शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
4
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
5
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
6
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
7
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
8
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
10
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
11
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
12
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
13
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
14
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
15
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
16
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
17
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
18
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
19
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
20
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली

नागरिकांमध्ये काही होत नसल्याचा आव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:00 IST

देशात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्यातही राज्यात कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यावर नियंत्रण मिळविता यावे म्हणून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘लॉकडाऊन’ची मर्यादा वाढवूनही कोरोनाचा कहर सुरूच असून तासा-तासांनी रूग्ण वाढत चालले आहे. अशात आपल्या घरात राहूनच सुरक्षित राहता येणार अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडून सूट : नागरिकांमध्ये भीतीच नाही, कठोर कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई आहे. अशात घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाया केल्या जात असल्या तरिही गोंदियात पोलिसांकडून सूट दिल्याचे चित्र आहे. परिणामी नागरिकांची गर्दी वाढत चालली असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.देशात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्यातही राज्यात कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यावर नियंत्रण मिळविता यावे म्हणून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘लॉकडाऊन’ची मर्यादा वाढवूनही कोरोनाचा कहर सुरूच असून तासा-तासांनी रूग्ण वाढत चालले आहे. अशात आपल्या घरात राहूनच सुरक्षित राहता येणार अशी स्थिती आहे. मात्र असे असतानाही नागरिक ‘लॉकडाऊन’ला गांभीर्याने न घेता सुटीचा काळ समजून घेत घराबाहेर पडत असल्याचे दिसत आहे.जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरिही यानंतर पुढे काही अप्रिय घडणार नाही याची शाश्वती देता येत नाही.अशात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरवासीयांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना पाळायचे नाही असेच काहीसे ठरवून घेतल्याचे दिसत आहे. यामुळेच मोठ्या संख्येत नागरिक घराबाहेर पडत असून शहरातून ‘लॉकडाऊन’ हटविण्यात आल्यासारखे वाटत आहे. अशात त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांना रान मोकळे असून ते सर्रास नियमांना तुडवित फिरत असल्याचे बघावयास मिळत आहे.शिथिलतेनंतर चित्रच पालटलेसोमवारपासून (दि.२०) कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यांना दिलासा देत थोडी शिथिलता देण्यात आली आहे. व्यापार व उद्योगांना सूट देण्यात आल्याने शहरातील चित्रच पाटल्याचे दिसले.कित्येक दुकाने उघडण्यात आल्याने नागरिकांनी जणू ‘लॉकडाऊन’च हटविण्यात आल्याचे गृहीत धरून घराबाहेर पडण्यास सुरूवात केली.परिणामी सोमवारी शहर ‘लॉकडाऊन’ मुक्त झाल्यासारखेच वाटले.सर्रास फिरणे सुरूच‘लॉकडाऊन’ असतानाही पोलीस विनाकारण फिरणाऱ्यांना काहीच करीत नसल्याने नागरिक ही मोकाटपणे फिरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, घराबाहेर फिरूनही आतापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात कारवाया झालेल्या नसल्याने नागरिकांना रानमोकळे असून ‘काही होत नसल्याच्या आवात’ ते सर्रास फिरत आहेत.त्यामुळे आता उरलेल्या १०-१२ दिवसांसाठी तरी सुरक्षेच्या दृष्टीने कठोरपणा बाळगणे गरजेचे झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या