शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

संसर्ग आटोक्यात आल्याचे चाचण्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:33 IST

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला असून, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने ...

गोंदिया : कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आटोक्यात आला असून, जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने चाचण्या करण्याचे प्रमाणसुद्धा बरेच कमी झाले आहे. जिल्ह्यात सध्या दररोज दीडशे ते दोनशे चाचण्या केल्या जात आहेत. त्यात बाधित रुग्णांचे प्रमाण नगण्य आहे.

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.२०) १७४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १४७ नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २७ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोना पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे पॉझटिव्हिटी रेट शून्य होता. जिल्ह्यातील पाच तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. विशेष म्हणून कोरोनाच्या दृष्टीने हॉटस्पॉट असलेले गोंदिया आणि तिरोडा हे दोन्ही तालुके आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याने या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यात लसीकरणसुद्धा महत्त्वपूर्ण ठरत असून, जिल्ह्यात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ४४३२९८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी २२४५६० नमुन्यांची आरटीपीसीआर, तर २१८७३८ नागरिकांनी रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात ४११९७ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. यापैकी ४०४९२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याने कोरोनाचा पॉझटिव्हिटी रेट ९९.२७ टक्के आहे.

..............