शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले...
2
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
3
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
4
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
5
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
6
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
7
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
8
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
9
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
10
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
11
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
12
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
13
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
14
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
15
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
16
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
17
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
18
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
19
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
20
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन

तेंदूफळी व जंगलातील वाड्या ठरताहेत वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ

By admin | Updated: May 27, 2014 23:48 IST

तेंदूपत्ता संकलन करून जंगल परिसरातच तेंदूफळी उभारण्यात आल्याने वनक्षेत्रात मनुष्याची रहदारी वाढली आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाणवठय़ांवर पोहोचण्यासाठी अडचणीचे ठरून त्यांचा

गोंदिया : तेंदूपत्ता संकलन करून जंगल परिसरातच तेंदूफळी उभारण्यात आल्याने वनक्षेत्रात मनुष्याची रहदारी वाढली आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाणवठय़ांवर पोहोचण्यासाठी अडचणीचे ठरून त्यांचा पाण्याविना मृत्यूही ओढवत आहे. पाणवठय़ानजीक तेंदूफळी व तलावावर वाड्या लावण्यात आल्याने मनुष्याची रहदारी वाढली. या रहदारीमुळे वन्यप्राण्यांना पाणी मिळत नसल्याने पाण्याविना त्याचा मृत्यू होत आहे. परंतू या घटना उघडकीस येत नाहीत.

सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तेंदूपत्ता तोडणार्‍या कंत्राटदारांनी काही प्रमाणात जंगलाला आग लावल्याने लाखोंची वनसंपदा नष्ट झाली. या आगीत होरपळून अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. जंगलातील तेंदूपत्ता संकलन करून तेंदूफळी राखीव जंगल वगळता बहुतांश ठिकाणी सामान्य जंगलातच लावली जात आहे. जंगलात पाणवड्याच्या शेजारीच तेंदूपत्ता फळी उभारली जात असल्याने या पाणवड्यानजीक मनुष्याची रहदारी वाढत आहे. परंतु या रहदारीमुळे तहानलेले वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी त्या पाणवठय़ावर येत नाही. पाणवठय़ाचा परिसर निर्जन झाल्यावर वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी जात असतात. परंतु तेदूपत्ता फळीवर लोकांची रहदारी असल्याने वन्यप्राण्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे जंगलात वन्यप्राणी पाण्याअभावी मृत्युमुखी पडत आहेत.

वन विभागातर्फे काही शेतकर्‍यांना जंगलातील तलावाच्या काठावर वाड्या लावण्याची परवानगी दिली. जिल्ह्यातील बोदलकसा, संग्रामपूर, चोरखमारा, उमरझरी (जांभळी) यासारख्या आणखी बहुतांश तलावावर वाड्या लावण्यात आल्या आहेत.

या तलावांवर वन्यप्राणी नियमित पाणी पिण्यासाठी येत असतात. परंतु तलावाच्या काठावर वाड्या लावणारे शेतकरी लावलेली पिके वन्यप्राण्यांनी खाऊ नयेत यासाठी त्या प्राण्यांना वाड्यावरून हाकलतात. जंगलातील तलावाच्या काठावर वाड्या लावत असल्याने, त्या तलावातील पाणी पिण्यासाठी वन्यप्राण्यांसाठी जागा उरत नाही.

गोंदिया निसर्ग मंडळाने यापूर्वीसुद्धा ही बाब वनविभागाकडे मांडली आहे. परंतू यावर्षीही तीच परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून येत आहे. जंगलातील तलावाच्या काठावर वाडी लावण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी गोंदिया निसर्ग मंडळाने केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)