शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णवाहिकेलाच उपचाराची गरज

By admin | Updated: August 15, 2016 00:11 IST

१०८ क्रमांकावरून मिळणारी तिरोडा येथील रूग्णवाहिका सतत नादुरूस्त असते. यामुळे तिरोडावासीयांना एकोडी येथील रूग्णवाहिका बोलवावी लागते.

नेहमीच नादुरूस्त : रूग्णांची होते गैरसोय गोंदिया : १०८ क्रमांकावरून मिळणारी तिरोडा येथील रूग्णवाहिका सतत नादुरूस्त असते. यामुळे तिरोडावासीयांना एकोडी येथील रूग्णवाहिका बोलवावी लागते. यात चालक व संबंधित कर्मचारीच संगनमत करून गोंदियाला रूग्ण नेण्यास टाळतात की खरोखरच रूग्णवाहिका नादुरूस्त आहे हे कळणे कठीण आहे. मात्र संबंधित कर्मचारी व या रूग्णवाहिकेलाच उपचाराची गरज दिसून येत असल्याचे नागरिक बोलत आहेत. शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून आरोग्य सेवेला प्राधान्य दिले आहे. मात्र आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनाच आपले आरोग्य आणखी बिघडावे लागत असेल तर त्या सेवेचे फलीत काय? असा सवाल नागरिक करतात. यासाठी कंत्राटदाराचा हलगर्जीपणा, को-आॅर्डिनेटरचा निष्काळजीपणा व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाचा अभाव या बाबी कारणीभूत ठरत आहेत. या प्रकाराने एखाद्यावेळी रूग्ण दगावण्याचीच शक्यता अधिक असते. रूग्णास घरापासून रूग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची सोय आहे. गोंदिया जिल्ह्यास १०८ क्रमांकाच्या अशा १२ रूग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी गोंदियात दोन, तिरोडा येथे एक, एकोडी येथे एक अशाप्रकारे रूग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. १०८ क्रमांकावर फोन लावताच पुणेवरून आपल्याला रूग्णाचे नाव व स्थळ विचारले जाते. त्यानंतर जवळच्या रूग्णालयातील डॉक्टरांशी बोलणे करून दिले जाते. दिलेल्या पत्त्यावर एक डॉक्टर चालकासह रूग्णवाहिका घेवून येतो व रूग्णाला रूग्णालयापर्यंत पोहोचविले जाते. १०८ क्रमाकांच्या रूग्णवाहिकेद्वारे ही सोय नि:शुल्क असते. शिवाय अत्यावश्यक सेवा असल्याने ही रूग्णवाहिका अद्ययावत ठेवणे आवश्यक असते. मात्र तिरोडा येथील १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका बिघडली आहे, असे सदर रूग्णवाहिकेचा चालक सांगतो. एकदाच नव्हे तर असे प्रकार अनेकदा घडले आहेत. शिवाय ही शासकीय रूग्णवाहिका तिरोडा येथील एका खासगी रूग्णालयासमोर नेहमीच उभी करून ठेवली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये शंकाकुशंकेचे वातावरण पसरले आहे. तिरोडा येथून १०८ क्रमांकावर फोन लावल्यानंतर ही रूग्णवाहिका रूग्णाच्या घरी येते. मात्र, आम्ही रूग्णाला तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयातच पोहोचवू शकतो. या रूग्णवाहिकेमध्ये बिघाड असल्यामुळे गोंदियाला जिल्हा रूग्णालयात पोहोचवू शकत नाही, असे चालकाचे नेहमीचेच उत्तर असते. मग रूग्णवाहिकेत बिघाड असेल तर तिरोड्यातच रूग्णाला कसे पोहोचविले जाते? असा प्रश्न निर्माण होतो. खरोखर बिघाड असेल तर इमरजंसी सेवेचे हे वाहन मागील तीन-चार महिन्यांपासून नादुरूस्त कसे? असा सवाल नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी) या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज तिरोडा शहरातील १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेचे किंवा तिचे संचालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत गंभीर बाब असून याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे. रूग्णवाहिकेची अशीच स्थिती राहिल्यास १०८ क्रमांकाच्या या सुविधेचा फायदाच काय राहणार. शिवाय सेवेअभावी भविष्यात तिरोड्यातील अनेक गंभीर रूग्ण दगावण्याचीच शक्यता अधिक आहे.