शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आमगाव संघर्ष समितीचा तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 00:17 IST

नगर परिषद क्षेत्रात मागील तीन वर्षांपासून राजकीय व्देषाच्या लढाईमुळे स्थानिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

ठळक मुद्देविविध समस्यांकडे वेधले लक्ष : तहसीलदारांना निवेदन

ऑनलाईन लोकमतआमगाव : नगर परिषद क्षेत्रात मागील तीन वर्षांपासून राजकीय व्देषाच्या लढाईमुळे स्थानिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या परिसरातील अनेक विकास कामे रखडली असून बेरोजगारीच्या समस्येत वाढ होत आहे. याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि.२७) आमगाव संघर्ष समितीच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात या भागातील नागरिक सहभागी झाले होते.आमगाव नगर परिषद क्षेत्रात रोजगार हमीचे कामे, घरकुल, शौचालये, शेततळे, शासकीय कार्यालयातील नागरिकांची कामे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. संजय निराधार योजना, श्रावणबाळ, स्वस्त धान्य दुकानातील पुरवठा या विषयाला घेऊन आमगाव विकास संघर्ष समिती व सामाजीक कार्यकर्ते धिरेश पटेल यांच्या नेतृत्वात मंगळवारी (दि.२७) दुपारी १२ वाजता गायत्री मंदिर परिसरातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी बीएसपीचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव, रामदास गायधने, रमेश गायधने, तानू तुरकर, मोरेश्वर पटले, श्रीकृष्ण पाथोडे, गिरीधारी डिब्बे, शोभेलाल शिवराजे, पुष्पा समात्र सहभागी होते. शहरातील मुख्य मार्गावरुन हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्च्याचे रुपातंर सभेत झाले. या वेळी धिरेश पटेल यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप नगर परिषदेचे राजकारण पुढे करुन नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. केवळ सत्तेसाठी निवडणुकीत पुढे तर नागरिकांच्या समस्यांवर पुढाऱ्यांची पळापळ सुरु आहे. नागरिकांच्या समस्यांवर कुणीही पुढारी समोर येत नाही. अशा पुढाऱ्यांना नागरिकांनी धडा शिकवावा आवाहन पटेल यांनी केले. नगर परिषद क्षेत्रात मागील तीन वर्षापासून राजकीय द्वेषामुळे लढाई सुरु आहे. त्यामुळे प्रशासकांचा कार्यकाळ निरंतर सुरु आहे. परंतु प्रशासकांचे कारभार हुकूमशाही सारखा असल्याने बेरोजगारांना काम मिळत नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. यानंतर शिष्टमंडळातर्फे विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार साहेबराव राठोड यांना देण्यात आले.