शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येत होत आहे घट

By admin | Updated: July 15, 2015 02:15 IST

पृथ्वीवरील जीवनाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाने अन्नसाखळी निर्माण केली आहे.

मांसभक्षी संकटात : अन्नसाखळीचा समतोल बिघडण्याची शक्यतागोंदिया : पृथ्वीवरील जीवनाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाने अन्नसाखळी निर्माण केली आहे. अन्नसाखळीमुळे सृष्टीतील जीवांमध्ये विविधता आढळते. पूर्वीच्या काळात चोहीकडे घटदाट स्वरुपाचे अरण्य होते. त्यात तृणभक्षी प्राण्यांना खाऊन मांसभक्षी प्राणी जगत होते. परंतु आधुनिक काळातील काही वर्षात जंगलामध्ये मानवी हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे. मानवाच्या अती महत्त्वाकांक्षेमुळे प्राण्यांची अन्नसाखळी मात्र खंडित होत आहे. त्यामुळे वाघ, सिंह, कोल्हे यासारखे मासंभक्षी प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.चीन हा देश वांघाचे मूळ आणि कुळ असल्याचे अनेक दाखले मिळतात. त्यानंतर वाघांचा इतरत्र भागात फैलाव झाल्याचे कळते. त्याकाळी वाघाच्या आठ उपप्रजाती अस्तित्वात होत्या. परंतु आजघडीला मात्र केवळ पाच उपजाती शिल्लक आहेत. यावरुन वाघांची संख्या किती झपाट्याने कमी होत आहे, याची सहज कल्पना येऊ शकते. पूर्वीच्या काळी घनदाट, विशाल व विस्तृत जंगले होती. जंगलात फक्त नानाविध प्राण्यांचे साम्राज्य होते. जंगलाचे नाव जरी काढले तर अंगावर काटे उभे राहायचे. भीतीमुळेच जंगले सुरक्षित होती. परंतु माणूस जसाजसा प्रगतीचा एकेक टप्पा गाठत गेला, तशी त्याची महत्वकांक्षा वाढत गेली. वितभर पोटासाठी त्याने वाघांच्या हत्या तर घडवून आणल्याच शिवाय हरणासारख्या तृणभक्षी प्राण्यांचाही मोठ्या प्रमाणात फडशा पाडला. कधी छंदापायी तर कधी पैशाच्या लालसेने वन्यजीवांना संपविण्यात आले. थुईथुई नाचणाऱ्या मोरांचे मांस खाण्यात माणसांना मजा वाटू लागली. मांस खाण्याची मनुष्याची लालसा व पैशाचा लोभ या प्रकाराने त्याने कायद्याचे उल्लंघन करून छपूनचोरून वन्यप्राण्यांच्या शिकारी करणे सुरू ठेवले.काही संवेदनशील माणसांनी या विरोधात आवाज उठविला. त्यामुळे शासनाने शिकारीवर निर्बंध लादले. परंतु या नियमांची अंमलबजावणी करण्याची यंत्रणाच संवदेनशील नसल्यामुळे प्राण्यांची हत्या अजून थांबलेली नाही.वन्यजीवांच्या होणाऱ्या हत्येमुळे काही प्राणी नामशेष तर राहणार नाही, असा प्रश्न शासनाला पडला. त्यामुळे वाघांच्या संरक्षणासाठी संरक्षित क्षेत्र तयार करण्यात आले. जंगलाचे काही क्षेत्रफळ केवळ वन्यजीवांसाठी राखीव ठेवण्यात आले. या क्षेत्रात मानवाचा हस्तक्षेप नसावा म्हणून कठोर कायदे तयार करण्यात आले.कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मोठा फौजफाटा उभारण्यात आला. मंत्रालय, सचिवालय, वनपाल, वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, रेंजर अशी विविध पदे निर्माण करण्यात आली. त्याच्या दिमतीला असणाऱ्या मोटारी, वेतन व भत्ते यावर वारेमाप खर्च करण्यात येऊ लागला. परंतु वाघ सोडून मानवानेच आता तृणभक्षी प्राण्यांचे मांस खाणे सुरु केले आहे. त्यामुळे त्याची संख्या कमी झाली. पर्यायाने याचा प्रभाव वाघ, सिंह यांच्यासारख्या मांसभक्षी प्राण्यांवर होऊन त्यांची संख्या घटत आहे. यामुळे हे प्राणी वारंवार गांवामध्ये शिरत असून नाहक मारले जात आहेत.नैसर्गिक अन्नसाखळीतील प्राण्यांना जगण्यामण्याचा अधिकार असून जंगलातील सर्वच प्राण्यांचे रक्षण करणे आपले सामाजिक दायित्व आहे. ते पार पाडण्याची गरज आता निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)