शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

कालीमाटी गावात चुली पेटल्याच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST

आमगाव : काळ कधी कसा येईल, याचा नेम नाही. अगदी आनंदात असलेल्या वातावरणावर विरजण घालत काळाने झडप घालून क्षणात ...

आमगाव : काळ कधी कसा येईल, याचा नेम नाही. अगदी आनंदात असलेल्या वातावरणावर विरजण घालत काळाने झडप घालून क्षणात चौघांना हिरावले. अन् या दुःखाच्या क्षणात कालीमाटी गावात चुली पेटल्याच नाही.

तालुक्यातील कालीमाटी गावातील चार मुलांचा मंगळवारी (दि. ८) पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने ३००० लोकसंख्येच्या गावात फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत होता. कुणाचा मित्र, कुणाचा मुलगा, कुणाचा जवळचा नातेवाईक या घटनेत गमावला गेल्याने मंगळवारी सकाळपासून तर बुधवारी सायंकाळपर्यंत गावात स्मशानशांतता पसरली होती. दु:खाच्या आवेगात गावात चुली पेटल्याच नाही. चौघांवरही बुधवारी (दि.८) रात्री सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध कोणीच थांबवू शकला नाही.

तान्हा पोळ्याच्या दिवशी मंगळवारी सकाळी मारबत विसर्जनासाठी गाव शिवारजवळील वाघ नदीत आंघोळीसाठी उतरले असता संतोष अशोक बहेकार (१९), रोहित नंदकिशोर बहेकार (१८), मयूर अशोक खोब्रागडे (२१), सुमित दिलीप शेंडे (१८) या चौघांचा नदीत वाहून सणाच्या दिवशी जीव गेला. चारही कुटुंबातील एकुलती एक मुले पाण्यात वाहून गेल्याची माहिती धडकताच गावात स्मशानशांतता पसरली. जो तो आठवणीत गहिवरताना दिसत होता. संतोष, रोहित, मयूर, सुमित हे आईवडिलांना वारस म्हणून एकुलते होते. कुटुंबातील बहिणींनी एकुलता भाऊ गमावल्यामुळे त्यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला होता. काही दिवसांपूर्वी साजरा केलेला रक्षाबंधनाचा सण बहिणीसाठी शेवटचा ठरला.

सर्व कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या उपस्थितीत चौघांवरही कालीमाटी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मृतांच्या नातेवाईकांसोबतच अंत्यसंस्काराला उपस्थित जनसमुदायालाही त्यांचे अश्रू आवरता आले नाही. मन हेलावून सोडणाऱ्या या घटनेने कालीमाटी गावात मात्र चुली पेटल्या नाही.

------------------------------

कानी आला फक्त रडण्याचा आवाज

मंगळवारी सकाळी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच मृत चारही मुलांच्या कुटुंबीयांच्या रडण्याचा आवाज सोडून गावात शांतता पसरली होती. बुधवारी सकाळ चौघांचे मृतदेह हाती येताच गावात अश्रूंचा पूरच आला व फक्त रडण्याच्या आवाजाने कालीमाटी दणाणले होते.