शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

चारही प्रकल्पांच्या ११० रजिस्ट्री लांबल्या

By admin | Updated: May 26, 2017 00:32 IST

गोंदिया मध्यम प्रकल्प विभागांतर्गत चार मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी भू संपादनाचे कार्य मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.

१८७ रजिस्ट्री लागल्यादेवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया मध्यम प्रकल्प विभागांतर्गत चार मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी भू संपादनाचे कार्य मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे चारही प्रकल्प पूर्णत्वास गेले तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल. आतापर्यंत सदर चारही मध्यम प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या १८७ रजिस्ट्रीचे काम पूर्णत्वास गेले असून सातबारा अपडेट होण्याच्या विलंबामुळे ११० रजिस्ट्रींचे काम लांबले आहे.गोंदिया मध्यम प्रकल्प विभागांतर्गत रजेगाव-काटी, कलपाथरी, कटंगी व तेढवा-शिवणी मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. यात सद्यस्थितीत रजेगाव-काटी प्रकल्पांतर्गत ८२ रजिस्ट्री लागल्या असून २१ बाकी आहेत. कटंगी मध्यम प्रकल्पांतर्गत २० रजिस्ट्री लागल्या असून ८ बाकी तर तेढवा-शिवणी मध्यम प्रकल्पांतर्गत पाच रजिस्ट्री लागल्या असून दोन बाकी आहेत. सर्वाधित बाकी असलेल्या रजिस्ट्रीमध्ये कलपाथरी मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. कलपाथरी प्रकल्पांतर्गत ८० रजिस्ट्री लागल्या असून ७९ बाकी आहेत. उल्लेखनिय म्हणजे काही सातबारावर १५ ते २५ लोकांची नावे आहेत. त्यापैकी अनेकांचा मृत्यू झालेला आहे. त्यातच सातबारा अपडेट न झाल्याने रजिस्ट्रीची प्रक्रिया लांबणीवर गेल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. तर काहींची रजिस्ट्री झाल्यानंतर फेरफारचे कामही प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे. रजेगाव-काटी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कलंगटोला येथे एका सातबारावर तब्बल ३८ जणांची नावे असून सर्वच जणांचा मृत्यू झाला आहे. असे प्रकार समोर येत असल्याने ही प्रक्रिया लांबणीवर जात आहे.सर्वाधिक रजिस्ट्री बाकी असलेल्या गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी मध्यम प्रकल्पाच्या दोन कालव्यांचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. सदर काम जून अखेरपर्यंत पूर्णत्वास जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर सदर प्रकल्पाला व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतर करण्यात येईल व तेच विभाग त्याचे मेंटेनंस करणार आहे. मात्र अद्यापही ८ हेक्टरचे भू संपादन बाकीच आहे.कलपाथरी प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मान्यता सन १९८४ मध्ये मिळाली. त्यावेळी त्याची मूळ प्रशासकीय किंमत २०२.५८ लाख होती. तर सुधारित मान्यता सन २०१६ मध्ये मिळाली असून सुधारित प्रशासकीय किंमत ८०१०.१२ लाख एवढी आहे. सदर प्रकल्पाची दोन हजार ५५९ हेक्टर सिंचन क्षमता आहे. पूर्वी दोन गावे पाण्याखाली गेली होती. त्या गावांचे पुनर्वसन गोरेगावजवळ श्रीरामपूर येथे करण्यात आले. सदर प्रकल्प पूर्ण जवळपास पूर्णच झाले असून यात मागील सहा वर्षांपासून पाणीसाठी असतो. या प्रकल्पाचा पूर्ण साठा ८.६० दलघमी असून उपयुक्त पाणीसाठी ६.५९ दलघमी आहे. धरण लांबी १ हजार ९६० मीटर आहे. बुडीत क्षेत्र ४१५.१८ हेक्टर व कालव्याखाली ७९.७८ हेक्टर क्षेत्र आहे.