शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

पारा गेला ४२ अंशांवर, वाहनाचे टायर तपासून बघितले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

महामार्ग वगळता बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत, तर बऱ्याच रस्त्यावरील गिट्टी उखडलेली आहे. याचा वाहनांच्या टायरला अधिक धोका असतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी दुपारी वाहन न चालविलेलेच बरे. टायरच्या ट्यूबची हवा वरचेवर तपासत राहावे. अधिक हवेमुळेही टायर फुटण्याचा धोका असतो. जिल्ह्यात टायर फुटून बऱ्याच वाहनांना अपघात झाले असून, अनेकांचा जीवही गेला आहे

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  सर्वच जिल्ह्यात तापमान वाढत आहे. विदर्भात तर अधिकच तापमान वाढत असल्याने धावत्या वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी वाहन चालविताना चालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. वाहन चालविण्यापूर्वी टायरची तपासणी करून खात्री करून घ्यावी. वाढत्या तापमानामुळे डांबरी तथा सिमेंटचे रस्ते अधिक प्रमाणात तापतात. उन्हात वाहन एकसारखे चालवीत असल्यास टायर आणि रस्त्याच्या घर्षणाने टायर फुटण्याची शक्यता असते. महामार्ग वगळता बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत, तर बऱ्याच रस्त्यावरील गिट्टी उखडलेली आहे. याचा वाहनांच्या टायरला अधिक धोका असतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी दुपारी वाहन न चालविलेलेच बरे. टायरच्या ट्यूबची हवा वरचेवर तपासत राहावे. अधिक हवेमुळेही टायर फुटण्याचा धोका असतो. जिल्ह्यात टायर फुटून बऱ्याच वाहनांना अपघात झाले असून, अनेकांचा जीवही गेला आहे. त्यामुळे वाहने चालविताना टायर बरोबर आहे काय, हे तपासण्याची गरज आहे.

तापमान ४१ अंशांवर

यावर्षी मे महिन्याच्या उष्णतामानाचे चटके मार्चच्या मध्यापासूनच सहन करावे लागत आहेत. हल्ली तर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत उष्णतामान चांगलेच वाढले आहे.

टायर फुटून अपघात वाढले

- दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत आहे. यामुळे सिमेंट रस्ते अधिक तापतात. रस्ता आणि टायरच्या घर्षणामुळे अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.- नुकताच आठवड्यापूर्वी देवरी तालुक्यातील वडेगावजवळ दुचाकीचा टायर फुटून अपघात झाला. यातील दोनजण बचावले 

उन्हाळ्यात टायरची काळजी कशी घ्याल?

- उन्हाळ्यात वाहन चालविण्यापूर्वी टायरची हवा तपासून घेतली पाहिजे.- उन्हात गाडी चालविताना एकसारखी न चालविता काही अंतरावर विश्रांती द्यावी. वाहन दुपारी सावलीच्या ठिकाणी पार्क करावे. टायर जास्त गरम झाल्यास त्यावर पाणी टाकून थंड केले पाहिजे, टायर उच्च प्रतीचे असणे गरजेचे आहे.

दुपारी वाहन न चालविलेलेच बरे- शक्यतोवर वाहनाचा प्रवास सकाळी व सायंकाळीच करावा. दुपारी बारा ते चार वाहन चालविणे टाळलेलेच बरे, सकाळ, सायंकाळच्या तुलनेत दुपारचे तापमान अधिक उष्ण असल्याने टायर फुटण्याची शक्यता असते.

उन्हाळ्यात वाहनांची विशेष काळजी घ्यावी. वेळीच वाहन सर्व्हिसिंग करून घेतले पाहिजे, उच्च प्रतीच्या टायरचा वापर केल्यास फारच उत्तम, दुपारच्या उन्हात वाहन चालविणे टाळलेलेच बरे. हवा आवश्यकतेनुसार भरावी. -दिनेश जाजू, गॅरेज चालक,

 

टॅग्स :Temperatureतापमान