शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
4
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
5
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
6
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
7
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
8
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
9
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
10
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
11
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
12
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
13
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
14
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
15
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
16
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
17
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
18
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
19
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
20
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...

पारा गेला ४२ अंशांवर, वाहनाचे टायर तपासून बघितले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

महामार्ग वगळता बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत, तर बऱ्याच रस्त्यावरील गिट्टी उखडलेली आहे. याचा वाहनांच्या टायरला अधिक धोका असतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी दुपारी वाहन न चालविलेलेच बरे. टायरच्या ट्यूबची हवा वरचेवर तपासत राहावे. अधिक हवेमुळेही टायर फुटण्याचा धोका असतो. जिल्ह्यात टायर फुटून बऱ्याच वाहनांना अपघात झाले असून, अनेकांचा जीवही गेला आहे

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  सर्वच जिल्ह्यात तापमान वाढत आहे. विदर्भात तर अधिकच तापमान वाढत असल्याने धावत्या वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी वाहन चालविताना चालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. वाहन चालविण्यापूर्वी टायरची तपासणी करून खात्री करून घ्यावी. वाढत्या तापमानामुळे डांबरी तथा सिमेंटचे रस्ते अधिक प्रमाणात तापतात. उन्हात वाहन एकसारखे चालवीत असल्यास टायर आणि रस्त्याच्या घर्षणाने टायर फुटण्याची शक्यता असते. महामार्ग वगळता बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत, तर बऱ्याच रस्त्यावरील गिट्टी उखडलेली आहे. याचा वाहनांच्या टायरला अधिक धोका असतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी दुपारी वाहन न चालविलेलेच बरे. टायरच्या ट्यूबची हवा वरचेवर तपासत राहावे. अधिक हवेमुळेही टायर फुटण्याचा धोका असतो. जिल्ह्यात टायर फुटून बऱ्याच वाहनांना अपघात झाले असून, अनेकांचा जीवही गेला आहे. त्यामुळे वाहने चालविताना टायर बरोबर आहे काय, हे तपासण्याची गरज आहे.

तापमान ४१ अंशांवर

यावर्षी मे महिन्याच्या उष्णतामानाचे चटके मार्चच्या मध्यापासूनच सहन करावे लागत आहेत. हल्ली तर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत उष्णतामान चांगलेच वाढले आहे.

टायर फुटून अपघात वाढले

- दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत आहे. यामुळे सिमेंट रस्ते अधिक तापतात. रस्ता आणि टायरच्या घर्षणामुळे अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.- नुकताच आठवड्यापूर्वी देवरी तालुक्यातील वडेगावजवळ दुचाकीचा टायर फुटून अपघात झाला. यातील दोनजण बचावले 

उन्हाळ्यात टायरची काळजी कशी घ्याल?

- उन्हाळ्यात वाहन चालविण्यापूर्वी टायरची हवा तपासून घेतली पाहिजे.- उन्हात गाडी चालविताना एकसारखी न चालविता काही अंतरावर विश्रांती द्यावी. वाहन दुपारी सावलीच्या ठिकाणी पार्क करावे. टायर जास्त गरम झाल्यास त्यावर पाणी टाकून थंड केले पाहिजे, टायर उच्च प्रतीचे असणे गरजेचे आहे.

दुपारी वाहन न चालविलेलेच बरे- शक्यतोवर वाहनाचा प्रवास सकाळी व सायंकाळीच करावा. दुपारी बारा ते चार वाहन चालविणे टाळलेलेच बरे, सकाळ, सायंकाळच्या तुलनेत दुपारचे तापमान अधिक उष्ण असल्याने टायर फुटण्याची शक्यता असते.

उन्हाळ्यात वाहनांची विशेष काळजी घ्यावी. वेळीच वाहन सर्व्हिसिंग करून घेतले पाहिजे, उच्च प्रतीच्या टायरचा वापर केल्यास फारच उत्तम, दुपारच्या उन्हात वाहन चालविणे टाळलेलेच बरे. हवा आवश्यकतेनुसार भरावी. -दिनेश जाजू, गॅरेज चालक,

 

टॅग्स :Temperatureतापमान