शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आदेशाची तहसील कार्यालयात अवहेलना

By admin | Updated: September 25, 2014 23:25 IST

राज्य सरकारच्या वतीने जनतेच्या हितासाठी वेळोवेळी लोकोपयोगी आदेश निर्गमित केले जातात. मुंबईवरुन निघालेल्या लोकहितार्थ आदेशाची कितपत अंमलबजावणी होते यावर ‘त्या’ पदहुकुमाचे

मुद्रांक शुल्क माफ : राज्याच्या अवर सचिवाची सूचनाअमरचंद ठवरे - बोंडगावदेवीराज्य सरकारच्या वतीने जनतेच्या हितासाठी वेळोवेळी लोकोपयोगी आदेश निर्गमित केले जातात. मुंबईवरुन निघालेल्या लोकहितार्थ आदेशाची कितपत अंमलबजावणी होते यावर ‘त्या’ पदहुकुमाचे यशापयश अवलंबून असते. शासन स्तरावरुन निघालेल्या आदेशाची मात्र तहसील कार्यालयात अवहेलना होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मुद्रांक शुल्क माफ असतानासुद्धा तहसील कार्यालय तसेच न्यायालयात मात्र मुद्रांक शुल्क लावल्याशिवाय अर्ज पुढे जातच नाही.मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे अव्वर सचिव भा.सु. तायडे यांनी १९ आॅगस्ट २०१४ रोजी जाहीर सूचना पत्रक काढून तहसील कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयात दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. शासनाचे अव्वर सचिव यांच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जनतेला सूचित करण्यात आले की, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वास्तव्य प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र, तसेच शासकीय कार्यालये व न्यायालये यांच्यासमोर दाखल करावयाच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रास मुद्रांक शुल्क माफ आहे, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. सदर अधिनियमाच्या अनुसूची एक मधील अनुच्छेद चार अन्वये आकारणी योग्य असलेले मुद्रांक शुल्क माफ करीत आहे. असे आदेशान्वये महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे अव्वर सचिव भा.सु. तायडे यांनी सूचना पत्रकात म्हटले आहे. त्यांच्या नावाने असलेले ‘सूचना’ पत्र तहसील कार्यालयाच्या भिंतीवर चिपकवले आहेत. असे असतानासुद्धा आजही तालुक्यातील समस्त जनतेला तहसील कार्यालयात अर्ज करताना मुद्रांक शुल्क लावणे बंधनकारक केले जात असल्याचे दिसून येत आहे.शासनाच्या लोकहितार्थ आदेशाची माहिती व्हावी या हेतूने राज्याच्या अव्वर सचिवामार्फत काढलेल्या सूचना पत्राकडे संबंधित अधिकारी डोळेझाक करुन सामान्य जनतेच्या माथी आर्थिक भुर्दंड लादत असल्याचे चित्र आजही शासकीय कार्यलयात दिसून येत आहे. जात, उत्पन्न, वास्तव्य, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी करण्यात येणाऱ्या अर्जावर तसेच हलपनाम्यावर मुद्रांक शुल्क लावल्याशिवाय संबंधित अधिकारी अर्जच स्वीकारत नाही, अशी परिस्थिती आजतरी दिसून येत आहे. शासन एकीकडे मुद्रांक शुल्क माफ करण्याचे सूचना पत्र लावतो. तर दुसरीकडे शासकीय कार्यालयाचे संबंधित अधिकारी सामान्य जनतेला मुद्रांक शुल्क न लावता अर्ज करा, असे सांगत नाही. ऊलट मुद्रांक शुल्क लावलेलेच अर्ज स्वीकारतात, अशी सामन्य जनतेची ओरड आहे. एकंदरीत राज्याच्या अव्वर सचिवाच्या सूचना पत्राला संबंधित अधिकारी मात्र केराची टोपली दाखवित असल्याचे स्पष्ट दिसत आहे.