शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

गोंदिया-तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2022 21:34 IST

राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला अलीकडे विशेष महत्त्व आले आहे. १५ व्या आयोगामुळे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीत वाढ झाली असून, अधिकारही वाढले आहेत. त्यामुळेच अनेकजण आता जि. प. सदस्य होण्यापेक्षा गावचा सरपंच होण्यात भले मानत गावाच्या राजकारणात रस घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यातील ३४८ गावांमध्ये गुलाबी थंडीत  हळूहळू राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीला अलीकडे विशेष महत्त्व आले आहे. १५ व्या आयोगामुळे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीत वाढ झाली असून, अधिकारही वाढले आहेत. त्यामुळेच अनेकजण आता जि. प. सदस्य होण्यापेक्षा गावचा सरपंच होण्यात भले मानत गावाच्या राजकारणात रस घेत आहेत. त्यातच या निवडणुकीत  सरपंचाची निवड ही थेट जनतेतून केली जाणार असल्याने या निवडणुकीतील चुरस अधिक वाढली आहे. तर या निवडणुकीनंतर नगर परिषद, नगर पंचायत आणि पुढे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी पुढील निवडणुकांची पायवाट मोकळी करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून प्रभावी अशा महिला व पुरुष उमेदवारांचा शोध घेण्यास सुरूवात झाली आहे. तर काहीजण अपक्ष निवडणूक लढू, असे म्हणत थेट जनसंपर्क वाढविण्याच्या कामाला लागले आहेत. एकूणच ऐन थंडीच्या दिवसांत जिल्ह्यातील ३४८ गावांतील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.  

तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या 

२३ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता जिल्ह्यातील ३४८ ग्रामपंचायतींची निवडणूक १८ डिसेंबरला होत असून, २० डिसेंबरला या सर्व ग्रामपंचायतींची मतमोजणी  करून निकाल जाहीर केला जाणार आहे. यासंबंधीचा निवडणूक कार्यक्रम ९ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. निवडणूक होत असलेल्या संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. २३ डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू राहणार असून, निवडणूक विभागाचे याकडे लक्ष राहणार आहे.

सरपंचाची निवड होणार थेटn ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ३४८ ग्रा. पं.तील सदस्य पदांसह थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम- २८ नोव्हेंबर : निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे.- २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर नामनिर्देशनपत्रे सादर करणे. - ५ डिसेंबर नामनिर्देशनपत्रांची छाननी करणे.- ७ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. तर याचदिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे.- १८ डिसेंबर मतदान - २० डिसेंबरला मतमोजणी तसेच निकाल घोषित करण्यात येईल.- २३ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

नेत्यांच्या वाढल्या गाठीभेटी ग्रामपंचायतीची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली, तरी गाव पातळीवर पॅनल तयार करून या निवडणुका लढविल्या जातात. हे पॅनल विविध राजकीय पक्षांचे असतात. स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका या महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या गावपातळीवर  गाठीभेटी आणि बैठका वाढल्याचे चित्र आहे. 

अग्रवाल, रहांगडाले, जैन लागले कामाला- स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायत काबीज करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ७४ ग्रामपंचायतींची निवडणूक तिरोडा तालुक्यात व गोंदिया तालुक्यात ७० ग्रा.पं.ची निवडणूक होणार आहे. तिरोडा विधानसभेचे आ. विजय रहांगडाले, गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आ. विनोद अग्रवाल व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. राजेंद्र जैन हे निवडणुका होऊ घातलेल्या भागात सक्रिय होऊन कामाला लागल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक