शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
2
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
3
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
4
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
5
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
6
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
7
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
8
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
9
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...
10
२६/११ दहशतवादी हल्ल्यावर पी. चिदंबरम यांचा मोठा गौप्यस्फोट; पाकिस्तानवर सैन्य कारवाई का नाही?
11
Asia Cup 2025 : आशिया कपची ट्रॉफी नकवींनी चोरली; टीम इंडियासोबतचा वाद पाकिस्तानी मीडियाने कसा कव्हर केला?
12
"मी आता थकलोय, मला मानसिक शांतता हवीय"; तरुणाने ९ दिवसांत सोडली १४ लाखांची नोकरी
13
Koyna Earthquake: कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
14
Dussehra 2025: दसऱ्याला जे लोक करतात 'हा' उपाय, त्यांच्यावर वर्षभर राहते लक्ष्मीकृपा!
15
GST कपातीनंतर आता EMI चा भारही हलका होणार; कर्जाचे ३ नियम १ ऑक्टोबरपासून लागू
16
Chaitanyananda Saraswati : डर्टी चॅट्स, मुलींच्या डीपीचे स्क्रीनशॉट... स्वयंघोषित बाबाच्या फोनमध्ये पोलिसांना काय सापडलं?
17
रणवीर सिंहच्या 'धुरंधर'मध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार परवीन बाबीची भूमिका, मेकर्सकडून सरप्राईज?
18
Buy Now, Pay Later वर संकट? या कंपनीला लागलं टाळं; 'फ्री' दिसणाऱ्या या स्कीममागील 'गेम' काय?
19
'स्टुडंट ऑफ द इयर' फेम अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक, बॅगेत सापडलं ३.५ किलो कोकेन
20
"या योजनेचं आम्ही स्वागत करतो"; ट्रम्प यांच्या 'गाझा शांतता योजने'वर PM मोदींनी काय मांडली भूमिका?

जिल्ह्यात प्रमाणित सेंद्रिय शेतीच नाही

By admin | Updated: August 21, 2014 23:57 IST

सेंद्रिय शेती करणे अत्यंत कठिण असते. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात कुठेही प्रमाणित सेंद्रिय शेती नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

गोंदिया : सेंद्रिय शेती करणे अत्यंत कठिण असते. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात कुठेही प्रमाणित सेंद्रिय शेती नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यावर्षी जिल्ह्यात १६ हजार ८६२ हेक्टर क्षेत्रात श्री पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी एका एकर शेतजमिनीत पाच किलोप्रमाणे बियाणे घालण्यात आले. मागील वर्षीही श्रीपद्धतीने जवळपास १५ ते १५ हेक्टर जमिनीत लागवड करण्यात आली, असे कुरील यांनी सांगितले. सेंद्रिय शेती करणे अत्यंत जिकरीचे काम असते. सतत तीन वर्षांपर्यंत सेंद्रिय शेती करून उत्पादन घेतल्यानंतरच ती शेती सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित केली जाते. सेंद्रिय शेतीसाठी ते क्षेत्र इतर शेतापासून संपूर्णपणे वेगळे करावे लागते. दुसऱ्या रासायनिक शेतातील पाणी त्या शेतात कधीच शिरू नये, याची काळजी घ्यावी लागते. सेंद्रिय शेतीला मिळणारे पाणी रासायनिक खते व पेस्टीसाईड्सपासून मुक्त असणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीसाठी युरोगॅप या विशिष्ट पद्धतीचा वापर करावा लागतो. या पद्धतीसाठी युरोपियन देशांनी काही मानके ठरविली आहेत. यात सर्वात आधी साईल टेस्टींग केली जाते. कीटकनाशकांचे परिणात नष्ट करावे लागतात. सेंद्रिय पदार्थांतूनच जनावरांसाठी चारा तयार करावा लागतो. नंतर त्याच जनावरांच्या शेणाचे खत सेंद्रिय शेतीसाठी उपयोगात आणावे लागते. मजुरांची स्वच्छता यावर मोठा भर असतो. मजूर शौचास जरी गेला तरी विशिष्ट अशा साबणाने त्याला आपले हात स्वच्छ करून घ्यावे लागते. सेंद्रिय शेतात दर दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत त्या एजंसीचे माणसे येवून तपासणी करून जातात. या सर्व प्रकारामुळे सेंद्रिय शेती करणे अत्यंत जटिल असल्यामुळे शेतकरी ही शेती करण्यास सहजासहजी धजावत नाही. सेंद्रिय शेती करण्यासाठी काही प्रमाणात अडचणी आहेत. एमआरएलमुळे (मॅक्सीमम रेसीड्युअल लेवल) सेंद्रिय शेती रासायनिक शेतीला पर्याय ठरू शकते. एमआरएल हे नागपूर येथे असून येथे उत्पादित झालेल्या धान्यातील ३२ प्रकारच्या केमिकल्सची तपासणी केली जाते. धानपीकच नव्हे तर फळभाज्यांसाठी सुद्धा आपण सेंद्रिय शेती करू शकतो. रासायनिक खतांना एका स्तरावर नियंत्रित ठेवून, उत्पादकता कमी न करता सेंद्रिय अन्नाचे उत्पादन घेतले जावू शकते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)