शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

तहसीलदार, नायब तहसीलदार मिळेना! कामे कशी होतील हे कळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:29 IST

विलास शिंदे देवरी : महसूल प्रशासनाची महत्त्वाची पदे रिक्त असल्याने देवरी तालुक्याचा कारभार सध्या प्रभारींच्या भरोशावर सुरू आहे. परिणामी ...

विलास शिंदे

देवरी : महसूल प्रशासनाची महत्त्वाची पदे रिक्त असल्याने देवरी तालुक्याचा कारभार सध्या प्रभारींच्या भरोशावर सुरू आहे. परिणामी महसूल विभागाशी संबंधित कामे रेंगाळली असल्याने नागरिकांना याचा फटका बसत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष झाल्याने तालुकावासीयांची समस्या कायम आहे.

तालुक्याच्या ठिकाणी मागील दीड महिन्यापासून तहसीलदारांचे पद रिक्त आहे. तहसीलदार विजय बोरुडे यांची भामरागडला बदली झाल्यापासून येथे नवीन तहसीलदारांची नियुक्ती झालीच नाही. दुसरीकडे दोन नायब तहसीलदारांची पदेसुद्धा रिक्त असल्याने महसूल विभागाची कामे कशी पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वात मोठी समस्या चिचगड येथील अप्पर तहसील कार्यालयाची आहे. येथे मागील एक वर्षापासून तहसीलदारच नसल्याने लोकांची कामे खोळंबली आहेत. ककोडी व चिचगड क्षेत्रातील लोकांना २० ते ४० किलोमीटर अंतर कापून देवरी येथे यावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टाेकावर असलेल्या देवरी तालुक्यात अधिकारी नोकरी करायलाच तयार नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचेही पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

................

देवरीच्या तहसीलदारांना मिळाला न्याय

सात वर्षे नक्षलग्रस्त तालुक्यात तहसीलदार म्हणून सेवा देणाऱ्या देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांची पुन्हा भामरागड (जि. गडचिरोली) येेथे बदली झाल्याने बोरुडे यांनी महसूल प्रशासनाकडे धाव घेत न्याय देण्याची मागणी केली. नियमानुसार सात वर्षे नक्षलग्रस्त भागात सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची ऐच्छिक ठिकाणी बदली व्हायला पाहिजे. परंतु असे न होता राजनितीक दबावाखाली त्यांची बदली भामरागड येथे केल्याची चर्चा होती. तब्बल ४२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विजय बोरुडे यांना १७ सप्टेंबर रोजी नाशिक महसूल विभागातील कोपरगाव (जि. अहमदनगर) येथे तहसीलदार म्हणून बदलीचा आदेश मिळाल्याची माहिती आहे.

........

अप्पर तहसील कार्यालयाचा दर्जाच का दिला !

चिचगड येथील अप्पर तहसील कार्यालयाची आहे. येथे मागील एक वर्षांपासून तहसीलदारच नसल्याने लोकांची कामे खोळंबली आहेत. ककोडी व चिचगड क्षेत्रातील लोकांना २० ते ४० किमी अंतर पार करुन देवरी येथे यावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चिचगडला अप्पर तहसील कार्यालयाचा दर्जा का दिला असा सवाल केला जात आहे.