरीष्ठ अधिकारी हे गांभीर्याने घेत नाही. नवेगावबांधच्या आगारातून लाकूड आणणे सर्वसामान्यांना शक्य होत नाही.तातडीने वन विभागाने उपाययोजना करावी अन्यथा यासाठी जनआंदोलन उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आर.के.जांभुळकर यांनी दिला आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग