शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांमध्ये काही होत नसल्याचा आव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

देशात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्यातही राज्यात कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यावर नियंत्रण मिळविता यावे म्हणून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘लॉकडाऊन’ची मर्यादा वाढवूनही कोरोनाचा कहर सुरूच असून तासा-तासांनी रूग्ण वाढत चालले आहे. अशात आपल्या घरात राहूनच सुरक्षित राहता येणार अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडून सूट : नागरिकांमध्ये भीतीच नाही, कठोर कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई आहे. अशात घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाया केल्या जात असल्या तरिही गोंदियात पोलिसांकडून सूट दिल्याचे चित्र आहे. परिणामी नागरिकांची गर्दी वाढत चालली असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.देशात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्यातही राज्यात कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यावर नियंत्रण मिळविता यावे म्हणून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘लॉकडाऊन’ची मर्यादा वाढवूनही कोरोनाचा कहर सुरूच असून तासा-तासांनी रूग्ण वाढत चालले आहे. अशात आपल्या घरात राहूनच सुरक्षित राहता येणार अशी स्थिती आहे. मात्र असे असतानाही नागरिक ‘लॉकडाऊन’ला गांभीर्याने न घेता सुटीचा काळ समजून घेत घराबाहेर पडत असल्याचे दिसत आहे.जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरिही यानंतर पुढे काही अप्रिय घडणार नाही याची शाश्वती देता येत नाही.अशात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरवासीयांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना पाळायचे नाही असेच काहीसे ठरवून घेतल्याचे दिसत आहे. यामुळेच मोठ्या संख्येत नागरिक घराबाहेर पडत असून शहरातून ‘लॉकडाऊन’ हटविण्यात आल्यासारखे वाटत आहे. अशात त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांना रान मोकळे असून ते सर्रास नियमांना तुडवित फिरत असल्याचे बघावयास मिळत आहे.शिथिलतेनंतर चित्रच पालटलेसोमवारपासून (दि.२०) कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यांना दिलासा देत थोडी शिथिलता देण्यात आली आहे. व्यापार व उद्योगांना सूट देण्यात आल्याने शहरातील चित्रच पाटल्याचे दिसले.कित्येक दुकाने उघडण्यात आल्याने नागरिकांनी जणू ‘लॉकडाऊन’च हटविण्यात आल्याचे गृहीत धरून घराबाहेर पडण्यास सुरूवात केली.परिणामी सोमवारी शहर ‘लॉकडाऊन’ मुक्त झाल्यासारखेच वाटले.सर्रास फिरणे सुरूच‘लॉकडाऊन’ असतानाही पोलीस विनाकारण फिरणाऱ्यांना काहीच करीत नसल्याने नागरिक ही मोकाटपणे फिरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, घराबाहेर फिरूनही आतापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात कारवाया झालेल्या नसल्याने नागरिकांना रानमोकळे असून ‘काही होत नसल्याच्या आवात’ ते सर्रास फिरत आहेत.त्यामुळे आता उरलेल्या १०-१२ दिवसांसाठी तरी सुरक्षेच्या दृष्टीने कठोरपणा बाळगणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या