शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

बिरसी विमानतळाकडे सरकारने फिरविली पाठ

By admin | Updated: October 16, 2015 02:39 IST

राज्य सरकारने विदर्भातील काही शहरांमधील विमानतळांचा विकास करण्याची आणि तेथे नागरी विमान वाहतुकीच्या दृष्टीने तयारी करण्याची घोषणा केली.

सर्व सुविधा उपलब्ध : भेदभावपूर्ण निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये असंतोषगोंदिया : राज्य सरकारने विदर्भातील काही शहरांमधील विमानतळांचा विकास करण्याची आणि तेथे नागरी विमान वाहतुकीच्या दृष्टीने तयारी करण्याची घोषणा केली. मात्र सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असणाऱ्या गोंदिया येथील बिरसी विमानतळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे गोंदियावासीयांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयात गोंदियावासीयांच्या सुविधेचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. सरकारचे हे पाऊल भेदभावपूर्ण असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार ३५० कोटी रुपये खर्च करून यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि अकोला येथील विमानतळांचा विकास करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तेथून नागरी विमानसेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. त्यात चंद्रपूर-अमरावती-पुणे-मुंबई, दुसरी सेवा चंद्रपूर-अकोला-अमरावती-मुंबई आणि तिसरी विमानसेवा चंद्रपूर-यवतमाळ-अमरावती-पुणे-मुंबई या तीन मार्गांवर करण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र त्यात गोंदियाला वगळण्यात आले. वास्तविक राज्याच्या टोकावरील गोंदिया जिल्ह्याला राज्याच्या राजधानीसह इतर ठिकाणी जाण्यासाठी विमानसेवा गरजेची झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात व्यापारी वर्ग आहे. सोमवारी आणि बुधवारी मुंबईतील कॅनिबनेट मीटिंगनिमित्त अनेक लोक मुंबईच्या दिशेने धाव घेतात. त्यामुळे या दोन दिवसाकरिता गोंदियातून मुंबईकरिता विमानसेवा देण्याची मागणी होत आहे. तसेच लगतच्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मधूनही हवाई यात्री गोंदियात येऊ-जाऊ शकतात.बिरसी विमानतळ हे मध्यप्रदेशातील कान्हा किसली या वनपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सर्वात जवळचे विमानतळ ठरणार आहे. प्रिंस चार्ल्स, स्व.धीरूभाई अंबानी, मुकेश अंबानी यांच्यासह अनेक उद्योगपतींचे विमान येथील विमानतळावर आतापर्यंत उतरले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)