शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

तेंदूफळी व जंगलातील वाड्या ठरताहेत वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ

By admin | Updated: May 27, 2014 23:48 IST

तेंदूपत्ता संकलन करून जंगल परिसरातच तेंदूफळी उभारण्यात आल्याने वनक्षेत्रात मनुष्याची रहदारी वाढली आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाणवठय़ांवर पोहोचण्यासाठी अडचणीचे ठरून त्यांचा

गोंदिया : तेंदूपत्ता संकलन करून जंगल परिसरातच तेंदूफळी उभारण्यात आल्याने वनक्षेत्रात मनुष्याची रहदारी वाढली आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाणवठय़ांवर पोहोचण्यासाठी अडचणीचे ठरून त्यांचा पाण्याविना मृत्यूही ओढवत आहे. पाणवठय़ानजीक तेंदूफळी व तलावावर वाड्या लावण्यात आल्याने मनुष्याची रहदारी वाढली. या रहदारीमुळे वन्यप्राण्यांना पाणी मिळत नसल्याने पाण्याविना त्याचा मृत्यू होत आहे. परंतू या घटना उघडकीस येत नाहीत.

सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तेंदूपत्ता तोडणार्‍या कंत्राटदारांनी काही प्रमाणात जंगलाला आग लावल्याने लाखोंची वनसंपदा नष्ट झाली. या आगीत होरपळून अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. जंगलातील तेंदूपत्ता संकलन करून तेंदूफळी राखीव जंगल वगळता बहुतांश ठिकाणी सामान्य जंगलातच लावली जात आहे. जंगलात पाणवड्याच्या शेजारीच तेंदूपत्ता फळी उभारली जात असल्याने या पाणवड्यानजीक मनुष्याची रहदारी वाढत आहे. परंतु या रहदारीमुळे तहानलेले वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी त्या पाणवठय़ावर येत नाही. पाणवठय़ाचा परिसर निर्जन झाल्यावर वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी जात असतात. परंतु तेदूपत्ता फळीवर लोकांची रहदारी असल्याने वन्यप्राण्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे जंगलात वन्यप्राणी पाण्याअभावी मृत्युमुखी पडत आहेत.

वन विभागातर्फे काही शेतकर्‍यांना जंगलातील तलावाच्या काठावर वाड्या लावण्याची परवानगी दिली. जिल्ह्यातील बोदलकसा, संग्रामपूर, चोरखमारा, उमरझरी (जांभळी) यासारख्या आणखी बहुतांश तलावावर वाड्या लावण्यात आल्या आहेत.

या तलावांवर वन्यप्राणी नियमित पाणी पिण्यासाठी येत असतात. परंतु तलावाच्या काठावर वाड्या लावणारे शेतकरी लावलेली पिके वन्यप्राण्यांनी खाऊ नयेत यासाठी त्या प्राण्यांना वाड्यावरून हाकलतात. जंगलातील तलावाच्या काठावर वाड्या लावत असल्याने, त्या तलावातील पाणी पिण्यासाठी वन्यप्राण्यांसाठी जागा उरत नाही.

गोंदिया निसर्ग मंडळाने यापूर्वीसुद्धा ही बाब वनविभागाकडे मांडली आहे. परंतू यावर्षीही तीच परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून येत आहे. जंगलातील तलावाच्या काठावर वाडी लावण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी गोंदिया निसर्ग मंडळाने केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)