शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

चारही प्रकल्पांच्या ११० रजिस्ट्री लांबल्या

By admin | Updated: May 26, 2017 00:32 IST

गोंदिया मध्यम प्रकल्प विभागांतर्गत चार मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी भू संपादनाचे कार्य मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.

१८७ रजिस्ट्री लागल्यादेवानंद शहारे । लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया मध्यम प्रकल्प विभागांतर्गत चार मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांसाठी भू संपादनाचे कार्य मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे चारही प्रकल्प पूर्णत्वास गेले तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागेल. आतापर्यंत सदर चारही मध्यम प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या १८७ रजिस्ट्रीचे काम पूर्णत्वास गेले असून सातबारा अपडेट होण्याच्या विलंबामुळे ११० रजिस्ट्रींचे काम लांबले आहे.गोंदिया मध्यम प्रकल्प विभागांतर्गत रजेगाव-काटी, कलपाथरी, कटंगी व तेढवा-शिवणी मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे. यात सद्यस्थितीत रजेगाव-काटी प्रकल्पांतर्गत ८२ रजिस्ट्री लागल्या असून २१ बाकी आहेत. कटंगी मध्यम प्रकल्पांतर्गत २० रजिस्ट्री लागल्या असून ८ बाकी तर तेढवा-शिवणी मध्यम प्रकल्पांतर्गत पाच रजिस्ट्री लागल्या असून दोन बाकी आहेत. सर्वाधित बाकी असलेल्या रजिस्ट्रीमध्ये कलपाथरी मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. कलपाथरी प्रकल्पांतर्गत ८० रजिस्ट्री लागल्या असून ७९ बाकी आहेत. उल्लेखनिय म्हणजे काही सातबारावर १५ ते २५ लोकांची नावे आहेत. त्यापैकी अनेकांचा मृत्यू झालेला आहे. त्यातच सातबारा अपडेट न झाल्याने रजिस्ट्रीची प्रक्रिया लांबणीवर गेल्याचे संबंधितांनी सांगितले आहे. तर काहींची रजिस्ट्री झाल्यानंतर फेरफारचे कामही प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे. रजेगाव-काटी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कलंगटोला येथे एका सातबारावर तब्बल ३८ जणांची नावे असून सर्वच जणांचा मृत्यू झाला आहे. असे प्रकार समोर येत असल्याने ही प्रक्रिया लांबणीवर जात आहे.सर्वाधिक रजिस्ट्री बाकी असलेल्या गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी मध्यम प्रकल्पाच्या दोन कालव्यांचे काम सद्यस्थितीत सुरू आहे. सदर काम जून अखेरपर्यंत पूर्णत्वास जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर सदर प्रकल्पाला व्यवस्थापन विभागाकडे हस्तांतर करण्यात येईल व तेच विभाग त्याचे मेंटेनंस करणार आहे. मात्र अद्यापही ८ हेक्टरचे भू संपादन बाकीच आहे.कलपाथरी प्रकल्पाला मूळ प्रशासकीय मान्यता सन १९८४ मध्ये मिळाली. त्यावेळी त्याची मूळ प्रशासकीय किंमत २०२.५८ लाख होती. तर सुधारित मान्यता सन २०१६ मध्ये मिळाली असून सुधारित प्रशासकीय किंमत ८०१०.१२ लाख एवढी आहे. सदर प्रकल्पाची दोन हजार ५५९ हेक्टर सिंचन क्षमता आहे. पूर्वी दोन गावे पाण्याखाली गेली होती. त्या गावांचे पुनर्वसन गोरेगावजवळ श्रीरामपूर येथे करण्यात आले. सदर प्रकल्प पूर्ण जवळपास पूर्णच झाले असून यात मागील सहा वर्षांपासून पाणीसाठी असतो. या प्रकल्पाचा पूर्ण साठा ८.६० दलघमी असून उपयुक्त पाणीसाठी ६.५९ दलघमी आहे. धरण लांबी १ हजार ९६० मीटर आहे. बुडीत क्षेत्र ४१५.१८ हेक्टर व कालव्याखाली ७९.७८ हेक्टर क्षेत्र आहे.