शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST

गोंदिया : यंदा हवामान विभागाने वर्तविलेले अंदाज वांरवार खोटे ठरले. ऑगस्ट महिना अर्धा लोटला तरी अद्यापही पावसाने सरासरी गाठली ...

गोंदिया : यंदा हवामान विभागाने वर्तविलेले अंदाज वांरवार खोटे ठरले. ऑगस्ट महिना अर्धा लोटला तरी अद्यापही पावसाने सरासरी गाठली नाही. त्यामुळे सिंचन प्रकल्पांमध्ये ३७ टक्केच पाणीसाठा आहे. ऑगस्ट नंतर पाऊस कमी होतो. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ ५४.४ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे केलेली धानाची रोवणी सुध्दा वाळण्याच्या मार्गावर आली असल्याने पावसाअभावी शेतकऱ्यांना पिके गमाविण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. त्यामुळेच सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? असे म्हणण्याची वेळ बळीराजावर आली आहे. गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाची लागवड केली जाते. जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली आहे. तर आतापर्यंत ८७ टक्के रोवणीची कामे पूर्ण झाली आहेत. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी १२२०.३ मिमी पाऊस पडतो. तर १ जून ते १६ ऑगस्ट या कालावधीत ८२१.३ मिमी पाऊस पडतो. त्यापैकी आतापर्यंत या कालावधीत ६३९.६ मिमी पावसाची नोंद झाली असून त्याची टक्केवारी ७७.१९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद आमगाव तालुक्यात ३९ टक्केच पाऊस झाला आहे. सोमवारी जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वाळण्याच्या मार्गावर रोवणीना आता संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील काळजीचे सावट थोडे दूर झाले असले तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

.............

कोट ‘

जिल्ह्यात आतापर्यंत ८७ टक्के राेवण्या आटोपल्या आहेत. सोमवारी झालेल्या पावसामुळे रोवणी केलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. हवामान विभागाने पुढील दोन तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे तूर्तास तरी पिकांवरील संकट टळले आहे.

- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

..............

जिल्ह्यात आतापर्यंत अपेक्षित पाऊस : ८२१.३ मिमी

आतापर्यंत झालेला पाऊस : ६३९.६ मिमी

..............

पाणीसाठा २० टक्के

लघू प्रकल्प : १९.६७

मध्यम प्रकल्प : १९.६०

मोठे प्रकल्प : २१.१२

.......................

तूर्तास संकट टळले

धान : १ लाख ६७ हजार हेक्टर

तूर : ७ हजार हेक्टर

ज्वारी : ५०० एकर

ऊस : ७०० हेक्टर

इतर पिके : २५०० हेक्टर

.............................

कोट

मागील पंधरा दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात दडी मारली होती. त्यामुळे रोवणी वाळण्याच्या मार्गावर आली होती. त्यामुळे यंदा पीक गमावावे लागते काय अशी चिंता सतावत होती. मात्र सोमवारी झालेल्या पावसामुळे रोवणींना संजीवनी मिळाली आहे.

- अविनाश काशीवार, शेतकरी.

......

यंदा हवामान विभागाने शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. पण सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्याने हवामान विभागाचे अंदाज खोटा ठरला तर शेतकऱ्यांवर पिके गमविण्याची पाळी आली. पण सोमवारी झालेल्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

-देविदास अंबुले, शेतकरी.