शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

पारा गेला ४२ अंशांवर, वाहनाचे टायर तपासून बघितले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 05:00 IST

महामार्ग वगळता बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत, तर बऱ्याच रस्त्यावरील गिट्टी उखडलेली आहे. याचा वाहनांच्या टायरला अधिक धोका असतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी दुपारी वाहन न चालविलेलेच बरे. टायरच्या ट्यूबची हवा वरचेवर तपासत राहावे. अधिक हवेमुळेही टायर फुटण्याचा धोका असतो. जिल्ह्यात टायर फुटून बऱ्याच वाहनांना अपघात झाले असून, अनेकांचा जीवही गेला आहे

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  सर्वच जिल्ह्यात तापमान वाढत आहे. विदर्भात तर अधिकच तापमान वाढत असल्याने धावत्या वाहनांचे टायर फुटून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी वाहन चालविताना चालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. वाहन चालविण्यापूर्वी टायरची तपासणी करून खात्री करून घ्यावी. वाढत्या तापमानामुळे डांबरी तथा सिमेंटचे रस्ते अधिक प्रमाणात तापतात. उन्हात वाहन एकसारखे चालवीत असल्यास टायर आणि रस्त्याच्या घर्षणाने टायर फुटण्याची शक्यता असते. महामार्ग वगळता बहुतांश रस्ते खड्डेमय आहेत, तर बऱ्याच रस्त्यावरील गिट्टी उखडलेली आहे. याचा वाहनांच्या टायरला अधिक धोका असतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी दुपारी वाहन न चालविलेलेच बरे. टायरच्या ट्यूबची हवा वरचेवर तपासत राहावे. अधिक हवेमुळेही टायर फुटण्याचा धोका असतो. जिल्ह्यात टायर फुटून बऱ्याच वाहनांना अपघात झाले असून, अनेकांचा जीवही गेला आहे. त्यामुळे वाहने चालविताना टायर बरोबर आहे काय, हे तपासण्याची गरज आहे.

तापमान ४१ अंशांवर

यावर्षी मे महिन्याच्या उष्णतामानाचे चटके मार्चच्या मध्यापासूनच सहन करावे लागत आहेत. हल्ली तर जिल्ह्यातील आठही तालुक्यांत उष्णतामान चांगलेच वाढले आहे.

टायर फुटून अपघात वाढले

- दिवसेंदिवस तापमानाचा पारा चढत आहे. यामुळे सिमेंट रस्ते अधिक तापतात. रस्ता आणि टायरच्या घर्षणामुळे अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे.- नुकताच आठवड्यापूर्वी देवरी तालुक्यातील वडेगावजवळ दुचाकीचा टायर फुटून अपघात झाला. यातील दोनजण बचावले 

उन्हाळ्यात टायरची काळजी कशी घ्याल?

- उन्हाळ्यात वाहन चालविण्यापूर्वी टायरची हवा तपासून घेतली पाहिजे.- उन्हात गाडी चालविताना एकसारखी न चालविता काही अंतरावर विश्रांती द्यावी. वाहन दुपारी सावलीच्या ठिकाणी पार्क करावे. टायर जास्त गरम झाल्यास त्यावर पाणी टाकून थंड केले पाहिजे, टायर उच्च प्रतीचे असणे गरजेचे आहे.

दुपारी वाहन न चालविलेलेच बरे- शक्यतोवर वाहनाचा प्रवास सकाळी व सायंकाळीच करावा. दुपारी बारा ते चार वाहन चालविणे टाळलेलेच बरे, सकाळ, सायंकाळच्या तुलनेत दुपारचे तापमान अधिक उष्ण असल्याने टायर फुटण्याची शक्यता असते.

उन्हाळ्यात वाहनांची विशेष काळजी घ्यावी. वेळीच वाहन सर्व्हिसिंग करून घेतले पाहिजे, उच्च प्रतीच्या टायरचा वापर केल्यास फारच उत्तम, दुपारच्या उन्हात वाहन चालविणे टाळलेलेच बरे. हवा आवश्यकतेनुसार भरावी. -दिनेश जाजू, गॅरेज चालक,

 

टॅग्स :Temperatureतापमान