शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

संसर्ग आटोक्यात आल्याचे चाचण्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:33 IST

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला असून, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ...

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला असून, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने चाचण्या करण्याचे प्रमाणसुद्धा बरेच कमी झाले आहे. जिल्ह्यात सध्या दररोज दीडशे ते दोनशे चाचण्या केल्या जात आहेत. त्यात बाधित रुग्णांचे प्रमाण नगण्य आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.२०) १७४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १४७ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे पॉझटिव्हिटी रेट शून्य होता. जिल्ह्यातील पाच तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणून कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट असलेले गोंदिया आणि तिरोडा हे दोन्ही तालुके आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याने या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात लसीकरणसुद्धा महत्त्वपूर्ण ठरत असून, जिल्ह्यात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४३२९८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २२४५६० नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २१८७३८ नागरिकांनी रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४११९७ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. यापैकी ४०४९२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने कोरोनाचा पॉझटिव्हिटी रेट ९९.२७ टक्के आहे.

..............