शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

नागरिकांमध्ये काही होत नसल्याचा आव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

देशात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्यातही राज्यात कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यावर नियंत्रण मिळविता यावे म्हणून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘लॉकडाऊन’ची मर्यादा वाढवूनही कोरोनाचा कहर सुरूच असून तासा-तासांनी रूग्ण वाढत चालले आहे. अशात आपल्या घरात राहूनच सुरक्षित राहता येणार अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडून सूट : नागरिकांमध्ये भीतीच नाही, कठोर कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई आहे. अशात घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाया केल्या जात असल्या तरिही गोंदियात पोलिसांकडून सूट दिल्याचे चित्र आहे. परिणामी नागरिकांची गर्दी वाढत चालली असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.देशात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्यातही राज्यात कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यावर नियंत्रण मिळविता यावे म्हणून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘लॉकडाऊन’ची मर्यादा वाढवूनही कोरोनाचा कहर सुरूच असून तासा-तासांनी रूग्ण वाढत चालले आहे. अशात आपल्या घरात राहूनच सुरक्षित राहता येणार अशी स्थिती आहे. मात्र असे असतानाही नागरिक ‘लॉकडाऊन’ला गांभीर्याने न घेता सुटीचा काळ समजून घेत घराबाहेर पडत असल्याचे दिसत आहे.जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरिही यानंतर पुढे काही अप्रिय घडणार नाही याची शाश्वती देता येत नाही.अशात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरवासीयांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना पाळायचे नाही असेच काहीसे ठरवून घेतल्याचे दिसत आहे. यामुळेच मोठ्या संख्येत नागरिक घराबाहेर पडत असून शहरातून ‘लॉकडाऊन’ हटविण्यात आल्यासारखे वाटत आहे. अशात त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांना रान मोकळे असून ते सर्रास नियमांना तुडवित फिरत असल्याचे बघावयास मिळत आहे.शिथिलतेनंतर चित्रच पालटलेसोमवारपासून (दि.२०) कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यांना दिलासा देत थोडी शिथिलता देण्यात आली आहे. व्यापार व उद्योगांना सूट देण्यात आल्याने शहरातील चित्रच पाटल्याचे दिसले.कित्येक दुकाने उघडण्यात आल्याने नागरिकांनी जणू ‘लॉकडाऊन’च हटविण्यात आल्याचे गृहीत धरून घराबाहेर पडण्यास सुरूवात केली.परिणामी सोमवारी शहर ‘लॉकडाऊन’ मुक्त झाल्यासारखेच वाटले.सर्रास फिरणे सुरूच‘लॉकडाऊन’ असतानाही पोलीस विनाकारण फिरणाऱ्यांना काहीच करीत नसल्याने नागरिक ही मोकाटपणे फिरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, घराबाहेर फिरूनही आतापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात कारवाया झालेल्या नसल्याने नागरिकांना रानमोकळे असून ‘काही होत नसल्याच्या आवात’ ते सर्रास फिरत आहेत.त्यामुळे आता उरलेल्या १०-१२ दिवसांसाठी तरी सुरक्षेच्या दृष्टीने कठोरपणा बाळगणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या