शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या सरकारला धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 05:00 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन खा. प्रफुल्ल पटेल व मान्यवरांनी अभिवादन केले. खा. पटेल म्हणाले केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून आता शेतकरी रस्त्यावरुन येऊन त्याचा विरोध करीत आहे. शेतकऱ्यांवर अन्यायकारक धोरणे लादणाऱ्या सरकारला आता जनतेनीच धडा शिकवावा. शेतकऱ्यांचा आवाज हा संपूर्ण देशाचा आवाज असून त्यामुळे या आंदोलनात सर्व देशभरातील जनता सहभागी झाली असल्याचे सांगितले. 

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात निदर्शने, मोटारसायकल रॅली काढून दिला आंदोलनाला पाठींबा

  लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : केंद्र सरकारने विरोधकांच्या विरोधानंतरही अन्यायकारक तीन कृषी विधेयक पारित केली. यामुळे शेतकऱ्यांच्या अधिकारावर गदा आली आहे. या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. मात्र हे आंदोलन सुध्दा दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकऱ्यांचा आवाज  दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या व त्यांच्या जीवावर उठलेल्या सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन खा. प्रफुल्ल पटेल यांनी आज (दि.८) येथे केले. केंद्र सरकारच्या कृषी विरोधी धोरणाच्या विरोधात मंगळवारी (दि.८) भारत बंदची हाक देण्यात आली होती. याला महाविकास आघाडीने समर्थन दिले होते. मंगळवारी सकाळी महाविकास आघाडीच्यावतीने सकाळी शहरातून रॅली काढून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने माजी आ.राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात मोटारसायकल रॅली काढून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन खा. प्रफुल्ल पटेल व मान्यवरांनी अभिवादन केले. खा. पटेल म्हणाले केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून आता शेतकरी रस्त्यावरुन येऊन त्याचा विरोध करीत आहे. शेतकऱ्यांवर अन्यायकारक धोरणे लादणाऱ्या सरकारला आता जनतेनीच धडा शिकवावा. शेतकऱ्यांचा आवाज हा संपूर्ण देशाचा आवाज असून त्यामुळे या आंदोलनात सर्व देशभरातील जनता सहभागी झाली असल्याचे सांगितले. या वेळी महाविकास आघाडीचे माजी आमदार राजेंद्र जैन, जिला काॅंग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेव किरसान, विनोद जैन, अमर वऱ्हाडे, जितेश राणे, देवेंद्रनाथ चौबे, शिवसेनेचे पंकज यादव, सतीश देशमुख, नानू मुदलियार, छोटु पटले, केतन तुरकर, सुनील पटले, मयूर दरबार, खालीद पठान, रमेश गौतम, राजेश कापसे, विनायक खैरे, संजीव राय, सौरभ रोकडे, चंद्रकुमार चुटे, एकनाथ वहिले, निलम हलमारे, देवेंद्रनाथ चौबे, गोविंद तुरकर, पंकज यादव, आशा पाटील, शिवकुमार शर्मा, के.बी.चव्हान, केतन तुरकर, सौरभ रोकडे, सतीश देशमुख उपस्थित होते. 

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी विधेयक रद्द करण्यात यावे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या नावे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने माजी आ.राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी दीपककुमार मीना यांना देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. कॉंग्रेसचे जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने मंगळवारी शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणा विरोधात आ.सहषराम कोरोटे, जिल्हाध्यक्ष नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आले.

 

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेलFarmer strikeशेतकरी संप