शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

तेंदूफळी व जंगलातील वाड्या ठरताहेत वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ

By admin | Updated: May 27, 2014 23:48 IST

तेंदूपत्ता संकलन करून जंगल परिसरातच तेंदूफळी उभारण्यात आल्याने वनक्षेत्रात मनुष्याची रहदारी वाढली आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाणवठय़ांवर पोहोचण्यासाठी अडचणीचे ठरून त्यांचा

गोंदिया : तेंदूपत्ता संकलन करून जंगल परिसरातच तेंदूफळी उभारण्यात आल्याने वनक्षेत्रात मनुष्याची रहदारी वाढली आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाणवठय़ांवर पोहोचण्यासाठी अडचणीचे ठरून त्यांचा पाण्याविना मृत्यूही ओढवत आहे. पाणवठय़ानजीक तेंदूफळी व तलावावर वाड्या लावण्यात आल्याने मनुष्याची रहदारी वाढली. या रहदारीमुळे वन्यप्राण्यांना पाणी मिळत नसल्याने पाण्याविना त्याचा मृत्यू होत आहे. परंतू या घटना उघडकीस येत नाहीत.

सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता हंगाम अंतिम टप्प्यात आहे. तेंदूपत्ता तोडणार्‍या कंत्राटदारांनी काही प्रमाणात जंगलाला आग लावल्याने लाखोंची वनसंपदा नष्ट झाली. या आगीत होरपळून अनेक वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. जंगलातील तेंदूपत्ता संकलन करून तेंदूफळी राखीव जंगल वगळता बहुतांश ठिकाणी सामान्य जंगलातच लावली जात आहे. जंगलात पाणवड्याच्या शेजारीच तेंदूपत्ता फळी उभारली जात असल्याने या पाणवड्यानजीक मनुष्याची रहदारी वाढत आहे. परंतु या रहदारीमुळे तहानलेले वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी त्या पाणवठय़ावर येत नाही. पाणवठय़ाचा परिसर निर्जन झाल्यावर वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी जात असतात. परंतु तेदूपत्ता फळीवर लोकांची रहदारी असल्याने वन्यप्राण्यांना पाणी मिळत नाही. त्यामुळे जंगलात वन्यप्राणी पाण्याअभावी मृत्युमुखी पडत आहेत.

वन विभागातर्फे काही शेतकर्‍यांना जंगलातील तलावाच्या काठावर वाड्या लावण्याची परवानगी दिली. जिल्ह्यातील बोदलकसा, संग्रामपूर, चोरखमारा, उमरझरी (जांभळी) यासारख्या आणखी बहुतांश तलावावर वाड्या लावण्यात आल्या आहेत.

या तलावांवर वन्यप्राणी नियमित पाणी पिण्यासाठी येत असतात. परंतु तलावाच्या काठावर वाड्या लावणारे शेतकरी लावलेली पिके वन्यप्राण्यांनी खाऊ नयेत यासाठी त्या प्राण्यांना वाड्यावरून हाकलतात. जंगलातील तलावाच्या काठावर वाड्या लावत असल्याने, त्या तलावातील पाणी पिण्यासाठी वन्यप्राण्यांसाठी जागा उरत नाही.

गोंदिया निसर्ग मंडळाने यापूर्वीसुद्धा ही बाब वनविभागाकडे मांडली आहे. परंतू यावर्षीही तीच परिस्थिती अनेक ठिकाणी दिसून येत आहे. जंगलातील तलावाच्या काठावर वाडी लावण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी गोंदिया निसर्ग मंडळाने केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)