शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

तेंदूपाने संकलनकर्त्यांना वन्यप्राण्यांपासून धोका

By admin | Updated: May 15, 2014 01:28 IST

रबी हंगाम संपला की शेतातील कामे संपुष्टात येतात. अल्प भूधारक व शेतमजुरांच्या हातांना काम मिळत नाही. शासनाची रोजगार हमी योजनासुध्दा कागदोपत्री असल्यामुळे दररोजचा प्रपंच चालविण्यासाठी ..

गोंदिया : रबी हंगाम संपला की शेतातील कामे संपुष्टात येतात. अल्प भूधारक व शेतमजुरांच्या हातांना काम मिळत नाही. शासनाची रोजगार हमी योजनासुध्दा कागदोपत्री असल्यामुळे दररोजचा प्रपंच चालविण्यासाठी उन्हाळ्यात तेंदूपत्ता गोळा करावा लागतो. जंगलातून तेंदूपाने संकलन करणार्‍या मजुरांना वन्यप्राण्यांपासून मोठा धोका आहे.यामुळे विमा सरंक्षण देण्याची मागणी होत आहे.मजुरांना विमा संरक्षण नसल्यामुळे काही घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याने मजुरांना विमा संरक्षण देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील नागरिक पर्यायी रोजगार म्हणून तेंदूपत्ता संकलनाकडे पाहिले जाते. खेड्यापाड्यातील घराघरात लहानांपासून वृध्दांपर्यंत संपूर्ण कुटूंब या व्यवसायात गुंतलेले असतात. अगदी पहाटेला जंगलात जाऊन वन्यप्राण्यांशी सामना करीत तेंदूपत्ता गोळा करतात. परंतु त्यांना मिळत असलेल्या अल्प मोबदल्यात आपला जीव धोक्यात घालत असल्यामुळे त्यांच्या हाती धुपाटणे मिळत आहे. अर्जुनी/मोरगाव व सालेकसा तालुक्यातील घनदाट जंगलातून हा व्यवसाय गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.या व्यवसायातून कंत्राटदार व मालक मालदार झाले आहेत. तर मजूर मात्र अल्प उत्पन्नातून केविलवाणे जीवन जगण्याकरिता धडपड करीत आहेत. तेंदूपत्ता संकलन करणार्‍या मजुरांचे शोषण मात्र संपलेले नाही. या तालुक्यात अनेक वर्षापासून तेंदूपत्ता संकलनाचा व्यवसाय अविरत सुरू आहे.यासाठी प्रत्येक वन कार्यालयात तेंदूपत्ता संकलन विभाग असतो.तेंदूपत्ता संकलनाला मे महिन्यात सुरूवात होत असते. १५ते २0 दिवसाचा हा हंगाम असतो. हा हंगाम सुरू होण्यापूर्वी तेंदूपत्ता युनिटच्या लिलावाची जाहिरात वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात येते.त्यानंतर लिलाव होतो. त्यानंतर जंगलामध्ये बालमजुरांना घेऊन तेंदूपत्ता झाडाचे खुंटकटाईचे काम केल्या जाते. मे महिन्यांमध्ये प्रत्यक्ष तेंदूपत्ता संकलनाला सुरूवात केले जाते. शेतीच्या हंगामाच्या काळात शेतात राबराब राबायचे व उन्हाळ्यात मात्र दिवसभर उन्हात तेंदूपत्ता तोडायच्या कामात स्वत:ला गुंतवून चार पैसे मिळवायचे, असा नित्यक्रमच ठरला आहे. उन्हाळ्यात हाताला दुसरे काम नसल्यामुळे चार पैसे हातात मिळावे म्हणून जीवाचे रान केले जाते. अनेक वर्षापासून अगदी पिढीजात हे मजुरीचे काम करणार्‍यांची आर्थिक स्थिती अगदी बेताची आहे. (प्रतिनिधी)