शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीसाठी विद्यार्थ्यांचा ग्रामीण भागाकडे कल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:19 IST

गोंदिया : कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा महाविद्यालय बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच दहावीचे निकाल जाहीर ...

गोंदिया : कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून शाळा महाविद्यालय बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच दहावीचे निकाल जाहीर झाले असून आता विद्यार्थी व त्यांच्या पालकांची लगबग वाढली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून सर्वच व्यवहारदेखील सुरळीत झाले आहेत. त्यामुळे अकरावीचे प्रवेशसुद्धा ऑनलाइन करण्यात यावे, अशीच विद्यार्थी आणि पालकांची इच्छा आहे. तर विद्यालयेसुद्धा ऑफलाइन प्रवेशासाठी आग्रही आहेत. इंटरनेटची समस्या तसेच अर्ज करताना येणाऱ्या त्रुटी यामुळे ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन प्रवेशच सर्वांना सोयीचे वाटते. तर शहर भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यालयांमध्ये ११ वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कल आहे कारण बरेच विद्यार्थी दहावी पास झाल्यानंतर दुसरे अभ्यासक्रमसुद्धा करीत असतात. त्यामुळे ग्रामीण भागात विद्यालयात नियमित गेले नाही तरी चालते, असा समज विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळेच ते ग्रामीण भागातील विद्यालयात प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.

...............

ऑफलाइन व्हावेत प्रवेश...

आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. तर सर्वच व्यवहारसुद्धा सुरळीत झाले आहेत. तर शासनाने सुद्धा ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ११ वीची प्रवेश प्रक्रियासुद्धा शासनाने ऑफलाइन करावी. ते विद्यार्थी आणि शाळांच्या दृष्टीने सुद्धी सोयीचे होईल.

- अनिल मंत्री, संस्था चालक

....................

इंटरनेटच्या समस्येमुळे आधीच ऑनलाइन शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रियासुद्धा आता शासनाने ऑफलाइनच राबवावी. यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची होणारी गैरसोय टाळण्यास मदत होईल. तर प्रवेश अर्जातील त्रुटी वेळीच दूर करण्यास मदत होईल.

- मुकेश अग्रवाल, संस्था चालक

......................

म्हणून घेतला गावात प्रवेश...

मागील दीड वर्षापासून शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे शहरातील महाविद्यालयात प्रवेश घेऊनसुद्धा गावात राहावे लागले. त्यातच वर्षभराचे खोलीचे भाडेसुद्धा द्यावे लागले. तर यंदासुद्धा महाविद्यालय सुरू होणार की नाही, याबाबत शंका आहे. त्यामुळे गावातीलच विद्यालयात प्रवेश घेतला.

- विलास ठाकरे, विद्यार्थी

..........

अकरावी-बारावीपर्यंतचे शिक्षण गावातीलच विद्यालयात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यावर्षीसुद्धा अभ्यासक्रम ऑनलाइन राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शहरातील विद्यालयात प्रवेश घेतल्यास पुन्हा अडचण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- नीलेश वाकुडकार, विद्यार्थी.

.........

अकरावीसाठी गावातच प्रवेश का?

कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात असला तरी पुन्हा तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शहरातील विद्यालयात प्रवेश घेतल्यास पुन्हा खोली भाड्याने घेऊन तिथे राहावे लागेल. तर पुन्हा विद्यालय बंद झाल्यास पुन्हा गावाकडे परत जावे लागेल. म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी अकरावी आणि बारावीचे शिक्षण गावातच पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.

.............

शहरातील अकरावीचे प्रवेश देणारी विद्यालये : १०

एकूण जागा : ५६७५

गेल्या वर्षी किती अर्ज आले : ८९६७

किती जणांनी घेतला प्रवेश : ४९६७

किती जागा राहिल्या रिक्त : ७५४