शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

खोटे आश्वासन देणाऱ्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेले भाजप सरकार हे खोटारडे आहे. निवडणुकांपूर्वी दिलेली आश्वासने त्यांनी ...

ठळक मुद्देबाबा कटरे : अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा, धानाला २५०० रुपये हमीभाव द्या

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : केंद्र व राज्यात सत्तारुढ असलेले भाजप सरकार हे खोटारडे आहे. निवडणुकांपूर्वी दिलेली आश्वासने त्यांनी पाळली नाहीत.उद्योगपतींचे दलाल आहेत. उद्योगपती हित जोपासण्यासाठी योजना तयार करुन सर्वसामान्यांची लुबाडणूक केली जात आहे. शेतकरी विरोधी असलेल्या भाजप सरकारला येत्या निवडणुकांमध्ये धडा शिकवा असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम (बाबा) कटरे यांनी केले.अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेसतर्फे गुरूवारी (दि.२७) आयोजित शेतकरी आक्रोश मोर्च्याला संबोधित करताना ते बोलत होते. या मोर्चाची सुरुवात दुर्गा चौक येथून झाली. मोर्चात तालुक्यातील खेड्यापाड्यातून आबालवृद्ध, महिला पुरुष उपस्थित झाले होते. हा मोर्चा मुख्य रस्त्याने मार्गक्रमण करीत तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. या वेळी कार्यकर्त्यांनी सत्तारुढ भाजप सरकारला भाषणातून चांगलेच धारेवर धरले. कटरे म्हणाले, भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव नाही. कर्जमाफीचे तुणतुने वाजविण्यात आले. मात्र अद्याप बºयाच शेतकºयांना कर्जमाफी मिळाली नाही. अशिक्षीत शेतकऱ्यांना आॅनलाईन पद्धतीने कर्जमाफीचे फार्म भरण्यास बाध्य केले. बिचारे शेतकरी दाम्पत्य आपले कामधंदे सोडून फार्म भरण्यासाठी उन्हातान्हात, रात्रीबेरात्री उभे असायचे, आॅनलाईन फार्म भरुन देणाºयांचेही चांगभले झाले. महिलांना चुल फुंकून फुफ्सुसाचे आजार होऊ नयेत, यासाठी उज्वला गॅसचे वितरण केले. काँग्रेसच्या राजवटीत स्वस्त असलेल्या गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले. मोफत गॅस कनेक्शन देण्याचा कांगावा करुन क्रमाक्रमाने त्यांच्या सवलतीचे पैसे गॅसची किंमत म्हणून वसूल केली जात आहे.एकंदरित हे शासन उद्योगपतींने दलाल आहे. नुकत्याच पाच राज्यात निवडणुका पार पडल्या. त्या जनतेने काँग्रेसला कौल दिला. यावरुन सत्तारुढ शासनाला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे असे लक्षात येते. याचाच कित्ता गिरवत भाजपला हद्दपार करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. या वेळी भागवत नाकाडे, अमर वऱ्हाडे, प्रमोद लांजेवार, उषा श्हारे यांनी मार्गदर्शन केले.या वेळी विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदार धनंजय देशमुख यांना देण्यात आले.अन् लोकनेते आलेच नाहीमाजी खासदार नाना पटोले यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये नवचैतन्य आले. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांची कदर करत त्यांना किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद बहाल केले. त्यामुळे आपल्या लोकप्रिय शेतकरी नेत्याविषयी स्थानिक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. त्यांच्या नावावर येथे शेतकऱ्यांनी मोठी गर्दीॅ केली होती. ते या मोर्चाचे नेतृत्व करणार होते. मात्र ते न आल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिराश झाला. महारणा प्रताप चौकात मोर्चा येताच शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. आधी नाना पटोलेंना मोर्चात बोलवा अशी मागणी शेतकरी करीत होते.या आहेत प्रमुख मागण्याशेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, धानाला २५०० रुपये हमीभाव, बेरोजगारांच्या हाताला काम, शासकीय कार्यालयातील रिक्त पदांची भर्ती, शेतमजुरांसाठी रोजगार निर्मिती, शेतकºयांचे वीज बिल माफ, धानाला प्रती क्विंटल ४०० रुपये तातडीने बोनस जाहीर करा, महिला बचत गटांना शुन्य टक्के व्याजाने कर्ज, नोंदणीकृत कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ, वनहक्काचे सामूहिक व वैयक्तिक पट्टे त्वरित देण्यात यावे, गरजुंना प्रधानमंत्री आवास योजना व घरकुलाचा लाभ त्वरित देण्यात यावा, तुडतुडा व दुष्काळी लाभ त्वरित देण्यात यावा, इटियाडोह धरण लाभ क्षेत्रातील रब्बी पिकासाठी सिंचनाची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी, एस.सी.एस.एस.टी.,ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, मासेमारी करणाऱ्या संस्थांची तलावाची लिज माफ करण्यात यावी, हमीभाव केंद्रावर सुरु असलेली शेतकºयांची लूट थांबविण्यात यावी, स्वमाीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या, घरकुल लाभधारकांना स्वस्त दरात रेती उपलब्ध करुन द्यावी, वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये रुपांतरीत करण्याच्या प्रक्रियेची अंमलबजावणी त्वरित करावी, सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना ४ हजार बेरोजगारी भत्ता देण्यात यावा, महिला बचत गटांचे कर्जमाफ करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.