शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

विमुक्त भटक्या जमातीचा तहसीलवर मोर्चा

By admin | Updated: March 1, 2016 01:08 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त समता व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी संघर्ष वाहिनी ...

शेकडोंचा सहभाग : विविध मागण्यांसाठी शासनाला साकडेअर्जुनी-मोरगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त समता व सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषद नागपूरच्या अर्जुनी-मोरगाव शाखेकडून सोमवारी तहसील कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोठा मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. हा मोर्चा श्रीकृष्ण राईस मिल येथून निघून जुने बस स्थानक मार्गाने तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तहसील कार्यालयात सभा घेण्यात आली. यावेळी वक्त्यांनी समाजबांधवाना मार्गदर्शन केले. यावेळी यशवंत दिघोरे, शालीकराम भोयर, सदाशिव मेश्राम, नारायण मेश्राम, हिवराज बावणे, काशीराम कोल्हे, गोपाल सोनवाने, प्रभाकर सोनटक्के, कालीदास बावणे यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन तहसीलदार बोम्बर्डे यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)या मागण्यांचा समावेशविमुक्त भटक्या जमातींना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिकांमध्ये ११ टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे, राज्याच्या अर्थसंकल्पात विमुक्त भटक्यांच्या लोकसंख्या प्रमाणात विशेष आर्थिक तरतुद करणे, मच्छीमार संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक सहाय्य, मच्छीमारांना २०० दिवस हाताला काम व विकासाच्या योजना लागू करणे, भूमीहिनांना पडिक जमिनी, बेरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण, कर्ज व बेघरांसाठी घरकुल योजना लागू करणे, क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करणे, एस.सी.,एस.टी.च्या धर्तीवर जिल्हास्तरावर वसतिगृहे सुरू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.मोर्चेकऱ्यांनी व्यक्त केली नाराजीमोर्चेकरी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचले त्यावेळी पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले हे तहसीलदारांच्या केबिनमध्ये बसले होते. मोर्चाते नेतृत्व करणारी मंडळी मंत्री येत आहेत, आपण शांत बसा, असे जमावाला सांगत होती. मात्र पालकमंत्री मोर्चेकऱ्यांना सामोरे न जाता निघून गेले. त्यांच्या सहकार्याने आमचा लढा शासन दरबारी पोहोचविण्याचा मानस होता, असे सांगून मोर्चेकऱ्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.