शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

जिल्ह्यात प्रमाणित सेंद्रिय शेतीच नाही

By admin | Updated: August 21, 2014 23:57 IST

सेंद्रिय शेती करणे अत्यंत कठिण असते. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात कुठेही प्रमाणित सेंद्रिय शेती नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

गोंदिया : सेंद्रिय शेती करणे अत्यंत कठिण असते. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात कुठेही प्रमाणित सेंद्रिय शेती नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यावर्षी जिल्ह्यात १६ हजार ८६२ हेक्टर क्षेत्रात श्री पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी एका एकर शेतजमिनीत पाच किलोप्रमाणे बियाणे घालण्यात आले. मागील वर्षीही श्रीपद्धतीने जवळपास १५ ते १५ हेक्टर जमिनीत लागवड करण्यात आली, असे कुरील यांनी सांगितले. सेंद्रिय शेती करणे अत्यंत जिकरीचे काम असते. सतत तीन वर्षांपर्यंत सेंद्रिय शेती करून उत्पादन घेतल्यानंतरच ती शेती सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित केली जाते. सेंद्रिय शेतीसाठी ते क्षेत्र इतर शेतापासून संपूर्णपणे वेगळे करावे लागते. दुसऱ्या रासायनिक शेतातील पाणी त्या शेतात कधीच शिरू नये, याची काळजी घ्यावी लागते. सेंद्रिय शेतीला मिळणारे पाणी रासायनिक खते व पेस्टीसाईड्सपासून मुक्त असणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीसाठी युरोगॅप या विशिष्ट पद्धतीचा वापर करावा लागतो. या पद्धतीसाठी युरोपियन देशांनी काही मानके ठरविली आहेत. यात सर्वात आधी साईल टेस्टींग केली जाते. कीटकनाशकांचे परिणात नष्ट करावे लागतात. सेंद्रिय पदार्थांतूनच जनावरांसाठी चारा तयार करावा लागतो. नंतर त्याच जनावरांच्या शेणाचे खत सेंद्रिय शेतीसाठी उपयोगात आणावे लागते. मजुरांची स्वच्छता यावर मोठा भर असतो. मजूर शौचास जरी गेला तरी विशिष्ट अशा साबणाने त्याला आपले हात स्वच्छ करून घ्यावे लागते. सेंद्रिय शेतात दर दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत त्या एजंसीचे माणसे येवून तपासणी करून जातात. या सर्व प्रकारामुळे सेंद्रिय शेती करणे अत्यंत जटिल असल्यामुळे शेतकरी ही शेती करण्यास सहजासहजी धजावत नाही. सेंद्रिय शेती करण्यासाठी काही प्रमाणात अडचणी आहेत. एमआरएलमुळे (मॅक्सीमम रेसीड्युअल लेवल) सेंद्रिय शेती रासायनिक शेतीला पर्याय ठरू शकते. एमआरएल हे नागपूर येथे असून येथे उत्पादित झालेल्या धान्यातील ३२ प्रकारच्या केमिकल्सची तपासणी केली जाते. धानपीकच नव्हे तर फळभाज्यांसाठी सुद्धा आपण सेंद्रिय शेती करू शकतो. रासायनिक खतांना एका स्तरावर नियंत्रित ठेवून, उत्पादकता कमी न करता सेंद्रिय अन्नाचे उत्पादन घेतले जावू शकते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)