शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्रमाणित सेंद्रिय शेतीच नाही

By admin | Updated: August 21, 2014 23:57 IST

सेंद्रिय शेती करणे अत्यंत कठिण असते. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात कुठेही प्रमाणित सेंद्रिय शेती नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

गोंदिया : सेंद्रिय शेती करणे अत्यंत कठिण असते. संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात कुठेही प्रमाणित सेंद्रिय शेती नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यावर्षी जिल्ह्यात १६ हजार ८६२ हेक्टर क्षेत्रात श्री पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यासाठी एका एकर शेतजमिनीत पाच किलोप्रमाणे बियाणे घालण्यात आले. मागील वर्षीही श्रीपद्धतीने जवळपास १५ ते १५ हेक्टर जमिनीत लागवड करण्यात आली, असे कुरील यांनी सांगितले. सेंद्रिय शेती करणे अत्यंत जिकरीचे काम असते. सतत तीन वर्षांपर्यंत सेंद्रिय शेती करून उत्पादन घेतल्यानंतरच ती शेती सेंद्रिय शेती म्हणून प्रमाणित केली जाते. सेंद्रिय शेतीसाठी ते क्षेत्र इतर शेतापासून संपूर्णपणे वेगळे करावे लागते. दुसऱ्या रासायनिक शेतातील पाणी त्या शेतात कधीच शिरू नये, याची काळजी घ्यावी लागते. सेंद्रिय शेतीला मिळणारे पाणी रासायनिक खते व पेस्टीसाईड्सपासून मुक्त असणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीसाठी युरोगॅप या विशिष्ट पद्धतीचा वापर करावा लागतो. या पद्धतीसाठी युरोपियन देशांनी काही मानके ठरविली आहेत. यात सर्वात आधी साईल टेस्टींग केली जाते. कीटकनाशकांचे परिणात नष्ट करावे लागतात. सेंद्रिय पदार्थांतूनच जनावरांसाठी चारा तयार करावा लागतो. नंतर त्याच जनावरांच्या शेणाचे खत सेंद्रिय शेतीसाठी उपयोगात आणावे लागते. मजुरांची स्वच्छता यावर मोठा भर असतो. मजूर शौचास जरी गेला तरी विशिष्ट अशा साबणाने त्याला आपले हात स्वच्छ करून घ्यावे लागते. सेंद्रिय शेतात दर दोन-तीन महिन्यांच्या कालावधीत त्या एजंसीचे माणसे येवून तपासणी करून जातात. या सर्व प्रकारामुळे सेंद्रिय शेती करणे अत्यंत जटिल असल्यामुळे शेतकरी ही शेती करण्यास सहजासहजी धजावत नाही. सेंद्रिय शेती करण्यासाठी काही प्रमाणात अडचणी आहेत. एमआरएलमुळे (मॅक्सीमम रेसीड्युअल लेवल) सेंद्रिय शेती रासायनिक शेतीला पर्याय ठरू शकते. एमआरएल हे नागपूर येथे असून येथे उत्पादित झालेल्या धान्यातील ३२ प्रकारच्या केमिकल्सची तपासणी केली जाते. धानपीकच नव्हे तर फळभाज्यांसाठी सुद्धा आपण सेंद्रिय शेती करू शकतो. रासायनिक खतांना एका स्तरावर नियंत्रित ठेवून, उत्पादकता कमी न करता सेंद्रिय अन्नाचे उत्पादन घेतले जावू शकते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)