शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
5
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
6
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
7
बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
8
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
9
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
10
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
11
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
12
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
13
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
14
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
15
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
16
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
17
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
18
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
20
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष

रूग्णवाहिकेलाच उपचाराची गरज

By admin | Updated: August 15, 2016 00:11 IST

१०८ क्रमांकावरून मिळणारी तिरोडा येथील रूग्णवाहिका सतत नादुरूस्त असते. यामुळे तिरोडावासीयांना एकोडी येथील रूग्णवाहिका बोलवावी लागते.

नेहमीच नादुरूस्त : रूग्णांची होते गैरसोय गोंदिया : १०८ क्रमांकावरून मिळणारी तिरोडा येथील रूग्णवाहिका सतत नादुरूस्त असते. यामुळे तिरोडावासीयांना एकोडी येथील रूग्णवाहिका बोलवावी लागते. यात चालक व संबंधित कर्मचारीच संगनमत करून गोंदियाला रूग्ण नेण्यास टाळतात की खरोखरच रूग्णवाहिका नादुरूस्त आहे हे कळणे कठीण आहे. मात्र संबंधित कर्मचारी व या रूग्णवाहिकेलाच उपचाराची गरज दिसून येत असल्याचे नागरिक बोलत आहेत. शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून आरोग्य सेवेला प्राधान्य दिले आहे. मात्र आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनाच आपले आरोग्य आणखी बिघडावे लागत असेल तर त्या सेवेचे फलीत काय? असा सवाल नागरिक करतात. यासाठी कंत्राटदाराचा हलगर्जीपणा, को-आॅर्डिनेटरचा निष्काळजीपणा व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाचा अभाव या बाबी कारणीभूत ठरत आहेत. या प्रकाराने एखाद्यावेळी रूग्ण दगावण्याचीच शक्यता अधिक असते. रूग्णास घरापासून रूग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची सोय आहे. गोंदिया जिल्ह्यास १०८ क्रमांकाच्या अशा १२ रूग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. यापैकी गोंदियात दोन, तिरोडा येथे एक, एकोडी येथे एक अशाप्रकारे रूग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. १०८ क्रमांकावर फोन लावताच पुणेवरून आपल्याला रूग्णाचे नाव व स्थळ विचारले जाते. त्यानंतर जवळच्या रूग्णालयातील डॉक्टरांशी बोलणे करून दिले जाते. दिलेल्या पत्त्यावर एक डॉक्टर चालकासह रूग्णवाहिका घेवून येतो व रूग्णाला रूग्णालयापर्यंत पोहोचविले जाते. १०८ क्रमाकांच्या रूग्णवाहिकेद्वारे ही सोय नि:शुल्क असते. शिवाय अत्यावश्यक सेवा असल्याने ही रूग्णवाहिका अद्ययावत ठेवणे आवश्यक असते. मात्र तिरोडा येथील १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका बिघडली आहे, असे सदर रूग्णवाहिकेचा चालक सांगतो. एकदाच नव्हे तर असे प्रकार अनेकदा घडले आहेत. शिवाय ही शासकीय रूग्णवाहिका तिरोडा येथील एका खासगी रूग्णालयासमोर नेहमीच उभी करून ठेवली जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये शंकाकुशंकेचे वातावरण पसरले आहे. तिरोडा येथून १०८ क्रमांकावर फोन लावल्यानंतर ही रूग्णवाहिका रूग्णाच्या घरी येते. मात्र, आम्ही रूग्णाला तिरोडा येथील उपजिल्हा रूग्णालयातच पोहोचवू शकतो. या रूग्णवाहिकेमध्ये बिघाड असल्यामुळे गोंदियाला जिल्हा रूग्णालयात पोहोचवू शकत नाही, असे चालकाचे नेहमीचेच उत्तर असते. मग रूग्णवाहिकेत बिघाड असेल तर तिरोड्यातच रूग्णाला कसे पोहोचविले जाते? असा प्रश्न निर्माण होतो. खरोखर बिघाड असेल तर इमरजंसी सेवेचे हे वाहन मागील तीन-चार महिन्यांपासून नादुरूस्त कसे? असा सवाल नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी) या प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज तिरोडा शहरातील १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेचे किंवा तिचे संचालन करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत गंभीर बाब असून याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरविणे गरजेचे आहे. रूग्णवाहिकेची अशीच स्थिती राहिल्यास १०८ क्रमांकाच्या या सुविधेचा फायदाच काय राहणार. शिवाय सेवेअभावी भविष्यात तिरोड्यातील अनेक गंभीर रूग्ण दगावण्याचीच शक्यता अधिक आहे.