शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

चारही प्रकल्पांच्या ११० रजिस्ट्री लांबल्या

By admin | Updated: May 26, 2017 00:32 IST

गोंदिया मध्यम प्रकल्प विभागांतर्गत चार मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी भू संपादनाचे कार्य मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.

१८७ रजिस्ट्री लागल्यादेवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया मध्यम प्रकल्प विभागांतर्गत चार मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी भू संपादनाचे कार्य मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे चारही प्रकल्प पूर्णत्वास गेले तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल. आतापर्यंत सदर चारही मध्यम प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या १८७ रजिस्ट्रीचे काम पूर्णत्वास गेले असून सातबारा अपडेट होण्याच्या विलंबामुळे ११० रजिस्ट्रींचे काम लांबले आहे.गोंदिया मध्यम प्रकल्प विभागांतर्गत रजेगाव-काटी, कलपाथरी, कटंगी व तेढवा-शिवणी मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. यात सद्यस्थितीत रजेगाव-काटी प्रकल्पांतर्गत ८२ रजिस्ट्री लागल्या असून २१ बाकी आहेत. कटंगी मध्यम प्रकल्पांतर्गत २० रजिस्ट्री लागल्या असून ८ बाकी तर तेढवा-शिवणी मध्यम प्रकल्पांतर्गत पाच रजिस्ट्री लागल्या असून दोन बाकी आहेत. सर्वाधित बाकी असलेल्या रजिस्ट्रीमध्ये कलपाथरी मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. कलपाथरी प्रकल्पांतर्गत ८० रजिस्ट्री लागल्या असून ७९ बाकी आहेत. उल्लेखनिय म्हणजे काही सातबारावर १५ ते २५ लोकांची नावे आहेत. त्यापैकी अनेकांचा मृत्यू झालेला आहे. त्यातच सातबारा अपडेट न झाल्याने रजिस्ट्रीची प्रक्रिया लांबणीवर गेल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. तर काहींची रजिस्ट्री झाल्यानंतर फेरफारचे कामही प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे. रजेगाव-काटी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कलंगटोला येथे एका सातबारावर तब्बल ३८ जणांची नावे असून सर्वच जणांचा मृत्यू झाला आहे. असे प्रकार समोर येत असल्याने ही प्रक्रिया लांबणीवर जात आहे.सर्वाधिक रजिस्ट्री बाकी असलेल्या गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी मध्यम प्रकल्पाच्या दोन कालव्यांचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. सदर काम जून अखेरपर्यंत पूर्णत्वास जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर सदर प्रकल्पाला व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतर करण्यात येईल व तेच विभाग त्याचे मेंटेनंस करणार आहे. मात्र अद्यापही ८ हेक्टरचे भू संपादन बाकीच आहे.कलपाथरी प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मान्यता सन १९८४ मध्ये मिळाली. त्यावेळी त्याची मूळ प्रशासकीय किंमत २०२.५८ लाख होती. तर सुधारित मान्यता सन २०१६ मध्ये मिळाली असून सुधारित प्रशासकीय किंमत ८०१०.१२ लाख एवढी आहे. सदर प्रकल्पाची दोन हजार ५५९ हेक्टर सिंचन क्षमता आहे. पूर्वी दोन गावे पाण्याखाली गेली होती. त्या गावांचे पुनर्वसन गोरेगावजवळ श्रीरामपूर येथे करण्यात आले. सदर प्रकल्प पूर्ण जवळपास पूर्णच झाले असून यात मागील सहा वर्षांपासून पाणीसाठी असतो. या प्रकल्पाचा पूर्ण साठा ८.६० दलघमी असून उपयुक्त पाणीसाठी ६.५९ दलघमी आहे. धरण लांबी १ हजार ९६० मीटर आहे. बुडीत क्षेत्र ४१५.१८ हेक्टर व कालव्याखाली ७९.७८ हेक्टर क्षेत्र आहे.