शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

संचमान्यतेच्या नावावर ‘टाईमपास’

By admin | Updated: December 24, 2015 02:19 IST

दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत पटावर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरून शाळांवरील शिक्षकांची संचमान्यता निश्चित केली जाते.

शिक्षण विभागात घोळ : कोणाचाच पायपोस कोणात नाहीगोंदिया : दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत पटावर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरून शाळांवरील शिक्षकांची संचमान्यता निश्चित केली जाते. पण गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात २०१५ ची तर दूर, २०१३-१४ या वर्षाचीच संचमान्यता अद्याप निश्चित झाली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे पदोन्नतीच्या आणि आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो शिक्षकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दुसरीकडे संचमान्यता मिळायची असल्याचे सांगत शिक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चक्क जि.प. पदाधिकारी आणि सदस्यांचीही दिशाभूल केली जात आहे. सन २०१५-१६ हे शैक्षणिक वर्ष सुरू असले तरी सन २०१३-१४ ची संचमान्यता अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन सन २०१२-१३ च्या संचमान्यतेनुसारच काढण्यात येत आहे. यावरून शिक्षण विभागात किती घोळ सुरू आहे याची कल्पना येते.बोगस विद्यार्थी पटसंख्या दाखवून शासनाला लुबाडणाऱ्या काही खासगी शाळा तसेच २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांतील पटसंख्या दाखवा, त्यानंतरच संचमान्यता मिळेल असे ठरवून शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत संच मान्यता निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. परंतु गोंदिया जिल्ह्यात अद्याप सन २०१३-१४ या शैक्षणिक वर्षाचीच संचमान्यता झालेली नसून सर्वत्र गोंधळात गोंधळ सुरू आहे. माध्यमिक विभागाच्या शिक्षकांचे वेतन सन २०१२-१३ च्या संच मान्यतेनुसार काढण्यात येत आहे. शासनाने यावर्षी सरल पध्दतीने संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांची पटसंख्या मुख्याध्यापकांनी आॅनलाईन करावी असे निर्देश दिले. शासनाने ही माहिती मागितल्यावर एकदा मागविलेली माहिती पुन्हा-पुन्हा मागावी लागणार नाही असे शासनाला वाटत होते. परंतु संच मान्यतेची माहिती दरवर्षी बदलत असल्यामुळे शासनाने पुन्हा ती माहिती यू-डायस पध्दतीने मागविली आहे. गोंदिया जिल्ह्यात अनेक पदे रिक्त असताना संच मान्यता मिळायची आहे असे कारण सांगत पदभरती केली जात नाही. संचमान्यतेचे संपुर्ण काम आॅक्टोबरच्या अखरेपर्यंत करायचे होते. परंतु गोंदिया जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग दोन वर्ष मागे चालत आहे. (तालुका प्रतिनिधी)आॅनलाईन ‘की यू डायस’ संदर्भात संभ्रमसंच मान्यतेसाठी मुख्याध्यापकांना द्यावी लागणारी माहिती आॅनलाईन पध्दतीनेच द्यायची आहे, असे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी सांगितले. मात्र आता जुन्याच यू डायस पध्दतीने माहिती मागविली आहे, असे शिक्षणाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संच मान्यतेची माहिती आॅनलाईन द्यायची, की यू डायस पध्दतीने, या संदर्भात संभ्रमाची स्थिती आहे.मुख्याध्यापकांपुढे अनेक अडचणीसंबंधित मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यांची पटसंख्या आॅनलाईन पाठविण्याचे काम सुरू आहे. परंतु काही मुख्याध्यापकांना शासनाला आॅनलाईन माहिती पाठविता आली नाही. शाळेत संगणक आहे, पण विजेची सोय नाही. विद्युतची सोय केली तर इंटरनेटची सुविधा नाही, त्यात सादीलवार राशी नाही. त्यामुळे प्रत्येक कामासाठी आपल्या खिशातून पैसे काढून देण्यास मुख्याध्यापक इच्छुक नाहीत. परिणामी अनेक मुख्याध्यापकांनी ही माहिती पाठविलीच नसल्याचे सत्य पुढे येत आहे.आठ दिवसापूर्वी मिळाले आदेशशासनाने सरल पध्दतीने आॅनलाईन संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील संस्था संचालक न्यायालयात गेले होते. यात गोंदियातीलही काहींचा समावेश आहे. न्यायालयाचा निकाल येताच शासनने ८ डिसेंबर रोजी संच मान्यतेची माहिती देण्यात यावी असे आदेश काढल्याचे शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.