शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

तहसीलदार, नायब तहसीलदार मिळेना! कामे कशी होतील हे कळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:29 IST

विलास शिंदे देवरी : महसूल प्रशासनाची महत्त्वाची पदे रिक्त असल्याने देवरी तालुक्याचा कारभार सध्या प्रभारींच्या भरोशावर सुरू आहे. परिणामी ...

विलास शिंदे

देवरी : महसूल प्रशासनाची महत्त्वाची पदे रिक्त असल्याने देवरी तालुक्याचा कारभार सध्या प्रभारींच्या भरोशावर सुरू आहे. परिणामी महसूल विभागाशी संबंधित कामे रेंगाळली असल्याने नागरिकांना याचा फटका बसत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष झाल्याने तालुकावासीयांची समस्या कायम आहे.

तालुक्याच्या ठिकाणी मागील दीड महिन्यापासून तहसीलदारांचे पद रिक्त आहे. तहसीलदार विजय बोरुडे यांची भामरागडला बदली झाल्यापासून येथे नवीन तहसीलदारांची नियुक्ती झालीच नाही. दुसरीकडे दोन नायब तहसीलदारांची पदेसुद्धा रिक्त असल्याने महसूल विभागाची कामे कशी पूर्ण होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वात मोठी समस्या चिचगड येथील अप्पर तहसील कार्यालयाची आहे. येथे मागील एक वर्षापासून तहसीलदारच नसल्याने लोकांची कामे खोळंबली आहेत. ककोडी व चिचगड क्षेत्रातील लोकांना २० ते ४० किलोमीटर अंतर कापून देवरी येथे यावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टाेकावर असलेल्या देवरी तालुक्यात अधिकारी नोकरी करायलाच तयार नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे. याकडे लोकप्रतिनिधींचेही पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.

................

देवरीच्या तहसीलदारांना मिळाला न्याय

सात वर्षे नक्षलग्रस्त तालुक्यात तहसीलदार म्हणून सेवा देणाऱ्या देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांची पुन्हा भामरागड (जि. गडचिरोली) येेथे बदली झाल्याने बोरुडे यांनी महसूल प्रशासनाकडे धाव घेत न्याय देण्याची मागणी केली. नियमानुसार सात वर्षे नक्षलग्रस्त भागात सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांची ऐच्छिक ठिकाणी बदली व्हायला पाहिजे. परंतु असे न होता राजनितीक दबावाखाली त्यांची बदली भामरागड येथे केल्याची चर्चा होती. तब्बल ४२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर विजय बोरुडे यांना १७ सप्टेंबर रोजी नाशिक महसूल विभागातील कोपरगाव (जि. अहमदनगर) येथे तहसीलदार म्हणून बदलीचा आदेश मिळाल्याची माहिती आहे.

........

अप्पर तहसील कार्यालयाचा दर्जाच का दिला !

चिचगड येथील अप्पर तहसील कार्यालयाची आहे. येथे मागील एक वर्षांपासून तहसीलदारच नसल्याने लोकांची कामे खोळंबली आहेत. ककोडी व चिचगड क्षेत्रातील लोकांना २० ते ४० किमी अंतर पार करुन देवरी येथे यावे लागत असल्याने मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चिचगडला अप्पर तहसील कार्यालयाचा दर्जा का दिला असा सवाल केला जात आहे.