शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया-तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2022 21:34 IST

राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला अलीकडे विशेष महत्त्व आले आहे. १५ व्या आयोगामुळे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीत वाढ झाली असून, अधिकारही वाढले आहेत. त्यामुळेच अनेकजण आता जि. प. सदस्य होण्यापेक्षा गावचा सरपंच होण्यात भले मानत गावाच्या राजकारणात रस घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील ३४८ गावांमध्ये गुलाबी थंडीत  हळूहळू राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला अलीकडे विशेष महत्त्व आले आहे. १५ व्या आयोगामुळे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीत वाढ झाली असून, अधिकारही वाढले आहेत. त्यामुळेच अनेकजण आता जि. प. सदस्य होण्यापेक्षा गावचा सरपंच होण्यात भले मानत गावाच्या राजकारणात रस घेत आहेत. त्यातच या निवडणुकीत  सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार असल्याने या निवडणुकीतील चुरस अधिक वाढली आहे. तर या निवडणुकीनंतर नगर परिषद, नगर पंचायत आणि पुढे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी पुढील निवडणुकांची पायवाट मोकळी करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून प्रभावी अशा महिला व पुरुष उमेदवारांचा शोध घेण्यास सुरूवात झाली आहे. तर काहीजण अपक्ष निवडणूक लढू, असे म्हणत थेट जनसंपर्क वाढविण्याच्या कामाला लागले आहेत. एकूणच ऐन थंडीच्या दिवसांत जिल्ह्यातील ३४८ गावांतील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.  

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या 

२३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींची निवडणूक १८ डिसेंबरला होत असून, २० डिसेंबरला या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी  करून निकाल जाहीर केला जाणार आहे. यासंबंधीचा निवडणूक कार्यक्रम ९ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक होत असलेल्या संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २३ डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असून, निवडणूक विभागाचे याकडे लक्ष राहणार आहे.

सरपंचाची निवड होणार थेटn ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३४८ ग्रा. पं.तील सदस्य पदांसह थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम- २८ नोव्हेंबर : निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे.- २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर नामनिर्देशनपत्रे सादर करणे. - ५ डिसेंबर नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे.- ७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. तर याचदिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे.- १८ डिसेंबर मतदान - २० डिसेंबरला मतमोजणी तसेच निकाल घोषित करण्यात येईल.- २३ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

नेत्यांच्या वाढल्या गाठीभेटी ग्रामपंचायतीची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली, तरी गाव पातळीवर पॅनल तयार करून या निवडणुका लढविल्या जातात. हे पॅनल विविध राजकीय पक्षांचे असतात. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या गावपातळीवर  गाठीभेटी आणि बैठका वाढल्याचे चित्र आहे. 

अग्रवाल, रहांगडाले, जैन लागले कामाला- स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायत काबीज करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ७४ ग्रामपंचायतींची निवडणूक तिरोडा तालुक्यात व गोंदिया तालुक्यात ७० ग्रा.पं.ची निवडणूक होणार आहे. तिरोडा विधानसभेचे आ. विजय रहांगडाले, गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आ. विनोद अग्रवाल व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. राजेंद्र जैन हे निवडणुका होऊ घातलेल्या भागात सक्रिय होऊन कामाला लागल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक