शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 05:00 IST

जुलै महिना उजाडला तरी पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावली नाही. काही भागात पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे टाकलेल्या पऱ्ह्यांना थोडी संजीवनी मिळत आहे; पण पावसाच्या अनियमिततने बळिराजाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, असे साकडे घालत असल्याचे चित्र आहे. 

ठळक मुद्देपावसाने गाठली सरासरी : मात्र, अनियमित पावसाने बळीराजाच्या काळजीत भर, पाच टक्केच रोवण्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान विभागाने यंदा १०० टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. तसेच मान्सूनदेखील महाराष्ट्रात वेळेत दाखल हाेईल असे संकेत दिले होते. मात्र, यंदा सुरुवातीपासून अंदाज चुकत आहे. जुलै महिना उजाडला तरी पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावली नाही. काही भागात पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. त्यामुळे टाकलेल्या पऱ्ह्यांना थोडी संजीवनी मिळत आहे; पण पावसाच्या अनियमिततने बळिराजाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय, असे साकडे घालत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा १ लाख ८१ हजार हेक्टरवर खरिपात धानाची लागवड केली जाणार आहे. यासाठी आतापर्यंत १६ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकले आहे. पऱ्हे आता रोवणीयोग्य होत असून, त्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात १ ते ३० जूपर्यंत १९२.८ मिमी पाऊस पडतो, तर यंदा या कालावधीत २०८.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या १०८ टक्के पाऊस झाला आहे. यंदा पाऊस सलग होत नसल्याने नदी, नाले, तलाव अजूनही कोरडे पडले असून, त्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

पाऊस न झाल्यास परिस्थिती गंभीर सुरुवातीपासून पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणे साहजिक आहे. मात्र, हवामान विभागाने ८ जुलैपासून जिल्ह्यात दमदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे या कालावधी चांगला पाऊस झाल्यास रोवणी करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे. मात्र, पावसाने दगा दिल्यास व पंधरा दिवसांत पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

दुबार पेरणीचे संकट नाही मागील आठ दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली असून, रोवणीची कामे खोळंबली आहेत. पाऊस अधृूनमधून जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावत आहे. त्यामुळे पऱ्ह्यांना संजीवनी मिळत आहे. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे ते पाणी करून पऱ्हे वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. तूर्तास तरी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट नाही. 

जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार हेक्टरवर धानाचे पऱ्हे टाकून झाले आहे. आपल्या भागात जुलैनंतरच दमदार पावसाला सुरुवात होते. त्यामुळे तूर्तास तरी जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट नाही. - गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. 

देव अशी परीक्षा दरवर्षी घेतो मागील दोन-तीन वर्षांपासून कधी ओल्या, तर कधी दुष्काळाला तोंड देत आहे. यंदादेखील हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, आताच पाऊस दगा देत असल्याने पुढे काय अशी चिंता सतावत आहे. - राहुल बिसेन, शेतकरीवातावरणातील बदलाचा शेतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अनियमित पावसामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे शेती आता बेभरवशाची झाली आहे. - मनोज दमाहे, शेतकरी.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती