शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गोंदिया-तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2022 21:34 IST

राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला अलीकडे विशेष महत्त्व आले आहे. १५ व्या आयोगामुळे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीत वाढ झाली असून, अधिकारही वाढले आहेत. त्यामुळेच अनेकजण आता जि. प. सदस्य होण्यापेक्षा गावचा सरपंच होण्यात भले मानत गावाच्या राजकारणात रस घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील ३४८ गावांमध्ये गुलाबी थंडीत  हळूहळू राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला अलीकडे विशेष महत्त्व आले आहे. १५ व्या आयोगामुळे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीत वाढ झाली असून, अधिकारही वाढले आहेत. त्यामुळेच अनेकजण आता जि. प. सदस्य होण्यापेक्षा गावचा सरपंच होण्यात भले मानत गावाच्या राजकारणात रस घेत आहेत. त्यातच या निवडणुकीत  सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार असल्याने या निवडणुकीतील चुरस अधिक वाढली आहे. तर या निवडणुकीनंतर नगर परिषद, नगर पंचायत आणि पुढे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी पुढील निवडणुकांची पायवाट मोकळी करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून प्रभावी अशा महिला व पुरुष उमेदवारांचा शोध घेण्यास सुरूवात झाली आहे. तर काहीजण अपक्ष निवडणूक लढू, असे म्हणत थेट जनसंपर्क वाढविण्याच्या कामाला लागले आहेत. एकूणच ऐन थंडीच्या दिवसांत जिल्ह्यातील ३४८ गावांतील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.  

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या 

२३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींची निवडणूक १८ डिसेंबरला होत असून, २० डिसेंबरला या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी  करून निकाल जाहीर केला जाणार आहे. यासंबंधीचा निवडणूक कार्यक्रम ९ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक होत असलेल्या संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २३ डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असून, निवडणूक विभागाचे याकडे लक्ष राहणार आहे.

सरपंचाची निवड होणार थेटn ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३४८ ग्रा. पं.तील सदस्य पदांसह थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम- २८ नोव्हेंबर : निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे.- २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर नामनिर्देशनपत्रे सादर करणे. - ५ डिसेंबर नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे.- ७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. तर याचदिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे.- १८ डिसेंबर मतदान - २० डिसेंबरला मतमोजणी तसेच निकाल घोषित करण्यात येईल.- २३ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

नेत्यांच्या वाढल्या गाठीभेटी ग्रामपंचायतीची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली, तरी गाव पातळीवर पॅनल तयार करून या निवडणुका लढविल्या जातात. हे पॅनल विविध राजकीय पक्षांचे असतात. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या गावपातळीवर  गाठीभेटी आणि बैठका वाढल्याचे चित्र आहे. 

अग्रवाल, रहांगडाले, जैन लागले कामाला- स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायत काबीज करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ७४ ग्रामपंचायतींची निवडणूक तिरोडा तालुक्यात व गोंदिया तालुक्यात ७० ग्रा.पं.ची निवडणूक होणार आहे. तिरोडा विधानसभेचे आ. विजय रहांगडाले, गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आ. विनोद अग्रवाल व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. राजेंद्र जैन हे निवडणुका होऊ घातलेल्या भागात सक्रिय होऊन कामाला लागल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक