शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
5
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
6
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
7
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
8
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
9
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
10
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
11
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
12
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
13
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
14
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
15
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
16
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
17
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
18
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
19
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
20
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

गावात चुली पेटल्याच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 05:00 IST

तालुक्यातील कालीमाटी  गावातील चार मुलांचा  मंगळवारी (दि. ८) पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने ३००० लोकसंख्येच्या गावात फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत होता. कुणाचा मित्र, कुणाचा मुलगा, कुणाचा जवळचा नातेवाईक या घटनेत गमावला गेल्याने मंगळवारी सकाळपासून तर बुधवारी सायंकाळपर्यंत गावात स्मशानशांतता पसरली होती. दु:खाच्या आवेगात गावात चुली पेटल्याच नाही. चौघांवरही बुधवारी (दि.८) रात्री सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध कोणीच थांबवू शकला नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव :  काळ कधी कसा येईल, याचा नेम नाही. अगदी आनंदात असलेल्या वातावरणावर विरजण घालत काळाने झडप घालून क्षणात चौघांना हिरावले. अन् या दुःखाच्या क्षणात कालीमाटी गावात चुली पेटल्याच नाही.तालुक्यातील कालीमाटी  गावातील चार मुलांचा  मंगळवारी (दि. ८) पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने ३००० लोकसंख्येच्या गावात फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत होता. कुणाचा मित्र, कुणाचा मुलगा, कुणाचा जवळचा नातेवाईक या घटनेत गमावला गेल्याने मंगळवारी सकाळपासून तर बुधवारी सायंकाळपर्यंत गावात स्मशानशांतता पसरली होती. दु:खाच्या आवेगात गावात चुली पेटल्याच नाही. चौघांवरही बुधवारी (दि.८) रात्री सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध कोणीच थांबवू शकला नाही. तान्हा पोळ्याच्या दिवशी मंगळवारी सकाळी मारबत विसर्जनासाठी गाव शिवारजवळील वाघ नदीत आंघोळीसाठी उतरले असता संतोष अशोक बहेकार (१९), रोहित नंदकिशोर बहेकार (१८), मयूर अशोक खोब्रागडे (२१), सुमित दिलीप शेंडे (१८) या चौघांचा नदीत वाहून सणाच्या दिवशी जीव गेला.   चारही कुटुंबातील एकुलती एक मुले पाण्यात वाहून गेल्याची माहिती धडकताच गावात स्मशानशांतता पसरली.  जो तो आठवणीत गहिवरताना दिसत होता. संतोष, रोहित, मयूर, सुमित हे आईवडिलांना वारस म्हणून एकुलते होते.  कुटुंबातील बहिणींनी एकुलता भाऊ गमावल्यामुळे त्यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला होता. काही दिवसांपूर्वी साजरा केलेला रक्षाबंधनाचा सण बहिणीसाठी शेवटचा ठरला.  सर्व कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या उपस्थितीत चौघांवरही कालीमाटी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मृतांच्या नातेवाईकांसोबतच अंत्यसंस्काराला उपस्थित जनसमुदायालाही त्यांचे अश्रू आवरता आले नाही. मन हेलावून सोडणाऱ्या या घटनेने कालीमाटी गावात मात्र चुली पेटल्या नाही.

कानी आला फक्त रडण्याचा आवाज मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच मृत चारही मुलांच्या कुटुंबीयांच्या रडण्याचा आवाज सोडून गावात शांतता पसरली होती. बुधवारी सकाळ चौघांचे मृतदेह हाती येताच गावात अश्रूंचा पूरच आला व फक्त रडण्याच्या आवाजाने कालीमाटी दणाणले होते.

 

टॅग्स :Deathमृत्यू