शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या सरकारला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 05:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन खा. प्रफुल्ल पटेल व मान्यवरांनी अभिवादन केले. खा. पटेल म्हणाले केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून आता शेतकरी रस्त्यावरुन येऊन त्याचा विरोध करीत आहे. शेतकऱ्यांवर अन्यायकारक धोरणे लादणाऱ्या सरकारला आता जनतेनीच धडा शिकवावा. शेतकऱ्यांचा आवाज हा संपूर्ण देशाचा आवाज असून त्यामुळे या आंदोलनात सर्व देशभरातील जनता सहभागी झाली असल्याचे सांगितले. 

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात निदर्शने, मोटारसायकल रॅली काढून दिला आंदोलनाला पाठींबा

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने विरोधकांच्या विरोधानंतरही अन्यायकारक तीन कृषी विधेयक पारित केली. यामुळे शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आली आहे. या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. मात्र हे आंदोलन सुध्दा दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांचा आवाज  दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या व त्यांच्या जीवावर उठलेल्या सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी आज (दि.८) येथे केले. केंद्र सरकारच्या कृषी विरोधी धोरणाच्या विरोधात मंगळवारी (दि.८) भारत बंदची हाक देण्यात आली होती. याला महाविकास आघाडीने समर्थन दिले होते. मंगळवारी सकाळी महाविकास आघाडीच्यावतीने सकाळी शहरातून रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने माजी आ.राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात मोटारसायकल रॅली काढून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन खा. प्रफुल्ल पटेल व मान्यवरांनी अभिवादन केले. खा. पटेल म्हणाले केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून आता शेतकरी रस्त्यावरुन येऊन त्याचा विरोध करीत आहे. शेतकऱ्यांवर अन्यायकारक धोरणे लादणाऱ्या सरकारला आता जनतेनीच धडा शिकवावा. शेतकऱ्यांचा आवाज हा संपूर्ण देशाचा आवाज असून त्यामुळे या आंदोलनात सर्व देशभरातील जनता सहभागी झाली असल्याचे सांगितले. या वेळी महाविकास आघाडीचे माजी आमदार राजेंद्र जैन, जिला काॅंग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेव किरसान, विनोद जैन, अमर वऱ्हाडे, जितेश राणे, देवेंद्रनाथ चौबे, शिवसेनेचे पंकज यादव, सतीश देशमुख, नानू मुदलियार, छोटु पटले, केतन तुरकर, सुनील पटले, मयूर दरबार, खालीद पठान, रमेश गौतम, राजेश कापसे, विनायक खैरे, संजीव राय, सौरभ रोकडे, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, निलम हलमारे, देवेंद्रनाथ चौबे, गोविंद तुरकर, पंकज यादव, आशा पाटील, शिवकुमार शर्मा, के.बी.चव्हान, केतन तुरकर, सौरभ रोकडे, सतीश देशमुख उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी विधेयक रद्द करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या नावे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी आ.राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांना देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. कॉंग्रेसचे जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणा विरोधात आ.सहषराम कोरोटे, जिल्हाध्यक्ष नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आले.

 

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेलFarmer strikeशेतकरी संप