शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST

गोंदिया : यंदा हवामान विभागाने वर्तविलेले अंदाज वांरवार खोटे ठरले. ऑगस्ट महिना अर्धा लोटला तरी अद्यापही पावसाने सरासरी गाठली ...

गोंदिया : यंदा हवामान विभागाने वर्तविलेले अंदाज वांरवार खोटे ठरले. ऑगस्ट महिना अर्धा लोटला तरी अद्यापही पावसाने सरासरी गाठली नाही. त्यामुळे सिंचन प्रकल्पांमध्ये ३७ टक्केच पाणीसाठा आहे. ऑगस्ट नंतर पाऊस कमी होतो. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ५४.४ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे केलेली धानाची रोवणी सुध्दा वाळण्याच्या मार्गावर आली असल्याने पावसाअभावी शेतकऱ्यांना पिके गमाविण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. त्यामुळेच सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ८७ टक्के रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १२२०.३ मिमी पाऊस पडतो. तर १ जून ते १६ ऑगस्ट या कालावधीत ८२१.३ मिमी पाऊस पडतो. त्यापैकी आतापर्यंत या कालावधीत ६३९.६ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी ७७.१९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद आमगाव तालुक्यात ३९ टक्केच पाऊस झाला आहे. सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाळण्याच्या मार्गावर रोवणीना आता संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील काळजीचे सावट थोडे दूर झाले असले तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

.............

कोट ‘

जिल्ह्यात आतापर्यंत ८७ टक्के राेवण्या आटोपल्या आहेत. सोमवारी झालेल्या पावसामुळे रोवणी केलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे तूर्तास तरी पिकांवरील संकट टळले आहे.

- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

..............

जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित पाऊस : ८२१.३ मिमी

आतापर्यंत झालेला पाऊस : ६३९.६ मिमी

..............

पाणीसाठा २० टक्के

लघू प्रकल्प : १९.६७

मध्यम प्रकल्प : १९.६०

मोठे प्रकल्प : २१.१२

.......................

तूर्तास संकट टळले

धान : १ लाख ६७ हजार हेक्टर

तूर : ७ हजार हेक्टर

ज्वारी : ५०० एकर

ऊस : ७०० हेक्टर

इतर पिके : २५०० हेक्टर

.............................

कोट

मागील पंधरा दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात दडी मारली होती. त्यामुळे रोवणी वाळण्याच्या मार्गावर आली होती. त्यामुळे यंदा पीक गमावावे लागते काय अशी चिंता सतावत होती. मात्र सोमवारी झालेल्या पावसामुळे रोवणींना संजीवनी मिळाली आहे.

- अविनाश काशीवार, शेतकरी.

......

यंदा हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. पण सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने हवामान विभागाचे अंदाज खोटा ठरला तर शेतकऱ्यांवर पिके गमविण्याची पाळी आली. पण सोमवारी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

-देविदास अंबुले, शेतकरी.