शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

जि.प.अध्यक्षपद निवडणुकीचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2022 05:00 IST

सर्वाेच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के आरक्षण रद्द केले. या विरोधात राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करीत राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली. तसेच मुदत पूर्ण झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश दिले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता दीड महिन्याचा कालावधी लोटला. मात्र, अद्यापही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण जाहीर न झाल्याने सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला नाही. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांना त्यांच्या अधिकाराचा सुध्दा वापर करता येत नसल्याने त्यांचा संताप वाढत आहे. तर निवडणुकीचा निर्णय राज्य सरकारच्या कोर्टात गेला आहे. सर्वाेच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के आरक्षण रद्द केले. या विरोधात राज्य सरकारने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करीत राज्य सरकारची याचिका फेटाळून लावली. तसेच मुदत पूर्ण झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे निर्देश दिले आहेत. गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडली आहे. तर अध्यक्ष आणि सभापतिपदाचे आरक्षणसुध्दा यापूर्वी जाहीर झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जुन्याच आरक्षणानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतिपदाची निवडणूक होणे अपेक्षित आहे. मात्र, यासंदर्भात ग्रामविकास विभागाने मागील दीड महिन्यापासून निर्णय न कळविल्याने अध्यक्ष आणि सभापतिपदाची निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य अधिकाराविना आहेत. 

सत्ता स्थापनेचा दावा नाही - जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा आरक्षणाचा निर्णय झाला नसल्याने अद्यापही कोणत्याही पक्षाने जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा दावा केलेला नाही. आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतरच यावर निर्णय घेऊ असे सर्वच पक्षांचे नेते सांगत आहेत. 

जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता दीड महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. पण ग्रामविकास विभागाने अद्यापही अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा निर्णय न कळविल्याने या निवडणुका लांबल्या आहेत. यामुळे निवडून आलेल्या सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत असून ही बाब योग्य नाही.- केशव मानकर, भाजप जिल्हाध्यक्ष

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पंधरा दिवसात अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुका होणे अपेक्षित होते. पण ओबीसी आरक्षणाच्या याचिकेमुळे हा निर्णय लांबणीवर पडला होता. मात्र आता यावर ग्रामविकास विभागाने त्वरित निर्णय घ्यावा.- गंगाधर परशुरामकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

जिल्हा परिषदेत मागील दोन वर्षांपासून प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे अनेक विकासकामे रखडली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लवकरात लवकर ग्रामविकास विकास विभागाने जाहीर करावा.- दिलीप बन्सोड, जिल्हाध्यक्ष काँग्रेस

नियम काय म्हणतो - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात नोंद करण्यासाठी जाहीर करतात. ज्या तारखेला ही नावे जाहीर केली जातात, त्यानंतर महिनाभराचा कालावधी या अध्यक्ष आणि सभापतींची निवडणूक घेणे गरजेेचे आहे; पण याला दीड महिन्याचा कालावधी लोटूनही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतिपदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला नाही.सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणे चुकीचे - कोरोनामुळे आधीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका दोन वर्षे लांबणीवर गेल्या होत्या. त्यानंतर निवडणुका झाल्या, मात्र आता जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सभापतीपदाच्या आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही निवडणूक गेल्या दीड महिन्यापासून लांबणीवर पडली आहे. सदस्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवणे चुकीचे आहे.