शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

दोन वर्षांपासून तंटामुक्त गावांची घोषणाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:26 IST

गोंदिया : गावात शांतता निर्माण करुन गावातील तंट्याचे गावातच निवारण महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला सध्या उतरती कळा लागली ...

गोंदिया : गावात शांतता निर्माण करुन गावातील तंट्याचे गावातच निवारण महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला सध्या उतरती कळा लागली आहे. या मोहिमेकडे शासनाचे दुर्लक्ष झाले असून, मागील दाेन वर्षांपासून तंटामुक्त गावांची घोषणाच झाली नाही.

राज्य शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतून गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखून गावातील अवैध धंधाना आळा घालणे. अवैध धंदे करणाऱ्यांना सन्मानाच्या रोजगाराकडे वळविणे, क्षुल्लक वादाचे पर्यावसान मोठ्या वादात होऊ नये, स्त्रीभ्रूणहत्येवर आळा घालणे, कन्यारत्न जन्मानंद भेट, मुलींना तंटामुक्त गाव मोहीम आघाडी मोठ्या वादात होऊ नये, गाव जन्म देणाऱ्या मातांचा गौरव, नवविवाहित मुलींना माहेरभेट, जातीय सलोखा राखणे, गाड्यातूनच तंट्याचा निपटारा करणे, हुंडाबंदी करण्यात आली. आंतरजातीय विवाह घडवून आणला. समाजातील अनिष्ट चालीरिती व परंपरा यावर आळा घातला. सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, विधवा, परित्यक्ता यांना मदत, वृक्षारोपण करण्यात आले. तंटामुक्त मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करून राज्यातील १९ हजारांपेक्षा अधिक गावांनी शांततेच्या मार्गाने गावाचा विकास करण्यावर या योजनेच्या माध्यमातून भर देण्यात आला. सन २०१५-१६ ते सन २०१९-२० या पाच वर्षांतील तंटामुक्त गावांची घोषणाच झाली नाही. सन २००७ मध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेतून महाराष्ट्रात शांततेची गंगा वाहात होती, परंतु फडणवीस सरकार सत्तेत येताच, या मोहिमेकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता महाविकास आघाडी सरकारही कोरोनात गुरफटलेली असल्याने, या मोहिमेकडे दुर्लक्ष करण्यात आले. गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडवून राज्यातील १० लाखांवरील तंटे सामोपचाराने सोडविणारी तंटामुक्त मोहीम आज अश्रू ढासळत आहे.

बॉक्स

मोहीम ढाळत आहे अश्रू

न्यायालय व पोलिसांच्या कामाचा तान कमी करण्यासाठी तंटामुक्त मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेला वृद्धिगंत करण्यापेक्षा त्या मोहिमेकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे तंटामुक्त मोहीम अश्रू ढाळत आहे. महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.