शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

अतिवृष्टीग्रस्त ९५० शेतकऱ्यांना अद्याप मदत वाटप नाही

By admin | Updated: September 9, 2014 00:28 IST

गेल्या वर्षात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी सरकारच्या वतीने त्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. पण आता वर्ष लोटले तरीही आतापर्यंत कामठा

खातिया : गेल्या वर्षात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यासाठी सरकारच्या वतीने त्यांना मदत जाहीर करण्यात आली होती. पण आता वर्ष लोटले तरीही आतापर्यंत कामठा येथील बँक आॅफ इंडियाअंतर्गत खाते उघडले असताना ९५० शेतकऱ्यांना ती मदत मिळालीच नाही. त्यामुळे या बँक अंतर्गत येणारे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बँकेत गेल्यानंतर येथील कर्मचारी पटवारी कार्यालयात शेतकऱ्यांना पाठवत आहेत. पटवारी कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची यादी व त्यांचे खाता नंबर हे ही संबंधित विभागाकडे पाठविण्यात आले आहेत. एक वर्ष होत चालले आहेत. पण शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीकडे कोणाचेही लक्ष नाही. कामठा सर्कलअंतर्गत येणारे गाव खातीया, बिरसी, मोगर्रा, कामठा, पांजरा, झीलमिली, परसवाडा, ईर्री, नवरगाव, छिपीया व परिसरातील अनेक गावाच्या शेतकऱ्यांचे खाते हे कामठा बँक आॅफ इंडिया येथे उघडलेले आहेत. पण आतापर्यंत शेतकऱ्यांना मदतीचे पैसे मिळत नसल्याने ते बँकामध्ये जाऊन जाऊन त्रस्त झाले आहेत. वरील माहिती देताना बिरसी येथील सामाजिक कार्यकर्ते शेतकरी गोविंदसिंह पंडेले यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या मदतीचे रुपये हे गेल्या कित्येक महिन्यांपासून संबंधित विभागाकडे जमा आहेत. पण आतापर्यंत ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. ही विभागाची लापरवाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय.