शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

जुन्या उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद होणार असल्याने मोठ्या पुलावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांपासून हा पूल पाडण्यासाठी बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे. मात्र अद्यापही त्याला यश आले नाही. जोपर्यंत पूल पाडले जात नाही, तोपर्यंत नवीन पुलाच्या बांधकामालाही सुरुवात होणार नाही. त्यातच पुलाखाली राहणाऱ्या कुुटुंबीयांनी आधी आमचे पुनर्वसन करा नंतरच पूल पाडा अशी भूमिका घेतल्याने जिल्हा प्रशासन गोंधळले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया -बालाघाट मार्गावरील रेल्वे उड्डाणपूल जीर्ण झाल्याने वाहतुकीस धोकादायक असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब सर्वप्रथम लोकमतने उघकीस आणली होती. त्यानंतर हा पूल जड वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला होता. केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. आता तब्बल चार वर्षांनंतर जुन्या उड्डाणपुलावरुन वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नयना गुंडे २ मे रोजी काढले आहे. जुन्या उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद होणार असल्याने मोठ्या पुलावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. मागील दोन वर्षांपासून हा पूल पाडण्यासाठी बांधकाम विभाग प्रयत्न करीत आहे. मात्र अद्यापही त्याला यश आले नाही. जोपर्यंत पूल पाडले जात नाही, तोपर्यंत नवीन पुलाच्या बांधकामालाही सुरुवात होणार नाही. त्यातच पुलाखाली राहणाऱ्या कुुटुंबीयांनी आधी आमचे पुनर्वसन करा नंतरच पूल पाडा अशी भूमिका घेतल्याने जिल्हा प्रशासन गोंधळले आहे.

चार वर्षांपासून अहवालाची दखलच नाही - सन २०१८ मध्येच सार्वजनिक बांधकाम विभाग,उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या चमूने  जुन्या आणि नवीन उड्डाणपुलाची पाहणी करून अहवाल सादर केला होता. त्यात हा पूल पूर्णपणे जीर्ण झाला असून त्यावरून वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे २३ जुलै २०१८ रोजी सोपविला होता. त्यानंतर तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा प्रशासनाने या पुुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने काढला.२०१४ मध्ये रेल्वेने दिला होता इशारा- गोंदिया -बालाघाट मार्गावरील जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक असून या उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक असल्याचा इशारा रेल्वे विभागाने २०१४ मध्ये जिल्हा प्रशासनाला पत्र देऊन दिला होता.

७० वर्षांनंतर पुलावरुन वाहतूक बंद 

- गोंदिया बालाघाट मार्गावर १९५२ मध्ये उड्डाणपूल तयार करण्यात आला. या पुलामुळे रेल्वे ट्रॅकमुळे होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यास मदत झाली होती. तेव्हापासून आत्ता पर्यंत म्हणजे जवळ ७० वर्षे याच उड्डाणपुलावरुन वाहतूक सुरू होती.याच उड्डाणपुलावरुन तिरोडा, बालाघाट मार्गे येणारी लहान मोठी सर्वच वाहने येतात. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल जीर्ण - रेल्वे ट्रॅकच्या वरून जाणाऱ्या उड्डाणपुलाला ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. हा भाग रेल्वे विभागाच्या क्षेत्रात असल्याने रेल्वेने या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चर ऑडिट केले. त्यात ट्रॅक वरून गेलेला उड्डाणपूल वाहतूक करण्यास योग्य नसून तो केव्हाही कोसळू शकतो. ही बाब ऑडिट नंतर पुढे आली. त्यामुळे रेल्वे विभागाने २१ जुलै २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र देऊन जुन्या उड्डाणपुलावरुन सुरू असलेली वाहतूक त्वरित बंद करावी असे पत्र जिल्हा प्रशासनाला दिले होते.पुलाला पडले भगदाड- गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाच्या बांधकामाला आता ७० वर्षे पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा पूल जीर्ण झाला आहे.या पुलाच्या रेल्वे ट्रॅक परिसरातील भागाला मोठे मोठे भगदाड पडले आहे. पुलाच्या खालची बाजू सुद्धा जीर्ण झाल्याने केव्हाही मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी