शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाळांवर सदस्यांचीच वक्रदृष्टी

By admin | Updated: February 1, 2016 01:42 IST

अखेरच्या घटका मोजत असलेल्या शाळांना एक जबाबदार सदस्याच्या नात्याने नवजीवन देण्याचे पवित्र कार्य करण्याचे सोडून ...

कपिल केकत गोंदियाअखेरच्या घटका मोजत असलेल्या शाळांना एक जबाबदार सदस्याच्या नात्याने नवजीवन देण्याचे पवित्र कार्य करण्याचे सोडून नगर परिषदेतील सदस्यांची या शाळांवरच वक्रदृष्टी दिसून येत आहे. कारण पालिकेतील सदस्यांनीच या शाळांतील काही वर्गखोल्या विविध कामांच्या प्रयोजनार्थ काही मंडळांना देण्याची मागणी केली आहे. यासाठी आमसभेत मांडण्यात आलेला प्रस्ताव पारित झाला आहे. या प्रकाराबाबत मात्र समाजमनातून रोष व्यक्त केला जात आहे. नगर परिषदेच्या आजघडीला १७ प्राथमिक शाळा, पाच माध्यमिक शाळा व एक कनिष्ठ महाविद्यालय आहे. यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांची स्थिती काही चांगली नाही. विद्यार्थ्यांअभावी पालिकेच्या या शाळा ओस पडल्या असून यातील काही शाळांचे समायोजन करण्याच्या विचारात खुद्द पालिका आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, पालिकेच्या या शाळा व महाविद्यालयांत सुमारे तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका खाजगी शाळेची संख्या असावी एवढी संख्या पालिकेच्या या शाळा व महाविद्यालयाची आहे. कोट्यवधींचा खर्च या शाळा व महाविद्यालयांवर नगर परिषद करीत आहे. मात्र पाहिजे तसे प्रयत्न होत नसल्याने विद्यार्थी व पालक पालिकेच्या शाळांकडे पाठ फिरवीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यासाठी पालिका प्रशासन व शिक्षक हे दोघेही तेवढेच जबाबदार आहेत. पालिका प्रशासनाला शाळांना विद्यार्थ्यांनी भरून काढण्यासाठी काही वेगळे करावे यासाठी वेळ नाही. तर शिक्षकांचे फक्त पगारापुरतेच शाळांशी नाते असल्याचेही आता शहरवासी शाळांची गत बघून बोलू लागले आहेत. त्यात आश्चर्याची बाब म्हणजे, पालिकेचे सदस्यही आता या शाळांच्या जीवावर उठले आहेत. त्याचे असे की, सदस्यांकडूनच शाळांतील वर्गखोल्या मंडळांना देण्याचे प्रस्ताव आमसभेत मांडण्यात आले आहे. कुणी गरजूंना रोजगार निर्मिती प्रशिक्षणासाठी तर कुणी क्रीडा मंडळांना वर्गखोल्या देण्याचा प्रस्ताव सभेत मांडला असून त्यावर ठराव घेण्यात आला आहे. आज एक-दोन वर्ग खोल्या देण्यात आल्या तर उद्या जाऊन अन्य कुणी आणखी खोल्यांची मागणी करणार. आज रित्या पडून असलेल्या या शाळा विद्यार्थ्यांनी भरून निघाव्या व त्यांचे गतवैभव परतून यावे यासाठी या जबाबदार सदस्यांच्या प्रयत्नांची गरज आहे. त्यांनी यासाठी प्रयत्न केल्यास नक्कीच या शाळांचा कायापालट होणार यात शंका नाही. यासाठी तसे प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे.