शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

तृणभक्षी प्राण्यांच्या संख्येत होत आहे घट

By admin | Updated: July 15, 2015 02:15 IST

पृथ्वीवरील जीवनाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाने अन्नसाखळी निर्माण केली आहे.

मांसभक्षी संकटात : अन्नसाखळीचा समतोल बिघडण्याची शक्यतागोंदिया : पृथ्वीवरील जीवनाचा समतोल राखण्यासाठी निसर्गाने अन्नसाखळी निर्माण केली आहे. अन्नसाखळीमुळे सृष्टीतील जीवांमध्ये विविधता आढळते. पूर्वीच्या काळात चोहीकडे घटदाट स्वरुपाचे अरण्य होते. त्यात तृणभक्षी प्राण्यांना खाऊन मांसभक्षी प्राणी जगत होते. परंतु आधुनिक काळातील काही वर्षात जंगलामध्ये मानवी हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे. मानवाच्या अती महत्त्वाकांक्षेमुळे प्राण्यांची अन्नसाखळी मात्र खंडित होत आहे. त्यामुळे वाघ, सिंह, कोल्हे यासारखे मासंभक्षी प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.चीन हा देश वांघाचे मूळ आणि कुळ असल्याचे अनेक दाखले मिळतात. त्यानंतर वाघांचा इतरत्र भागात फैलाव झाल्याचे कळते. त्याकाळी वाघाच्या आठ उपप्रजाती अस्तित्वात होत्या. परंतु आजघडीला मात्र केवळ पाच उपजाती शिल्लक आहेत. यावरुन वाघांची संख्या किती झपाट्याने कमी होत आहे, याची सहज कल्पना येऊ शकते. पूर्वीच्या काळी घनदाट, विशाल व विस्तृत जंगले होती. जंगलात फक्त नानाविध प्राण्यांचे साम्राज्य होते. जंगलाचे नाव जरी काढले तर अंगावर काटे उभे राहायचे. भीतीमुळेच जंगले सुरक्षित होती. परंतु माणूस जसाजसा प्रगतीचा एकेक टप्पा गाठत गेला, तशी त्याची महत्वकांक्षा वाढत गेली. वितभर पोटासाठी त्याने वाघांच्या हत्या तर घडवून आणल्याच शिवाय हरणासारख्या तृणभक्षी प्राण्यांचाही मोठ्या प्रमाणात फडशा पाडला. कधी छंदापायी तर कधी पैशाच्या लालसेने वन्यजीवांना संपविण्यात आले. थुईथुई नाचणाऱ्या मोरांचे मांस खाण्यात माणसांना मजा वाटू लागली. मांस खाण्याची मनुष्याची लालसा व पैशाचा लोभ या प्रकाराने त्याने कायद्याचे उल्लंघन करून छपूनचोरून वन्यप्राण्यांच्या शिकारी करणे सुरू ठेवले.काही संवेदनशील माणसांनी या विरोधात आवाज उठविला. त्यामुळे शासनाने शिकारीवर निर्बंध लादले. परंतु या नियमांची अंमलबजावणी करण्याची यंत्रणाच संवदेनशील नसल्यामुळे प्राण्यांची हत्या अजून थांबलेली नाही.वन्यजीवांच्या होणाऱ्या हत्येमुळे काही प्राणी नामशेष तर राहणार नाही, असा प्रश्न शासनाला पडला. त्यामुळे वाघांच्या संरक्षणासाठी संरक्षित क्षेत्र तयार करण्यात आले. जंगलाचे काही क्षेत्रफळ केवळ वन्यजीवांसाठी राखीव ठेवण्यात आले. या क्षेत्रात मानवाचा हस्तक्षेप नसावा म्हणून कठोर कायदे तयार करण्यात आले.कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मोठा फौजफाटा उभारण्यात आला. मंत्रालय, सचिवालय, वनपाल, वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, रेंजर अशी विविध पदे निर्माण करण्यात आली. त्याच्या दिमतीला असणाऱ्या मोटारी, वेतन व भत्ते यावर वारेमाप खर्च करण्यात येऊ लागला. परंतु वाघ सोडून मानवानेच आता तृणभक्षी प्राण्यांचे मांस खाणे सुरु केले आहे. त्यामुळे त्याची संख्या कमी झाली. पर्यायाने याचा प्रभाव वाघ, सिंह यांच्यासारख्या मांसभक्षी प्राण्यांवर होऊन त्यांची संख्या घटत आहे. यामुळे हे प्राणी वारंवार गांवामध्ये शिरत असून नाहक मारले जात आहेत.नैसर्गिक अन्नसाखळीतील प्राण्यांना जगण्यामण्याचा अधिकार असून जंगलातील सर्वच प्राण्यांचे रक्षण करणे आपले सामाजिक दायित्व आहे. ते पार पाडण्याची गरज आता निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)