शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
3
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
4
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
5
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
6
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
7
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
8
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
9
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
10
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
12
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
13
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
14
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
15
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
16
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
17
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
18
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
19
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
20
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
Daily Top 2Weekly Top 5

आमगाव संघर्ष समितीचा तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:17 IST

नगर परिषद क्षेत्रात मागील तीन वर्षांपासून राजकीय व्देषाच्या लढाईमुळे स्थानिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

ठळक मुद्देविविध समस्यांकडे वेधले लक्ष : तहसीलदारांना निवेदन

ऑनलाईन लोकमतआमगाव : नगर परिषद क्षेत्रात मागील तीन वर्षांपासून राजकीय व्देषाच्या लढाईमुळे स्थानिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या परिसरातील अनेक विकास कामे रखडली असून बेरोजगारीच्या समस्येत वाढ होत आहे. याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि.२७) आमगाव संघर्ष समितीच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात या भागातील नागरिक सहभागी झाले होते.आमगाव नगर परिषद क्षेत्रात रोजगार हमीचे कामे, घरकुल, शौचालये, शेततळे, शासकीय कार्यालयातील नागरिकांची कामे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. संजय निराधार योजना, श्रावणबाळ, स्वस्त धान्य दुकानातील पुरवठा या विषयाला घेऊन आमगाव विकास संघर्ष समिती व सामाजीक कार्यकर्ते धिरेश पटेल यांच्या नेतृत्वात मंगळवारी (दि.२७) दुपारी १२ वाजता गायत्री मंदिर परिसरातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी बीएसपीचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव, रामदास गायधने, रमेश गायधने, तानू तुरकर, मोरेश्वर पटले, श्रीकृष्ण पाथोडे, गिरीधारी डिब्बे, शोभेलाल शिवराजे, पुष्पा समात्र सहभागी होते. शहरातील मुख्य मार्गावरुन हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्च्याचे रुपातंर सभेत झाले. या वेळी धिरेश पटेल यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप नगर परिषदेचे राजकारण पुढे करुन नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. केवळ सत्तेसाठी निवडणुकीत पुढे तर नागरिकांच्या समस्यांवर पुढाऱ्यांची पळापळ सुरु आहे. नागरिकांच्या समस्यांवर कुणीही पुढारी समोर येत नाही. अशा पुढाऱ्यांना नागरिकांनी धडा शिकवावा आवाहन पटेल यांनी केले. नगर परिषद क्षेत्रात मागील तीन वर्षापासून राजकीय द्वेषामुळे लढाई सुरु आहे. त्यामुळे प्रशासकांचा कार्यकाळ निरंतर सुरु आहे. परंतु प्रशासकांचे कारभार हुकूमशाही सारखा असल्याने बेरोजगारांना काम मिळत नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. यानंतर शिष्टमंडळातर्फे विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार साहेबराव राठोड यांना देण्यात आले.